Thursday, May 5, 2011

Puruliyaa Expose


’एका भीषण सत्याला(?) सामोरं जातांना...’
अर्णव...'टाईम्स्‌ नाऊ' वृत्तवाहिनीचाचा प्रतिनिधी,त्याच्या वृत्तवाहिनीवर, गेले दोन दिवस, दोन परदेशी नागरिकांशी बोलतो आहे. ते आहेत, पीटर्‌ ब्लीच्‌ हा ब्रिटिश्‌ आणि किम्‌ डेव्ही हा बहुधा डॅनिश नागरिक. भारतीय गुप्तहेरखातं रॉ(Research and Analysis Wing), ब्रिटन्‌च्या एम्‌आय्‌5 अणि एम्‌आय्‌6 या दोन गुप्तहेर यंत्रणांच एकमेकांतलं शत्रुत्व आणि कांही अंस्वस्थ भारतीय राजकारणी यांच्या तथाकथित कटांतून साकारलेलं एक ’महाकांडा’ संदर्भात हा संवाद आहे..
कराचींतून किम्‌ डेव्हीला शस्त्रांसह, अगदी अ‍ॅंटी-टॅंक्‌ तोफांसह, ( ब्लीचनं दिलेल्या उत्तरानुसारं,कारण काय त म्हणे, ’ पोलिस-स्टेशनं उडवायला उपयोगी पडतांत) Air-Cargo विमानांतून उड्डाण करण्यासाठी, एका खासदारान म्हणे संपर्क साधला. त्याला ती सर्व शस्त्रास्त्र, पश्चिम बंगालमधल्या, पुरुलिया जिल्ह्यांत ४८ तासाच्या आंत Airdropa करायची होती अन्यथा, त्याला ;कबूल’ झालेला मोबदला रद्द होवून,  ’सर्व दो्र तोडून टाकण्या्त येणार’ होते. त्याला उड्डण करणे सोपे व्हावे म्हणून, Airforceची राडार त्या रात्री स्विच्ड्‌ ऑफ्‌ ठेवण्यांत आली होती. या दोन परदेशी ’खबर्‍यांच म्हणणं खंरं मानायच ठरलं तर, प.बंगालमधलं मार्क्स्‌सिस्ट्‌ शासन, शस्त्रांकित उठाव करून पाडण्यासाठी तत्कालीन केंद्रशासनानं केलेला ’गर्हणीय’ उद्योग होता. लोकशाही तत्वाबरहुकूम, जनतेनं, लोकशाही तत्वानुसार निवडून दिलेल्या, राज्यघटनेंतल्या मार्गदर्शनपर अवतरणांच्या आधीन राहून प्रस्थापित केल्या गेलेल्या, कम्युनिस्ट शासनाकडून सर्वसामान्य गरीब जनतेवर होणारे अनन्वित अत्याचार, जुलुम-जबरदस्ती संपविण्यासाठी, जनतेलाच उठाव करायला उद्युक्त करून, अस्थीरता निर्माण झाल्यावर , राष्ट्रपतींना ’राष्ट्रपती राजवट आणायला भाग पाडण हा या कटाचा  मूळ उद्देश होता. २४ खासदारांच्या समूहान तसा प्रयत्नही केला पण तो व्यर्थ ठरल्यानं हा ’अघोरी’ उपाय योजला गेला. या असल्या उपायांची सुरुवात १९८८ मध्ये, त्रिपुरांतील रेबेल्‌ ग्रूप्स्‌ना शस्त्रास्त्र पुरवून उठावास उद्युक्त करून के्ली ह्ती केंद्रशासनानं. १९९० मधे हे गुप्त उद्योग ’विषय-पत्रिके’वरच घेतले गेले असं किम्‌ डेव्हीच म्हणणं आहे. १६ डिसेंबर ९५ आधी कित्येक महिने रॉ आणि एम्‌आय्‌५ यांना या ‘ऒपरेशन्‌’ची कल्पना होती म्हणे.
