Thursday, May 23, 2013

रमेश गोविंद वैद्य

रमेश गोविंद वैद्य संस्कारानं मित-मृदुभाषी, सहृदय, प्रसन्नचित्त, शिक्षणानं कायदेतज्ज्ञ वकील, व्यवसायानं जाहिरात संकल्पक, लेखक, वृत्तीनं सक्षम कवि-रुबाईकार असा आमचा मित्र रमेश गोविंद वैद्य..याचा परिचय मला करून दिला, आणखी एका सुहृदानं.. १९८०-८१ मधे बहुधा.. २३, मुकुंद निवास, डी.एल्. वैद्य रोड, दादर, या माझ्या मुंबईंतल्या वास्तव्याच्या ठिकाणी, ८० ते ८७ हा सातवर्षांचा कालखंड, आम्ही सर्वांनी श्रवण, दर्शन, घ्राण, रसना आदि ज्ञानेंद्रियांनी, म्हणजे त्वचेचा सहभाग फक्त रोमांच जाणिवेपुरतांच हं..अक्षरशः भोगलाय ! आम्ही म्हणजे कोण माहीत आहे..आजकालचे सगळे प्रथितयश.. डेबू देवधर, सुधीर मोघे, त्या काळांत माझ्याशी.. कां कुणास ठावकी.. पण खूप जवळीक साधून असलेला, म्हणजे किमान तसं अगदी बेमालूमपणे भासविणारा सुधीर गाडगीळ, अरविंद हसबनीस, चंद्रशेखर गाडगीळ, विलास आडकर आणि शिवानंद पाटील..या यादींतले तीघे आतां हयात नाहीत पण ते लौकीक जगासाठी.. आमच्या मनांत ते रुजलेत, वाढलेंत बहरलेंत आणि बरसलेंत.. शब्द-स्वरांच्या स्नेहमयी वर्षेंत चिंब भिजवीत.. अक्षरशः काव्यशास्त्रविनोदाचं वारं रोज अगदी पंचपंच उषःकाली..म्हणजे थोडक्यांत सगळ्या हस्ती जागृतावस्थेंत येवून माणसांत आल्यावर..वाहायला लागायचं.. मग जाऊन येऊन, सुरेश वैद्य, आनंद मोडक, श्रीकांत पांरगांवकर, चंदू काळे, सदानंद चांदेकर अणि पुण्यातले अनेक कलाकार.. उभरते, प्रथितयश.. स..ग्गळे. अगदी आदरणीय, सुप्रसिद्ध, जेष्ठ दिग्दर्शक राजदत्त सुद्धा एका रात्रीचा निवारा घेवून गेलेंत २३ मुकुंद निवासांत.. आणि विख्यात संगीतकार रामभाऊ कदम.. माझी पेटी घेवून, रात्री ११ ते पहाटे तीन पर्यंत.. लिहायला लागलं तर एक लठ्ठमुठ्ठ कादंबरी होईल या वास्तूवर.. असाच एक ‘दिवस’ रमेशला घेवून आला आमच्या त्या मठींत.. आणि, उंबरठा ओलांडल्या क्षणापासून रमेश मग आमच्या परिवारांतला एक होवून गेला. जशी सुधीरनं.. मोघेंच्या हं.. शब्दधून तीथं लिहिली, एका हिंदी चित्रपटासाठी गीतं रचली संगीतबद्ध केली, डेबू नागीण किंवा खानदान च्या छायाचित्रणांत व्यस्त असायचा, चंद्या गाडगीळनं बाकीशब्द आणि कांचनसंध्या स्वरांकित केली, तशाच अनेक रुबाया किंवा अन्य काव्यप्रकारांच्या ज्योती, रमेशनं तिथं उजळल्या पाजळल्या.. त्याच दरम्यान त्याची ही कादंबरी, व्हिक्टोरिया टर्मिनस्, महानगर मधून प्रकाशित होतं होती. सगळ्यांना एकत्र सवड असेल तेंव्हा तो, क्रमशः प्रसिद्ध होणारं ते लिखाण वाचून दाखवीत असे. ‘यह मुंबइ मेरि जान’.. देणारी आणि चुकलांत माकलांत तर घेणारी सुद्धा.. अशा या मायामोहिनीचे नखरें आणि तिच्या त्या गुबगुबींत पंज्यामधे लपलेली नखं.. दोन्हीचं यथार्थ, रोमांचक वर्णन, रमेश ऐकवायचा आणि आम्ही अंतर्मुख व्हायचो.. कारण आमच्यापैकी प्रत्येकजण, पोटार्थी, रोजमरा की जींदगी जगण्याचा एक अविभाज्या भाग म्हणून.. त्या चरकांतून घाम गाळत थकलाभागला घरी.. त्या मठींत येत होतां..