Tuesday, April 30, 2013

प्रेम.. शब्द एक, पण

प्रेम.. शब्द एक, पण व्यक्त व्हायच्या पद्धती, प्रकार, देहबोली, शब्दकळा अनेक.. कविश्रेष्ठ, ज्ञानपीठ-पुरस्कार प्राप्तकर्ते कुसुमाग्रज त्यांच्या, ’प्रेम कुणावर कराव.’ या गाजलेल्या कवितेंत म्हणतांत त्याप्रमाणे, ’ज्याला तारायचं त्याच्यावर तर करांवच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं.. प्रेम कुणावरही करावं..’ संपूर्ण कविता तर प्रेमाची महती सांगतेच पण त्यांतल्या या एका ओळींत, कविवर्यांवी, केवढा मोठा ’भाव-प्रदेश’ कवळलाय्‌ ? या कवितेच्या अंतिम चरणांमधे तर कुसुमाग्रजांनी ’प्रेम-भावनेचं अधिष्ठानच प्रस्थापित केलय्‌ ! ते म्हणतांत, कारण, प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि.. भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा.. ऎकमेव..... आणि खरच, तस बधितलं तर प्रेम-भावनाच निसर्गानं माणसाला बहाल केली नसती तर ? द्वेष, मत्सर, हेवेदावे, भांडणं यांचा जन्म झालां असतां ? या प्रत्येक भावाचं उगमस्थान म्हणून प्रेमाकडे पाहायला गेलं तर, उदाहरणं, दृष्टांत, रुपक लिहितालिगिता एकेक दीर्घ निबंध होईल.. पन मनाला एक बौद्धिक चाला म्हणुन करून बघा ! गंमत म्हणून.. तर असं हे, सर्वपरिचित, सामान्य अर्थानं जगण्याच्या एका हळव्या वळणावर भेटणारं प्रेम..त्याच्या आगमनाच वर्णन, आमचे कविराज मित्र इतकं छान करतांत.. ते म्हणतांत दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित सोनेरी ऊन येत तसच कांहीस..पाउल न वाजवता आयुष्य़ांत प्रेम येतं... सुधीर मोघेंची ही १९७७ साली ताजीताजी असलेली कविता, मी आजचे ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीतकार आनंद मोडककडनं स्वरबद्ध करून घेतलिव्‌ती आणि युवदर्शनच्या गीतसंध्या कार्यक्रमांत सादर केलिव्‌ती ! मराठी पॉप्‌ या शीर्षकांतर्गत. नंदू भेंडेनं ती गायली होती इतकी उत्कटपणे.. क्या केहेने.. आतां या प्रेमानं, अत्यंत प्रेम पूर्वक धमन्यांम्धे प्रवेश केल्यावर मग ’प्रेम-पात्रा’चं प्रणयाराधन.. त्यासाठी आजकाल CCD, तसं त्याकाळी एकांतस्थळं शोधणं होत असे.. शांताबाई शेलक्यांच्या शेलक्या रचनांमधली ही रचना तोच चंद्रमा नभांत तीच चैत्र यामिनी ’एकान्ती’ मजसमीप तीच तूहि कामिनी चैत्र.. वसंतसखा चैत्र.. चित्तवृत्ती खुलवणारा-फुलवणारा, चेतवणारा चैत्र..तापल्या उन्हाच्या कांहिलीला सामोर जातांना, बृक्षांच्या शाखांतून उसळणारा स्राव दृश्यमान करणारा आणि निसर्गाचा हा आगळावेगळा मत्तगंध आभाळांत उधळणारा चैत्र..त्यांतली रात्र.. कधी हिंदलाय्‌त अशा रात्री ? किंबा सागरकिनारीच्या, पुळणीवरच्या प्रणयरम्य घटिका सरल्यानंतर.. बा.भ. बोरकरांच्या शब्दांत विरले सगळे सूर तरीही उत्तर रात्र सुरेलं ओसरल्यावर आपण सजणे, अशीचं ओलं उरेलं एक जलधिसान्निध्यांत वाढला पोसलेला कवी, किती सहजपणे आपल्या रोजच्या सृष्टींतलं रूपक.. सागर-कल्लोळ.. कल्लोळ म्हणजे लाट.. आणि किनारा यांचं.. देवून जातो पहा.. सग्ग्ग्गळ अगदी तस्सतस्से असतं की नाही ? पण याचं, अगदी समीप आलेल्या प्रमपात्रानं, नायकाचं प्रम अव्हेरलं, किंवा ती, कदाचित तिच्या मनाविरुद्ध, ’दुसर्‍या कुणाची झाली तर.. मग ? दु:खाच्या वाटेवर गांव तुझे लागले थबकले न पाय जरी, हृदय मात्र थांबले.. बेशीपाशी, उदास हांक तुझी भेटली, अन्‌ माझी पायपीट डोळ्यांतुन सांडली सुरेश भटांचा शेर आणि सुधीर मोघ्यांनी स्वरावलेला आणि, श्रीकांत पांरगांवकरच्या सुरांनी भारावलेला...१९८१.. रंग माझा वेगळा, कार्यक्रमाची सुरुवात.. आतां या प्रेमाची परिणिती विवाह बंधनांत झाल्यावर, अर्थातच नव्यानवलाईचे नऊ दिवस संपल्यावर, अहं त्याच्या आधीच, ताज्याताज्या नवरदेवांवर ’प्रसंग’ गुदरतांत, आधी किरकोळ कारणानं रुसवे-फुगवे, धुसफुस, अश्रुपात, आणि मग मनधरणी.. कशि तुज समजाउ सांग कां भामिनि धरिशि राग बाकिबाबांच्या संस्कृतोद्भव शब्दकळेनं सजलेली ही कविता... ज्याचं बुवांनी..पंडित अभिषेकींनी शुद्ध कल्याण रागांत बांधलेलं, एक अप्रतिम गीत करून गायलय्‌... ती कविता या प्रेम प्रदेशांतल्या एका अवघड वळणाचं.. घडता घडता बिघडलेलं आणि बिघाडावर शरणागतीची धाड घालून, पुनर्घडण करू पाहाणार्‍या परिश्रमांचं.. यथार्थ दर्शन घडविते. याचं शृंगारकाला दरम्यान, म्यान केलेल्या कुरबुरी लपवत आणखी एक शरणागती.. मानापमान नाटकांतली प्रेम सेवा शरण, सहज जिंकी मला, मीचं चुरीनं चरणं, दास हो मी तुझा कृष्णाजी प्रभाकर खाडिलेकरांनी, १९११ मधे लिहिलेल्या संगीत मानापमान या नाटकांतलं, मास्टर दीनानाथांनी संगीतबद्ध करून, गाऊन 'Once more' घेत, लोकप्रिय केलेलं हे पद. याची मूळ चाल गोविंदराव टेंब्यांची तितकीच श्रवणीय.. आणि मग रागेजल्या भामिनीला आवरतांना पतिराजांची तारांबळ.. अशीच, प्रेमाचा आणखी एक आयाम धसमुसळ प्रेम, दर्शविणार्‍या पदांत नच सुंदरि करु कोपा. मजवरि धरि अनुकंपा कुचभल्ली वक्षाला टोचुनि दुखवी मजला धरुनीया केसाला दंतव्रण करि गाला.. हाचि दंड योग्य असे सखये मत्पापा.. अरे काय प्रेम की मारामारी ? हो, मारामारीचं पण प्रेमोद्भव.. तर, अशा या प्रमाचं व्यक्त होण्याच्या कांही नमुने तुमच्यासमोर मांडतांना मजा आला मला. पण अजून आपण या युगुल-प्रेमाच्या टप्प्यापर्यंतच पोहोचलो आहोंत, हे लक्षांत आलय कां तुमच्या ? अजून त्याला परिणामोत्तर, तिसरा आयाम प्राप्त व्हायचाय.. त्यानंतर हा प्रेम प्रवाह कुठल्याकुठल्या उताराकडं धावतो ते पुढच्या भागांत पाहू.. ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Friday, April 19, 2013

कृष्णाचा कालखंड

कृष्णाचा कालखंड पारंपरिक संशोधकांच्या मते, कलियुग सुरू झालं, ख्रिस्तपूर्व ३०१२ मधे. महाभारतीय युद्ध किंवा कृष्णाचं परलोकगमन यांच्याशी या कालगणनेंचा काय संबंध आहे हे स्पष्ट होत नाही आणि ते इथं महत्वाचही नाही. त्यामधे साघारणतः ३५ वर्षांचा फरक आहे आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या आणि त्या दरम्यान घडलेल्या घटनांच्या तुलनेंत तो नगण्य आहे. अनेक महान खगोलशास्त्रज्ञ आणि कुंडलीकार भविष्यवेत्त्यांनी ग्रहगोलांच्या स्थानांच्य तौलनिक अभ्यासानंतर, दिननिश्चिती करण्याचा प्रयत्न केला आहे या आधी. प्राचार्य श्रीनिवासराघवन हे त्यापैकी एक महनीय नांव. त्यांनी, महाभारत युद्धाचा दिनांक ख्रिस्तपूर्व २२ नोव्हेंबर ३०६७ हा, निश्चितही केला आहे. पण यामधे, प्राचीन ग्रहस्थितींची नोंद अचूक असल्याच गृहित मानलं गेलय, जे सहजासहजी स्वीकारार्ह होणं जरा दुरापास्त वाटतं. म्हणजे याचा अर्थ त्यांचा होरा चुकीचा होता असं नाही. पण थोडा साकल्याल विचार होणं आवश्यक आहे. कांही संशोधकांच्या मते, ख्रिस्तपूर्व ३१०० इतकं मागं जाणं बरोबर नाही कारण, आर्यांचा भारत प्रवेशच मुळी ख्रिस्तपूर्व १५०० मधला मन्यताप्राप्त असा आहे. आणि म्हणून महाभारतयुद्ध आणि कृष्ण हे साहाजीकच त्यानंतरचेच. परंतू भरतवर्षावरच्या आर्यांच्या आक्रमणाची शक्यता आणि मुळातच तो सिद्धांत विज्ञानानं नाकारला आहे. मोहंजोदरो आणि हरप्पातल्य उत्खनना दरम्यान मिळालेल्या लेखांची उकल करतांना, वेदांचा उगम हा ख्रिस्तपूर्व ३५०० वर्षांच्या बराच आधीचा आहे हे ही स्पष्ट झालय. त्यामुळं हे होरे सहजी निकालांत निघतांत. एकमेव मुद्दा, ज्यावर चर्चा होवू शकते तो म्हणजे, विख्यात पुरातत्ववैज्ञानिक एस् आर् राव यांच्या संशोधनांतूल प्रकाशांत आलेलं. सौराष्ट्र किना-यालगत जलधिस्थ झालेलं द्वीरका बेट, जी, त्यांच्या मते कृष्णाचीच ख्रिस्तपूर्व १५०० वर्ष अस्तित्वांत असलेली द्वारका होय.. पण पुराभिलेखांच्या निरक्षरतेमुळे हे निष्कर्ष कितपत ग्राह्य मानता येतील या विषयी मतभेद असू शकतांत. त्यामुळं आणि हरप्पा इथ सापडलेले पुराभिलेख, जे ख्रिस्तपूर्व १५०० पेक्षा जळपास १००० वर्ष मगच्या काळांतले आहेत त्या ऐतिहासिक पुराव्यावरून वरून, राव महोदयांनी शोधलेली द्वारका ही कृष्णाची नक्कीच नव्हे हे स्पष्ट होतं. आतां कांही वेगळ्य दिशेनं कृष्णकाळाचा शोध घेऊन पाहू. अश्वलानं, महाभारताच्या ग्रंथकर्त्यांना, म्हणजे जैमिनी आणि वैशंपायन यांना प्राचीन असं संबोधलं आहे, त्या अर्थी महाभारतीय युद्ध आणि तो यांच्यांत किमान एक शतक इतका कालखंड गेला असणार असं गृहित धरायला हरकत नाही. त्यानं केलेल्या नोंदी प्रमाणं, पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर, हिंदू पंचागातल्या भाद्रपदमासांत, जमिनीखालची बीजं अंकुरित होतांत. आज ही प्रक्रिया जेष्ठ किंवा आषाढांत होतांना दिसते. म्हणजे त्याच्या काळांत वर्षाऋतु आरंभ जेष्ठमासा ऐवजी श्रावणांत होत असावा, जसा तो आज होतो म्हणजे जवळपास सत्तर दिवस अलिकडे. पृथ्वीच्या ध्रूवीय बिंदूंमधून जाणा-या, आंसाच्या. सूर्य आणि इतर ग्रहगोलांच्या गुरुत्वाकर्षण परिणामी, अतिमंदगति पार्श्वगमनाच्या अवकाशी चमत्कारामुळं ऋतुंचंसुद्धा, स्थिर ता-यांच्या अवकाश-स्थानांच्या तुलनेंत, दर ७२ वर्षांनी एक दिवस या प्रमाणांत पार्श्वगमन होतं. आणि हिंदू पंचांग हे स्थिर ता-यांच्या अवकाश-स्थानांवरूनच मांडलं गेलय हे सर्वश्रुत आहे. याचाच अर्थ, अश्वलानं नोंदलेला वर्षाऋतु आरंभ हा ७० गुणिले ७२ म्हणजे जवळपास ५०४० वर्षांपूर्वीचा किंवा ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपू्र्वींचाच आहे. अश्वल हे कहोल कौषीतकी, या कौषीतकी ब्राह्मण वेदकालांतल्या तापसांपैकी ऋषींचे अनुयायी होते. ते महाभारतांतल्या अनेक व्यक्तिरेखांचा उल्लेख करतांत. शिशिरऋतुचा प्रारंभ म्हणजे आज आपण महाशिवरात्र साजरी करतो तो असाही उल्लेख दिसतो. परंतू शिशिरऋत्वारंभ २१ डिसेंबरला तर महाशिवरात्र १ मार्चच्य आसपास असते. हा परत एकदा पृथ्वीच्या