एखाद्या देशाच्या शासनानं आपल्याच एका प्रदेशांतल्या दोन विरुद्ध मत-प्रवाहांच्या जनसमूहांना एकमेकांविरुद्ध सशस्त्र उहाव करण्यासाठी प्रत्साहन द्याव, या इतकी लाजिरवाणी घटना अन्य कुठली असूच शकत नाही.अण्णांची ’भ्रष्टाचार-विरोधी’मोहीम, इतक्या अवाढव्य प्रमांणातल्या कृष्णकृत्यांना कसा आळ घालू शकणार. मतदात्या जनतेनं कुणावर आणि कां  विश्वास ठेवायचा ? नेत्यांसाठी, मतांची भीक मागत हिंडणार्‍या कार्यकर्त्यांना, आपल्या’नेत्या’ची मानवी मूल्य, अंतस्थ हेतू, काळ्या कर्तूतींची क्षमता याबद्दल कांहीच कल्पना नसते. असं कांही लोकशाही मूल्यांची उघडउघड पायमल्ली करणारं घडलं तर जाब विचारणार्‍या जनतेला, त्या बिचार्‍या तळागाळांतल्या कर्यकर्त्यांनी
काय उत्तर द्यायच ?
इतर एकाही वाहिनीनं या Expose’ची साधी दखलही न घेता, विल्यम‌-केट्‌्च्या शाही विवाह-सोहळ्याची तयारी, प्रत्यक्ष विवाह आदि, तुलनेनम कमी महत्वाण्च्या बातम्या पडद्यावर झळकवीत राहावं, हा खरंच माध्यमांच्या, तथाकथित ’सजगतेचा’ पराभव म्हणायचा कां ?
किम डेव्हीनं असाइनमेंट्‌ पारपाडल्यावर त्याच विमान, कोलकत्त्याच्या घावपट्टीवर उतरवून पुढील कांही महिने त्याला दिल्ली, मुंबई अशा ठिकाणी अज्ञातवासांत, सुरक्षा पुरवून आसरा दिल्यानंतर, कांही महिन्यांनी, AK47ची सुरक्षा असलेल्या Dipomat's car मधून, सीमा ओलांडून, नेपाळला ’सुखरूप पाठवणी करणार्‍या खासदाराच नाव मात्र डेव्हीनं, ’I'll reveal that live'असं सांगत उघड करायचं टाळल.
एका ब्रिटिश खासदारनं ही बाब ब्रिट्न्‌च्या संसदेत उघड करून पीटर ब्लीच्‌ला सत्यकथन करायला, आणि तब्बल १६ वर्ष शासनानं सत्तेच्या खुर्चीखाली दाबलेलं हे, भारतीय जनतेला, त्सुनामी आणि भूकंपापेक्षा भीषण परिणाम दाखविणार, ’गलिच्छ सत्य’ चव्हाट्यावर आणायला भाग पाडलं. अमेरिकेचा या सर्व प्रकरणाशी संबंघ नसल्याची ग्वाही पीटरनं दिली. परकीय शक्ती, स्वकीयांशी हातमिळवणी करून, देशाच वाटोळ करायच्या मागे आहेत हे पाहून इतिहासांतील, सूर्याजी पिसाळसारख्या, आणि सिकंदराला मदत करणार्‍या सीमेवरील राजा अंभीसारख्या, अस्तनीतल्या निखार्‍यांची आठवण अटळ आहे.
हे प्रकरण TIMES NOW नं लावून धरलय. पहात राहिलांत तर त्यातलं गांभिर्य तुमच्या सहज ध्यानी येईल आणि धक्क बसेल.
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com

1 comment:

  1. Davy is no saint. Did his conscience prick him after so many years?
    I seriously doubt the veracity of some of the stated facts-e.g. all radars of the IAF being shut down. It is not so easy. There will be recorded entries for the radars to be shut down or having a Technical breakdown. There would have been a panic if that was the case.
    The case definitely deserves to be investigated.There is a different government in the centre now who would not mind exposing/embarrassing the opposition govt in power at the point of time.

    ReplyDelete