त्यामुळं ब-या जवळच्यांच्या जगण्याचा जणू आरसाच असल्याचा भास व्हायचा ऐकतांना.. रमेशला मी कधी, खिन्न, दुःखी, खंतावलेला पाहीलाच नाही इतक्या वर्षांत..कायम हसतमुख, प्रसन्नमुद्रा. पण कधीकधी अंतर्मुख, तंद्री लागलेला मात्र अनेक वेळां पाह्यलय त्या काळांत..ही तंद्री बहुतांशी अध्यात्मिक भासली मला.. उगा सृजनाचा आव आणलेली कधीच नव्हती ती.. कारण त्याच्या रचना सहजप्रसवा असतांत.. आयुष्याचे चढउतार, अनुभव, निरीक्षणं यांचं शब्दरूप असलेल्या.. या रचनांनी जशी मला भुरळ पडली ,तशीच, एका अतिशय संवेदनशील आणि कवितेच्या शब्दांमधल्या अध्याऋताची विलक्षण जाण असणा-या चंद्य़ाला.. चंद्रशेखर गाडगीळलाही पडली आणि रुबायांना अप्रतिम स्वरकोंदणं मिळाली. त्या काळांत, मुंबई दूरदर्शनची मेट्रोवाहिनी...म्हणजे दुसरा मनोरंजन-स्रोत.. सुरूं झालिवती. त्या वाहिनीसाठी मी या, प्रगल्भ पण उपेक्षित कलाकाराच्या रुबायांवर बेतलेले दोन कार्यक्रम केले. तसा वरकरणी.. आणि अंतःकरणीसुद्धा खरं तर..अत्यंत साधा सीधा, अगदी लक्षमणच्या कॉमन् मॅन इतका, फाटका दिसणारा हा माणूस, स्वरचित रुबाया सादर करायला लागाला की, जितक्या अलवारपणे तो एखाद्या छोट्या समूहाला मोहून टाकतो, तितक्याच सहजतेनं, पहिल्या दहा-बारा मिनिटांतच, कुठल्याही जाणकार वयोगटाच्या, पांचशे हजार प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करायला लागतो. आणि मग, रुबाई घाटाला साजेसे विविध विषय, प्रेमापासून प्रेतापर्यंत, भोगापासून वैराग्या पर्यंत, आणि कळ्यंपासून पुतळ्यांपर्यंत, कधी तिरकस फटकेबाजी करीत. कधी निष्ठुर सत्य सांगत आपल्याला अंतर्मुख करतांत, आणि प्रसंगी खळखळून हसायलासुद्धा लावतांत.. हे सगळ आज लिहायचं निमित्त म्हणजे, व्हिक्टोरिया टर्मिनस् चं वाचन होतय.. पुण्यांत. आणि या उपक्रमासाठी शुभेच्छा देण्यासाठी हा शब्दप्रपंच.. हा असाच मित्रा, राहिलं रेशिमबंध बकुळिच्या प्रमाणे खुलेलं वृद्धसुगंध देवून मालकी वार्धक्याचि फुलांना मग नवीन बीजां सांगू ‘फळा ! फुलाना !!’ हा मूलस्रोत मिळाला तुझ्याचं संगे जशि फुलता खुलता रुबाइ नकळत रंगे हा संगमर्मरी निवांत शब्द-निवारा, क्षण कसनुशिचे शोधतील मुकाट वारा आमचा हा आनंदी निरागस, निर्व्याज, निरपेक्ष जिवलग सखा, यंदा त्र्यहात्तरींत प्रवेश करतोय.. या वळणावर त्याला, निरामय आरोग्य, अभिष्ट चिंतून आणखी खूप, गूढार्थी शब्दलेणी, त्याच्याकडून पुढच्या काळांत मिळतील, अशी खात्री बाळगूया ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