ध्रूवीय बिंदूंमधून जाणा-या, आंसाच्या. सूर्य आणि इतर ग्रहगोलांच्या गुरुत्वाकर्षण परिणामी, अतिमंदगति पार्श्वगमनाचा परिणाम. म्हणजेच कौषीतकिच्या काळापासून, ऋतुचक्र ७० दिवस मागे गेले आहे, ५००० वर्षांपूर्वी. महाभारत युद्धाचं वर्ष हे ख्रिस्तपूर्व ३१०० याचा हा आणखी एक पुरावा. अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर आलेल्या कांही तत्कालीन ग्रीक प्रवाशांनी नमूद करून ठेवलेल्या बाबींप्रमाणे, आणि तत्कालीन उपलब्घ ऐतिहासिक दस्तऐवजानुसार, कृष्णाविषयी आणखी कांही रोचक माहिती मिळते. प्लिनी, हरि-कृष्णापासून नामोद्भवलेले हेरॅकल्स् असा उल्लेख करतो. ग्रीस मधल्या मॅथोरा नामक एका महत्वाच्य़ा नगराच्या, सौरसेनी जमातीमधे हेरॅकल्स्.. कृष्णानुयायी.. हे बहुमानप्राप्त मानले जात. आपण त्यांना शूरसेनी आणि मथुरा असं संबोधू, कारण शूर हा वसुदेवाचा जन्मदाता म्हणजेच कृष्णाचा पितामह होता. भारतीय हेरॅकल्स्.. कृष्ण.. ग्रीक उल्लेखाप्रमाणे, अलेक्झांडर आणि सॅंन्ड्राकोटोस् यांच्या आधी म्हणजे अंदाजे इसवीसन ३३० पूर्वी, १३८ पिढ्या अस्तित्वांत होते. एक पिढी म्हणजे सामान्यतः वीस वर्षे असा, भारतीय साम्राज्यांच्या संदर्भांत अदाज केला, तर १३८ गुणिले २० म्हणजे २७६० अधिक ३३० म्हणजेच ख्रिस्तपूर्व ३०९०. कलियुगाचा आरंभ ख्रिस्तपूर्व ३१०० असा परंपरेने नोंदलेला, या आकड्यांच्या सर्वसामान्य गणितीय परिभाषेने किती तंतोतंत जुळतो ते पहा. थोडक्यांत, तांत्रिक आणि अनेकविध स्रोतांमधून उपलब्ध प्रत्यक्षदर्शी पुराव्यांवरून आपण, परंपरेनं गृहित आणि मान्यताप्राप्त कलियुगारंभ हा सहाभारत युद्धाच्या अगदी समीपकाल अश्या निष्कर्षाप्रत अगदी सहज पोहोचू शकतो. आणि या भरपूर पुराव्यानं कृष्णाचं ऐतिहासिकत्व निर्विवादपणे सिद्घ होतं. इति.. Prof. N.S. Rajaram www.swordoftruth.com September 4th, 1999 :

कृष्ण.. ’इतिहास की पुराण ?

कृष्ण.. ’इतिहास की पुराण ?’ "वेदकाळाच्या अखेरच्या कांही वर्षांत, श्रीकृष्ण हा एक ऐतिहासिक पुरुष अस्तित्वांत होता. पारंपरिक भारतीय पुरावे हे या विधानाला पुष्टी देणारे आहेत. पण पाश्चिमात्य वसाहतवादी आणि धर्मप्रसारकांनी मात्र या ’इतिहासा’ला वेगळं रंगवत त्याचा विपर्यास करण्याचाच सातत्यानं प्रयत्न केला. ’इतिहास की पुराण ?’ आपण सगळे भारतीय, आणखी एक कृष्णजन्मोत्सव साजरा करायच्या उंबरठ्यावर असतांनाच, एक प्रष्ण, जो सगळ्यांच्याच मनांत खदखदत असतो: कृष्णकथा ऐतिहासिक की पौराणिक ? भारतीय हिंदूंच्या तृषार्त आत्म्यांची पोकळीं व्यापण्यासाठी कृष्ण ही निर्माण केली गेलेली केवळ एक प्रतिमा ? या प्रष्णांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न... एक आदरयुक्त प्रेम, ओढ, असोशी यांनी व्यापलेलं व्यक्तिमत्व म्हणून कृष्ण हे भारतीय परंपरा आणि इतिहास या मधे आजवर, अबाधित राहिलं आहे. वसुदेव-देवकीनंदन आणि यादवकुळाचा राजपुत्र असलेला कृष्ण, बहुतेक हिंदूंनी, विष्णुअवतार म्हणून ग्राह्य धरलेला असतो. पण आजच्या वैज्ञानिक आणि तंत्र्ज्ञानाच्या प्रगती नंतर, अगदी हिंदूंना सुद्धा, कृष्णाच्या खर्‍या अस्तिवा किंवा नास्तित्वाबद्दल जाणून घेण आवडेल. कृष्णाच ऐतिहासिकत्व जाणून घेण्याची इच्छा, प्रक्रिया हे कांही नवल वाटण्याजोग आहे असं मुळीच नाही. संशोधक-विद्वान गेली जवळपास दोन शतक या माहितीचा वेध घेताहेत. विशेषत:, जेंव्हापासून कांही युरोपीय संशोधक, लाखो-करोडो भारतीयांचा हृदयस्थ असलेल्या या प्रतिमा-परमेश्वराच्या श्रद्धेचा मागावर आहेत. त्या संशोधकांनी निष्कर्ष काढला आणि त्यांना मानणार्‍या कांही भारतीयांनी सुद्धा तो स्वीकारला.. की कृष्ण हा प्रत्यक्षांत कधीच नव्हता आणि तो केवळ एक काल्पनिक भाकड आहे. एक अत्यंय उथळपणे काढलेला आणि बेगडी विद्वत्तेची झालर लावलेला निष्कर्ष होता तो. पण आतां या लेखमालेंतून श्रीकृष्णाच्या ऐतिहासिकतेबद्दलचे आणि हा इतिहास लवळपास पांच हजार वर्षांपूर्वीचा कसा आहे, याचे पुरावेच वाचायला तुमच्यासमोर आम्ही ठेवणार आहोत. महाभारत या महाकाव्यातल्या पात्रांबरोबरची त्या काळांतल्या दीडदोन शतकं असलेली श्रीकृष्णाची नाती, संबंध, संवाद जर आपन लक्षांत घेतले तर कृष्णाची ऐतिहासिकता आपोआपच प्रस्थापित होते, आणि कालख्डाच्या अचूकतेबद्दल म्हनायचं तर महाभारतांतल्या घ्टनाक्रमांचे उदाहरणार्थ युद्ध वगैरे.. नेमके दिनांक...तिथ्या म्हणूया हवंतर... निश्चित झाले की आपोआपच कृष्णाच्या आयुष्य़ाच्या तिथी आपल्याला स्थूलमानाने प्राप्त होतील. आअणि अशारितीनं मालखंदाची निश्चिती म्हणजेच त्याच्या ऐतिहासिकतेचा आणि पर्यायानं अस्तित्वाचा, पुरावा. लवळपास शतकभरापूर्वी, प्रसिद्ध बंगाली साहित्यकार बंकिमचंद्र चटर्जींच्या कृष्ण संदर्भांतल्या लिखाणांतून प्रकाशांत आलेल्या आणि पुतातत्ववेत्त्यांच्या संशोधनानं पुष्टी दिलेल्या बाबी मला मार्गप्रदीप ठरल्या आहेत. कृष्णाचा मागोवा घेत असतांनाचे कांही पुरावे: कृष्णद्वैपायन किंवा वेदव्यास म्हणजे आपल्याला आज ज्या स्वरूपांत माहीत आहेत त्या चार वेदांच्या निर्मितीला प्रेरणाभूत असलेल्या व्यक्तिमत्वाची धाकटी पाती म्हणजे कृष्ण, एक वेदकाळांतली विभूती होती, असं भारतीयांकडे उपलब्ध असलेली माहिती सांगते. व्यास अर्थातच अगदी प्रारंभीच्या आणि मूळ महाभारतकथेचे कर्ते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या व्यासकृत महाभारतांतल्या कालखंडातल्या कांही पात्रांची नांव, उपलब्ध असलेल्या, पांच हजार वर्षांपूर्वीच्या, तत्कालीन लेखांमधून किंवा हरप्पनकालीन शिक्के यामधून उजेडांत आली आहेत.उदाहरणार्थ, व्यास-शिष्य पैला, कृष्णाचा स्नेहसखा अक्रूर, वृष्णी, कृ्ष्णाचे पूर्वज यादव, श्रीतीर्थ, म्हणजे द्वारकेची तत्कालीन संज्ञा, वगैरे. या सगळ्या अभ्यासाला छेद देणार्‍या कांही बाबी म्हणजे, अठराव्या शतकांतल्या, कांही ’विद्वानां’नी प्रसृत केलेल्या कल्प कथा.. म्हणजे आर्यांच भारतीय भूखंडावरचं आक्रमण. सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी जेंव्हा मोहंजओदरो-हरप्पाचं उत्खननं होवून प्राचीन अवशेष उजेडांत यायला लागले, तेंव्हा या ’कल्पकथे’ला आणखी एक पुरवणी जोडण्यांत यायला लागली, ती म्हणजे आर्य आणि द्रविड यांचं युद्ध. पुरातत्व संशोधनोत्तर, विज्ञानानं आता या दोनीही बाबी नाकारल्या आहेत. आपल्याला आतां माहीत आहे की हरपा संस्कृती वेदकालानंतर उदयाला आली. विख्यात व्याकरणकार पाणिनीच्या ग्रंथांत, महाभारतांतल्या अनेक पात्रांचा उल्लेख आहे. उदाह्रणार्थ: वासुदेव म्हनजे कृष्न, अर्जुन, नकुल, कुंती वगैरे. वेदकालीन साहित्यकृतींमधे, महाभारतांतली पात्र जागोजागी आढलतांत.. कथकमधे विचित्रवीर्य, शिखंडी, कौशितकीमधे यज्ञसेन, ब्राह्मण, ऐतरेय ब्रह्मणमधे अभिमन्यूचा नातू जनमेजय आणि शतपथ ब्राह्मणमधे परिक्षित... आणि ही यादी न संपणारी आहे. बौद्धिक साहित्यांतल्या कुणाल जातकामधे, भीमसेन, अर्जुन, नकुल सहदेव आणि युधित्तिल.. युधिष्ठिर चं पाली रूप.. यांच्या बरोबर, कृष्णा, म्हणजे द्रौपदीचाही निर्देश आढळतो. कुरु जमातीतला धनंजय आणि द्रौपदी यांच्या स्वयंवराचा उल्लेख धुमकरी जातकांत पाहायला मिळतो. याच कृतींत, इंद्रप्रस्थाचा युधिष्ठिर, कौरवांचा पूर्वज म्हणून, आणि विदुरपंडित यांचा उल्लेख आहे. शिवाय महाभारतांतली, कृष्णासह वर उल्लेखिलेल्या पात्रांचा उल्लेख, सूत्रपितक, ललितविस्तार आदि बौद्ध साहित्यकृतींमधे आढळतो. हा उल्लेख कृष्णा आणि त्याच्या उपदेशाबद्दल फारसा आदरपूर्वक किंवा निर्मळ नसला तरी, तो तिथं अनिवार्य म्हणून आलेला आहे हेंच मुळी, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या ऐतिहासिकतेच्या स्वीकाराचं द्योतक आहे. त्या साहित्यकारांनी त्याचं महाभारतांतलं अस्तित्व नाकारलेलं नाही. वेदांकडे परत एक दृष्टिक्षेप टाकतांना, छंदोग्य उपनिषिदामधे, कृष्णासंदर्भांत एक अत्यंत रोचक उल्लेख आढळतो. ’देवकिनंदन कृष्णाला घोर अंगिरस म्हणतो..मला तुझ्या आश्वासनांनी तृषामुक्त केलय’ आणि प्राण असेपर्यंत त्यानं फक्त, ’तू अ क्षत.. अविनाशी, अच्युत..कालातीत, आणि प्राण संहित,.. जीवनप्रवाह.. आहेस’ या त्रिसूत्रीचीच आराधना केली. देवकीनंदन कृष्ण म्हणजे अर्थातच महाभारतांतील कृष्ण. भगवद्गीतेमधे नंतर कृष्णानं केलेला उपदेशाचं मूळ त्यानं घोर अंगिरसाकडून देदांविषयीचं ज्ञान मिळवितांना, केलेल्या विश्लेषण, विचार, चर्चा, त्यातून विकसन पावलेल्या संकल्पना याम्त असावं. गीता म्हणजे आपण सर्व उपनिषदांचा अर्क किंवा गाभ्याचासांख्य तत्वज्ञानाच्या प्रकाशांत घेतलेला वेध म्हणू हकतो. आणि उल्लेखनीय बाब म्हणजे गीतेचं हे मूळ घोर अंगिरसाच्या शिकवणींत आहे हे एका हरप्पन लेखांत नमूद केलेलं आपल्याला आढ्ळतं.. तो संदेश असा, ’घोर: दाता: द्वयु: अर्क:, म्हणजे घोरानं दिलेले दोन घनपाठ..पहिला उपनिषदं आणि दुसरा सांख्य तत्वज्ञान. म्हणून, भगवद्गीतेंत श्रीकृष्णानं सांगितलेल्या, वेदांत आणि सांख्य तत्वज्ञानाच्या संमीलनाचा शिल्पकार, ख्रिस्तपूर्व तीन सहस्रकाच्या कालखंडांत असलेला घोर अंगिरसच होता. महत्वाची नोंद घेण्याची बाब म्हेणजे हरिवंश किंवा भागवताप्रमाणे, उपनिषिदं, जातकं, सूत्र, किंवा ब्राह्मण ऐतिहासिक परंपरेचे भाग नव्हते. त्यामुळं नामोल्लेखांच कारण केवल केवळ, ती परिचित असणं एवढाच असूं शकतो. इतक्या विविध कालखंडांत लिहिल्या गेलेल्या अनेक बहुआयामी ग्रंथांमधे जेंव्हा कृष्ण आणि महाभारतांतली इतर पात्र यांचा उल्लेख सर्वसंचारी असा उपलब्ध होतो तेंव्हा, त्यांच्या ऐतिहासिकतेबद्दल किंचितशीही शंका कुणी उपस्थित करूं नये. आतां कृष्णाच्या अस्तित्वाच्या कालखंडाच्या अभ्यासाकडे आणि संशोधनाकडे पाहूं..

Wednesday, April 10, 2013

एका परदेशी पर्यटकाला दिसलेली वस्तुस्थिती

या लेखांतला मजकूर, पचनी पाडायला जरा जडच जाणार आहे वाचकांना. पण वस्तुस्थिती, एका परदेशी पर्यटकाला...इतिहासांत नाही तर अगदी दोन-तीन वर्षांपूर्वी... दिसलेली, त्यानं अनुभवलेली आहे ही ! आणि वाचल्यावर तुम्ही कदाचित सहमतही व्हाल लेखांतल्या प्रत्येक विधानाशी. कारण सगळच वर्णन, त्या अवस्थेमागची कारणं, लाजिरवाणी आहेत, आपल्यासारख्या ’भारतीय’ म्हणवणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी ! सीन केली हे त्या पर्यटकाचं नाव आणि त्यनं नोंदविलेल्या अनुभवांची सूची, कोणताही पूर्वग्रह न बाळगता नजरेखालून नुसता न घालता, त्यावर, तुम्ही आम्ही, आपण सर्व ’भारतीयां’नी अंतर्मुख होवून विचार करेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. त्यानं नोंदविलेलं सगळच ’घृणास्पद’, ’किळसवाणं’, ’निंदनीय’ निर्विवादपणे आपल्याला ठाईठाई पाहायला मिळतय आणि आपण सगळे राजकारण्यांनी दिलेले ’अति लोकशाही’चे नशीले मूग गिळून ’गप्प’ बसलो आहोंत. पण या कदवट सत्याला आपण ’डोळे उघडून’ सामोर जायलाचं हवं..आणि परिवर्तनासाठी वचनबद्ध. कटिबद्ध व्हायलाचं हवं ! सीन्‌ केली आपल्या ’नोंदवहीं’त लिहितो.. तुम्ही जर भारतीय किंवा भारतीय वंशाचे असाल तर, मी आधीच तुम्हला सावध करतो, आणि मला जाणीव..नाही खात्री आहे की मी जे लिहीत आहे ते तुम्हाला मुळीच रुचणार नाही. पेण या लिखाणांतल्या कठोर शब्दांपेक्षा त्यामागच्या मित्रत्वाच्या नात्यानं दिलेल्या सल्ल्याची दखल तुम्ही घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तुमचा असा एक मित्र की जो अतिशय प्रामाणिकपणं आणि कळकळीनं कांही विदारक सत्य तुमच्यापुढं ठेवतो आहे. आणि अखेरीस पाश्चात्य संस्कृतीच्या दुराभिमानानं, आंधळेपणानं, मी हे सर्व नोंदवत आहे असा गैरसमज कृपया करून घेवू नका. कारण तुम्हा भारतीयांना सद्यपरिस्थितीचं भान असूनसुद्धा तसचं राहायची आणि गर्तेप्रत जायची इच्छा असली तर मी कोण बापडा, वेगळं कांही सांगू इच्छिणारा ? तेंव्हा तुम्हाला जे रुचेल पचेल ते ध्यानांत घ्या आणि बाकीचं सोडून द्या. त्यामुळं काहीही बिघडणार नाही, याहून जास्त. कारण माझ्या असंलक्षांत आलय्‌ की भारतीय विशेषत: ’उच्चभ्रू’ भारतीयांना कशाशीच काहीही घेण नाहिये ! आणि निम्न-स्तरांतल्या गरीब जनतेला खरं तर, जगाला आदर्श वाटावा असा या भारतभूचा समृद्ध वारसां , उच्च संस्कृती, परंपरा माहीतही नाहीत किंवा त्या जाणून घ्यायला, रोजची भ्रांत भागवता भागवता वेळंही नाही. असो.. तरी पण... भारत हा सर्वतोपरी एक ’गोंधळ’ आहे. इतक सोपं वर्णन होवू शकतं, इथल्या एकुणातल्यां (अ)व्यवस्थेचं...पण त्यांत सुद्धा गुंतागुंत आहे...सुरुवातीला आपण भारताचे चार मूलभूत प्रष्ण बघू. ज्या ’चांडाळचौकडी’कडे, भारताला प्रगतीप्रत यात्रेला साखळदंडानं जखडून ठेवण्याची शक्ती आहे..मग इतर कांही मुद्यांकडे वळू. प्रदूषण..मझ्या मते सर्वप्रथन या बद्दल बोलायला हवं. केरकचरा, पाऊस नसतांनासुद्धा ओल्या खरकट्याच्या कुजलेपणानं चिलटं,, डास, माश्या, झुरळं आणि पर्यायानं उंदिर, घुशी, पाली आदिंच्या प्रादुर्भावाला उत्थापन देणारा दमटपणा धूर ओकणारी वाहनं, काय ’वाट्टेल ते’....अगदी नर-जनावरंचे मृतदेहसुद्धा...टाकलेल्याआणि ’तरंग’रूपानं आपल्या दृष्टीस पाडणार्‍या नद्या, नाले, ’उतून,उचंबळत’ आपली वाट सोडून रस्त्यावरून वाहणारे सांडपाण्याचे. मल-मुत्राचे किळसवाणे, दुर्गंधीयुक्त ’ओघाळ’, विनाकारण केवळ विकृत आनंदासाठी वाजवले जाणारे कर्ण करकश ’भोंपू’..मला कळत नाही की हा कुठल्या संस्कृतीचा भाग असूं शकतो का पण या आधी मी तो कधीही आणि कुठेही अवुभवलेला नाही. पंचतारांकित विश्वकीर्त ’ताज’ हॉटेल्‌च्या दरवाज्याला लागून, ’असह्य’ दुर्गंधी, क्षणोक्षणी हवेंत उधळणारा टाकाऊ वस्तूंचा ढिगारा असावा ? हाय रे दुर्दैवा..बाहेर आल्यावर आंत घेतलेल्या, आदरातिथ्याचा ’ताज्‌’या अनुभवाला छेद देणारा हा ’अतिप्रसंग, पर्यटकांनी कां म्हणून सहन करावा ? कांही कमी प्रमाणांत पण दिल्ले, बंगलोर, चेन्नईंतही ह्या ’वातावरणा’मुळं मला शारीरिक त्रास...सायनस्‌, कर्णपटलावर दुष्प्रिणाम,, अपचन, पोटांत ढवळणे यासारखे..सहन करावे लागले. शेण.. मग त्या बकरीच्या लेंड्या असो की गाई-म्हशींच उत्सर्जन किंवा मानवी विष्ठा..हा एक ’सर्वदूर मार्गप्रदीप भारतीय’ अनुभव. त्यांतून प्रेक्षणीय(?) स्थळां सभोवताली तर केवळ ’अवर्णनीय’ अगदी शब्दश:..परिसर ! रस्त्यांच्या मधोमध मुत्र्या, संडास, ते सोडून इतरत्र ’उत्सर्जन’ करू पाहाणारे बापडे, बाया... काय काय म्हणून सांगू ? शहराच्या जरा बाहेर पडाव आणि ग्रामीण भाग लागावा तोंच आढळतांत प्लस्टिक्‌च्या पिशव्यांनी जवळजवळ ’तुंबलेले’ रस्ते. रस्ते कसले हव्यातशा बांधलेल्या घरांच्यामधून दिसणार्‍या पायवाटा. अन्‌ हवेची शुद्धता ? शुद्धता कशाशी खातांत हे इथल्या हवेला अभावानच माहिती असावं बहुधा ! वाहनं जो धूर ओकतांत त्यांतल कर्बाचं आणि शिशाचं प्रमाण हे इतकं घातक असतं की, ते किती हितकारी आहे या पेक्षा ते किती घातक आहे याचंच मोजमाप घ्यायला हवं. ग्रामवासीच काय पण शहरी ..’नागरी’ जनतासुद्धा रस्त्यांवर हवा तो, तसा आणि तेंव्हा विविध प्रकारचा कचरा फेकत असतांत. . त्यांतल्या त्यांत दोन शहरं.. एक म्हणजे केरळ राज्याची राजधानी त्रिवेन्द्रम्‌ आणि दुसरं कालिकत... ही त्यांतल्यात्यांत स्वच्छ आणि ’सुसह्य’ वाटली. मला माहीत नाही, पण भारताच्या उत्पादक आणि उद्योजक शक्ती ताकद आणि क्षमता या सर्वांवर या सगळ्याचे दूरगामी परिणाम, जर परिस्थिती अशीच राहिली तर, निश्चित होतील. जुनाट, अनावश्यक, अडगळ सदृश परंपरांच्या आणि अंधश्रद्धेच्या विळख्यांत अडकलेल्या या देशाला. सर्वप्रकारचं प्रदूषणांतून मुक्ती कशी मिळणार हा एक मोठा प्रष्ण आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा.. आवश्यक आणि अनिवार्य सुविधांची उपलब्धता. रस्ते, रेल्वे, बंदरं आणि विद्युतीकरण. विजेचा अखंद लपंदाव हा एक अत्यंत विनोदी आणि उद्विग्न करणारा प्रकार इथं अनुभवायला येतो. बहुतेक सर्व जनसामान्य त्यांनी किंमत मोजलेल्या विजेपासून दिवसेंदिवस वंचित असतांत. ताचा उत्पादकतेवर थेट परिणाम होऊन ती घटणारच ना ? (क्रमश:) *** भाग २ बंदरांमधली जुनात, बाबा आदमच्या काळांतली कालबाह्य यंत्रणा, आधुनिक तंत्रिक सुधारणा झालेल्या जगांतल्या, ’कंटेनर्‌’ हा्ताळ्ण्याची क्षमता असलेल्या बंदरांशी कशी स्पर्धा करणार ? रस्त्यांची अवस्थासुद्धा याहून कांही वेगळी नाही. माझ्या प्रवासा दरम्यान मी थायलंडमधे, जो देश युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेंत खूप मागसलेला सनजला जातो, तिथं फक्त, स्तरवृद्धी करून तयार केलेले, सर्वसामान्य रहदारीला बाधा न आणणारे. जवळजवळ दोनतृतियांश भूमीला सेवा देणारे असे द्रुतगती किंवा महामार्ग बघितले. आणि इथं ? एकेरी वाहतूक असलेले महामर्ग अभावानेच, वाहतूक नियमांची, जनतेनं केलेली ’ऐसी की तैसी’, रहदारीच्या नियमांची अंमलबजावणी करण्याबाबतची प्रशासनाची उदासीनता. भ्रष्ट पोलिस-यंत्रणा, अंतर कापायला लागणारा तिप्पट वेळ, तीसतीस वर्ष जुन्या, देखभाल नसलेल्या, कार्बन्‌ मोनॉक्साइड्‌च्या विषारी फुफुसांना अत्यंत घातक धुराचे लोट आणि ऊष्ण बाष्फ ओकणार्‍या बसेस्‌.. यादी कमी आहे ? जो जो भारतीय, रेल्वेनं प्रवास करतो तो अत्यंत त्रासलेला असतो.. संतापजनक प्रकार असतो सगळा ! गेल्या पांच वर्षांत तर स्थिती आणखी बिकट झाली आहे, इतकी की पर्यायानं तिचा परिणाम मनुष्यबळाच्या क्षमतेवर आणि परिनामत: उत्पादकतेवर दिसणं अनिवार्य आहे. नुसती चुकशी करायला, खिडकीपर्यंत पोचायला अर्धा अर्धा तास घालवावा लागावा ? चारचार, पांचपांच दिवस आधी आरक्षण ’तुडुंब’.. मग काय करणार ? बिचारे प्रवासी, त्या भयानक अवस्थेंतल्या ’बस्‌’ नांवाच्या वाहनांत ’बस’तांत. दररोज जवळपास पांच कोटी भारतीय आणि अन्य प्रवासी दाखल होतांत रेल्वेंत प्रवासहेतु ! पांचशे प्रवासी तर रोज प्रतीक्षा यादींत असतांत. रेल्वे ही सर्वसामान्य जनांना परवडणारी आणि उपल्ब्ध सुविधा आहे इथं हे मान्य करायलाच हवं.अन गर्दी ? अबब ! स्वस्तातल्या विमान प्रवासाच्या आजकाल, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे फोफावलेल्या संधींमुळे ज्यांना परवडतो ते विमानप्रवास करतांत आणि मग उरलेली परचूटन ’जनता’ ?... ओथंबलेल्या रेवेच्या डब्यांतून अक्षरश: ढोरांसारखा प्रवास करते. पन ’कुणाला काय हो त्याचे ?’ रशिया, इज्रायल्‌ आणि अमेरिकेकडून शस्त्रखरेदीच्या, फायदेमंद ’उपद्व्यापा’पुढे, या देशाचं, इतर बाबींबाबत ’मंद’गती होणार सरकार, इथल्या नागरिकांच्या कल्यानकारी योजनांबद्दल आणि त्यांच्या अंमलबजावणी बद्दल किती गंभीर, कटिबद्ध आणि इच्छुक आहे याबद्दल मी खरंच साशंक आहे. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, जो दोन भागांत विभागला जावू शकतो, ज्याला, एखाद्या नाण्याच्या दोन बाजूं सारख्या आहेत, तो म्हणजे नोकरशाही किंवा ’कचेरी’शाही आणि भ्रष्टाचार. निवास व्यवस्थेसाठी तिप्पट रक्कम, भमणध्वनिसुविधेचं SIM मिळवण म्हणजे, लालफितीचा अतिरेक, कारण छायाप्रती, हे प्रमानपत्र तो परवाना... अरे रे.. या सगळ्या जंजाळांतून कुणी डोक शाबूत राहून बाहेर येन मुषकिल. अशी ही ग्राहक सेवेची कथा आणि व्यथा. रेल्वेची तिकिटे मिळणे ? आणखी एक दुरापास्त अनुभव. गाडीचा क्रमांक शोधा ...तीस मिनिटे..मग अत्यंत ’अवधड’ परीक्षेच्या प्रष्णपत्रिकेसारखा अर्ज भरा.. मग ती मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत राहाणारी रांग... खिडकी पर्यंत पोचायला कमीतकमी आणखी अर्धा तास..आणि एक क्षुल्लक चूक.. तिथल्या कारकुनानं दाखविली की परत, ’येरे माझ्या मागल्या’.. रांग-शेपटा शेवटी ! सरकारला धनिकांच्या लांगूलचालनापुढे, किंवा स्वत: श्रीमंत होण्याच्या गडबडींत, सर्वसामान्यांचे प्रष्ण जणू कांही जाणवत नाहीत किंवा ते त्यांच्याकडे काणाडोळा करतय्‌. उदाहरणार्थ, नगरपालिका धनिकवस्तींत स्वच्छतेच्या इतक्या सुविधा पुरविते की सामान्य वस्त्यांमध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ, मनुष्यबळ पैसा आणि सर्वांत शेवटी.. इच्छाशक्ती अभावानंच असते. सरकारी पगारावर पोसणारे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालयांत बहुश: हजर नसतांत कारण ते खाजगी व्यवसाय करण्यांत व्यग्र असतांत आणि रुग्णालयांत, सेवेकर्‍यांची संख्यासुद्धा पुरेशी नसते. मी आणखी कांही काळ बदलाची वाट पाहाण्याच्या मताचा होतो पण इथल्या नागरिकांनाच कशाची खंत वाटत नाहीत आणि बदल करण्याची त्यांची मानसिकताही मला जाणवली नाही.. भारताची आर्थिक राजधानी मुंबई,म्हनजे घाणीचं साम्राज्य, जिथं गलिच्छ झोपडपट्ट्या,, गरिबी हे माणुसकीचे शत्रू सर्वदूर माजलेत. कल्पनेपलिकडच्या अशा व्हिएतनाम किंवा इंडोनेशियामधल्या शहरां(?) इतक्या किंवा किंबहुना जास्त. अतिप्रदूषित मेदान हे सुमात्रामधल ठिकाण पण सगळ्यांय मोठे उंदिर आणि घुशी मी फक्त मंबईतच पाहिले बुवा ! मागासलेपणा ? मी समजू शकतो की जिथं नोबेल्‌पुरस्कार विजेते, अणुवैज्ञानिक, विख्यात अर्थशास्त्रज्ञ, समृद्ध उद्योगांचे जनक हे जन्म घेणं दुरापास्त आहे अशा ठिकाणी मला नवल वाटलं नसत. पण भारतांत हे सगळ आहे आणि भारतियांनी हे सगळ मिळवलय. पन अंतिम चित्र ? नुसतं धूसर नाही तर अंध:कारमय ! श्रीमंतांची काम करायला गरीब आहेतच आणि ते गरीबच राहाताय्‌त त्यामुलं ही दरी अशीच वाढत जाणार, रुंदावत जाणार. भातराकडे आणि भारतीयांकडे जगाला देण्यासारख पुष्कळ आहे... पण माझ्या आयुष्यांत हे ’देण’ बघण्याची, भोगण्याची मनिषा कितपत राहील याबद्दल मी साशंक आहे. मला तुम्ही हवंतर पाश्चिमात्य सांस्कृतिक सरंजामशहा म्हणा, किंवा वाया गेलेलं पोट्ट म्हणा, पण त्याच वेळी हेही लक्षांत घ्या की इथियोपिया सह, जगांतले जवळपास प्न्नास देश मी पालथे घातले आहेत एक पर्यटक म्हणून..आणि कुठेही, इथल्याइतक्या तक्रारयोग्य बाबींची भलीमोठी यादी मी वाचल्याचं मला स्मरत नाही. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे निष्क्रीय आणि अनिच्छासक्त आणि स्थितिप्रिय भारत !! ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar .

Monday, April 8, 2013

थोरांचे थेर

थोरांचे थेर आजकाल सजग वृत्तवाहिन्यांमुळे सगळं जग, हीना-दीनांच, एकसमयावच्छेदेकरून, आपल्या दिवाणखान्यांत क्षणोक्षणी दाखल होते असतं. अगदी ’चक्षुर्वैसत्यम्‌’ स्वरूपांत. फक्त इथं चक्षू असतो छायकाचा, कधी उघड तर कधी ’तहलका’ पद्धतीचा.. ’छुपा’ यांतलं दीनांच्या जग बहुतेक प्रेक्षकांना माहीत असतं कारण ते, म्हणजे जनसंख्येनं जवळपास ७५ ते ८० प्रतिशत, सर्वसामान्यांचं जिणं जगत असतांना त्या जगाचांच एक घटक असतांत. त्यामुळं त्यांना त्याचं अप्रूप नसत. फक्त ती समवेदना, समदु:खी बघून स्वत:च दु:ख हलकं करण्याची एक सुविधा म्हणून सुस्कारे सोडीत, चुक्‌चुक्‌ करीत, असले कार्यक्रम किंवा वृत्तांकनं बघितली जातांत. पण हीनांचं, म्हनजे हीन प्रवृत्तींचं दर्शन अशा वृत्तांकनांतून घडतांना, या हीन प्रवृत्तींच्या सीमा जेंव्हा थोरामोठ्यांपर्यंत विस्तारलेल्या समोर येतांत, तेंव्हा मात्र हे ’दीन’ थक्क होतांत’ ज्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती, प्रीती, नाती बाळगलेली असतांत ते, ’अशा’ प्रकरणांत गुंतलेले पाहाणं खूप कठीण होतं सर्वसामान्य जनांना ! कांही उदाहरणं... आनंदांत कसे जगावे किंवा जीवनांत कसे यशश्ची व्हावे वगैरे, जनसामान्यांच्या ’स्वप्नां’ना पंख देण्यासाठी , सुरुवातीस छोट्या समूहांसमोर, शब्दसांभार उधळून, जखमेवर फुंकर मारल्यासारखे करणारे एक बाबा, पुढेपुढे, जरा नांव कमवायला लागल्यावर, मोठमोठ्या सभागृहांमधे देशांत प्रमुख शहरांमधे, किंवा परदेशांत, मसीहा असल्यासारखे हिंडायला लागलेले पाहिले आणि माझ्या मनांत एक विचारांचं वादळ उठलं. हे ’बाबा’ शहरांत किंवा परदेशी जिथं, धनिकांची वस्ती जास्त आहे अशीचं ठिकाणं कां बरं निवडत असावेत ? कारण, ’जिथं संपत्तीचा पूर आणि अति श्रीमंती, तिथ कायमच हुरहूर आणि भीती’ हे सर्वमान्य वैश्विक विधान ठरावं इतकं सत्य आहे ! रोजी-रोटी कमावण्यासाठी कांहीच कष्ट करावे लागत नाहीत, मग करायचं काय ? मग सगळी ’करमणूक’ क्षेत्र ढुंदाळून झाल्यावर ही धनिक मंडळी कधीकधी वेळ घालविण्यासाठी असल्या बाबाफिबाच्या मागं लागतांत. पुढेपुढे अशा बाबांच्या प्रवचनांना उपस्थिती, ही एक प्रतिष्ठेची बाब होवून बसते आणि मग हे (संधि)साधू आपले ’रंग’ दाखवायला सुरुवात करतांत, आश्रम काढतांत, अध्यात्मिक दौरे आयोजित करतांत, वनुअषधींच्या नांवाखाली अनेक घातक गोष्टींचा चक्क ’व्यापार सुरू करतांत. हे आपन सगलं जवलपास रोज ऐकत वघत वाचत असतो. जनावरांच्या गुरकावण्यापेक्षा जशी हाकार्‍यांचीच आरडाओरड जास्त असते तसंच काहींसं खर्‍या विभूती आणि शिष्य़गणं(ग) यांचं असत. ते बिचारे अशा, त्यांच्यातल्या कांही अनिष्ट प्रवृत्तीच्या ’भोंदूंमुळे नाहक बदनाम होतांत प्राचार्य कै> राम शेवाळकर हे माझे ज्येष्ठ मित्र, समुपदेशक, विद्वान सल्लागार वगैरे.. त्यांचं एक वाक्य माझ्या कायम स्मरणांत आहे. ते म्हणायचे, ’लोकं आपल्याबद्दल बरं वाईट बोलतांत ना ? बोलू द्यावं त्यांना.. आपलं काम आपल्याबद्दल खरंखरं काय ते बोलतं.. बोलतं त्यापेक्षा दिसतं !’ अशा वक्ता दशसहस्रेषु व्युत्पन्नाच्या काळांत त्यांचा सहवास लाभावा, ओघवतं ओजस्वी अस्खलित वक्तृत्व कानावर पडाव आणि आज ते गेल्यावर कांही वर्षांतच ’वक्तादशसहस्रधारे शू’ अशा नेत्यांचे जनसामान्यांना बोल लावणारे बोल कानी पडावे ? हाय रे दुर्दैवा !! थोरांचे का हो ’असे’ अखेरिस होते ? थेरांचे त्यांच्या अवडंबर माजते कुणि सनई त्यजुनी सुंद्री फुंकित बसतो अन्‌ मृदंग सारुन टिमकी बडवित गातो सूर्यास दावुनी ’पाठ’ उजळु जग पाही जलधीची सोडुन साथ. ओंजळित राही कपिलेस जखडुनी कुणी वराहा पुजितो रुप्प्याचे ढकलुनि पात्र करटि चाटितो कुणि अभिनय करतां खराच ठोसा देई किंवा कोणाला कवळुन ’बोसा’ घेई विस्मरुनि वास्तवा तसाच वाहवत जाई कां भुरळ घालते ’अतिरेका’ची घाई ? मग अश्रू ढाळित भीक दयेची मागे आढ्यता प्रतिष्ठा तोडुन सगळे धागे कुणि संस्कारी, कुणि साक्षात्कारी विभुती फासते अंगभर कुणी राख अन्‌ माती वर जाता माया, मोह खेचती खाली बदलते क्षणांतच देहाची अन्‌ बोली भक्तांच्या भावा, ’जोगी’ दाखवि धुनी मग चिलीम फुंकित हसतो सगळे लुटुनी वरकरणी निगर्वी, शांत नि भोळा, साधा, जरि हात जोडि.. तो असतो भाई, दादा उच्चपदस्थ कांही कमरेखाली ढिले वलयाला त्यांच्या असती जन भुललेले स्वग्रामी जाता, कुणी वीर वा नेता कांपतांत नवत्या पोरी न्हात्या-धुत्या कुणि नशा नसेंतच टोचुन घेई ’हस्ती’ कुणि मारझोड करि ’टाकुन’ बरीच ’जास्ती’ हे कतघ्न ढकलिति शिडीस अगदी सहज, कां चढतो यांना यशश्वितेचा माज ? कुणि वनांत जाउन उगा मारे चिंकारा ’कायदा ? काय ? कोठला ?’ लाज ना जरा.. कुणि ’धुंद’ होतं वेगाने हाके वाहन पदपथावरिल ’गरीबां’ला देई मरण मग उजेडांत हा येता प्रकार सगळा, तर्जनी घालतो मुखांत ’साधा भोळा’ ’जनहितार्थ अर्जी ’ होते दाखल कोठे ’तो’ देई वकील लढण्या मोठेमोठे न्यायमंच बसतो, शोधित साक्षि पुरावे, ’तो’ निवांत हसतो ’बॉलीवुड’च्या गांवे कुणि करूं पाहातो दुष्कालावर ’विधी’ अन्‌ अनुदानाचा सहजच निगळे निधी की खुर्ची यांच्या जिभेस देई वेगा ? अन्‌ निलाजरे जन कां हो हसती ? सांगा ! कारणे सांगती जनवृद्धीची ’भारी’ ही वांती झाली इंदापुरिच्या द्वारी कुणि नेता कांही बाहीं सभेत बोले’ थोबाड विचकुनी ’चमचा-समूह’ डोले कुणि ’गुर्जी’ ओढी शिष्या शेजेवरती दावया धाक कुणि आहे अवतीभवती ? किंकाळि वेदना घुमते हवेंत, विरते.. दाबाया ’प्रकरण’ सज्ज यंत्रणा येथे तोफां-रणगाडे ’खोक्यातुन’ कुणि मागे कुणि निलाजरा अध्यक्ष ’लक्ष्य’ अन्‌ भोगे चाटण्या लोणि ना हुतात्म्यांस सोडिति ? पिंडांचे गोळे आधाशि हे, ओरपती ! गल्ली ते दिल्ली असेचं चालायाचे ? गर्तेच्या खाइत स्वत:स गाडायाचे ? *****