Friday, May 17, 2013

दशसूत्री उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत (भाग २)

दशसूत्री उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत (भाग २) गेल्या सपताहांत आपण, नकारात्मकतेच्या व्याधींतून बाहेर पडण्याच्या, पांच सोप्या युक्त्या दृष्टीपथांत आणल्या, त्यांची दखल घेतली.. आज ऊर्वरित पांच उपाय, उपचारांचा विचार करूं.. ६..राहून गेलेल्या आणि करण निकडीचं असलेल्या कामांची यादी, स्मरणपत्र म्हणा हवं तर.. जमेल तिथं, घरांत जागोजागी, लावा.येताजाता तुमच्या नजरेस ती वारंवार पडेल याची काळजी.. नाही नाही,, खात्री वाटली पाहिजे. जेवणाचं मेज, शीतपेटी, आरसा, बेसिन वरचा, कपाटावरचा, प्रसाधन मेजावरचा.. ज्याला आपण मराठींत, ड्रेसिंग् टेबल् म्हणतो.. दरवाजामागे, पुढे. वाहनाचं इप्सित-स्थल-मार्गक्रमण-सुविधा चक्र.. म्हणजे आपलं स्टिअरिंग् व्हील् हो... अशा या कांही जागा तुम्हाला, सहज सुचल्या म्हणून सांगतोय.. काराण नजरेआड ते मनापल्याड गेलंच म्हणून समजा.. म्हणून हा खटाटोप. कामं ठेवा नजरेसमोर अन् वावरा बिनघोर.. जोडीला, गंमत म्हणून, ती कामं व्हायच्यी आधी आणि नंतर तुमचा चोहेरा, अनुक्रमे, कसा होता आणि होईल हे दर्शविणारी व्यंगचित्र लावा..पहा ती तुम्हाला आपोआप उत्तेजना देतांना तुमच्या ओठांवर एक हलकी स्मितरेषा फुलवतांत की नाही ते.. ७..मित्रमंडळींबरोबर कुटुंबियांसमवेत, तुमच्या, नजीकच्या भविष्यांतल्या उद्दिष्टांबद्दल सतत च्रचा. निचार विनिमय, सल्लामसलत सुरूं ठेवा..हेतू जाहीर करा..त्यामुळं आपोआपच तुम्हाला ते साध्य करण्याच्या जबाबदारीची जाणीव व्हायला लागेलं, आणि त्या दिशेनं तुम्ही वाटचाल करूं लागाल. स्वतःबरोबर एक कार्यपूर्तता-काल-दर्शक करार करा, त्याच्या प्रती मित्रमंडळी कुटुंबिय यांना किंवा अन्य कोणीही, जे तुमचा उत्साह वृद्धिंगत करूं इच्छितांत, अशा सर्वांना वाटा. त्यापैकी झालेल्या कामांबद्दल, त्यांना मधूनमधून कल्पना द्या, अभिप्राय घ्या.. आणि कार्यपूर्तीसाठी स्वतःलाच कालमर्यादेचं रिंगण आखून द्या. ८. स्वतःच्या नाउमेदीला कुरवाळत बसूं नका. जेंव्हा जेंव्हा निरुत्साही वाटेल, तेंव्हा तेंव्हा त्या जाणिवेला लगाम घाला. सर्वसामान्यतः, ही एक सवय असते की आपले प्रष्ण सुटण्यात अडचणी येत असतील किंवा उत्तर मिळत नसेल तर त्या प्रष्णाच्यामानानं आपण स्वतःला अल्पकुवतधारक समजायला लागतो. हा अनुभव आपणापैकी बहुतेक सर्वांनी कधीनाकधीतरी घेतलेला असतो. त्यावर तोडगा म्हणजे.. मनातल्या नकारात्मकतेला तीलांजली देवून, त्यांच्या जागी सकारात्मकतेच्या बीजांची पेरणी करा. स्वतःला बजावा की हे प्रष्ण आपल्याला वाटतायत त्यामानानं खूपच क्षुल्लक आहेत. उदाहरणारथ, मला हे कसं जमणार.. मी यांतनं कसा बाहेर येणार.. असं रडत बसण्या ऐवजी, हे करणं मला अत्यंत आवश्यक आहे.. एकावेली एक अशा छोट्याछोट्या क्लृप्त्या शोधत मी ते कसंही करून मिळवेनच.. असं घोकत रहा. ९.. दीर्घ श्वास घ्या.. रात्री शांत झोप घ्या.. सकाळी उठून आन्हिकं उरकल्यावर एक छानपैकी Shower घ्या. आणखी एक युक्ती माहीत आहे..ब-याच वेळा कामास येते प्रातःकालीन वैचारिक गोँधळांत.. आदल्या रात्री, मेंदूची नैराश्यदायी विचारांनी चाळण केली असताँना, पोटाच्या स्नायूंची, श्वासाबरोबर, संथपणे, आंतबाहेर हालचाल करीत, योग सदृश व्यायाम करा. म्हणत रहा.. मी आता यानंतर मस्त ताणून देणार आहे. पूर्ण विश्रांती घेतल्यावरच उठणार आहे. उद्या जागं होतांना, या उद्वेगजनक मनावस्थेंतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक अशी अवस्था प्राप्त करण्यासाठी, मी प्रसन्न, ताजातवाना आणि उत्साही, गतीशील मानसिकता घेवून डोळे उघडलेले असेन. मग स्नानासाठी अंगाला जलधारांचा स्पर्श झाला की हळूहळू आपोआपच विचारांना सकारात्मकता, अडचणींतून सुटकेचं तंत्र, समोर उभ्या ठाकलेल्या प्रष्णांची उत्तरं.. सगळं माझ्याकडूनच प्राप्त होईल.. हे सगळ अनुभवा, आणि कोडी सुटल्यावर आणि कोँडी फुटल्यावर हा मंत्र तुमच्या मनोव्याघिग्रस्त आप्तेष्ट, मित्र-मैत्रिणींना देवून त्यांचा दुवा घ्या १०.. वाणीची, उच्चाराची शक्ती, ताकद, बलं फार मोठं असतं. मरा मरा, हे म्हणताम्हणता वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झालाच की नाही...शब्दांच्या, वाक्यांच्या, साध्यासाध्या उच्चारांत, अनुक्रमे अक्षरांवरच्या, शब्दांवरच्या आघातांवर बदल करून बघा.. दूर जाणारा एखादा मागे वळून पाहांत जसा परत फिरतो तश्या सकारात्मक संधी तुमच्या भवती आपोआप गोळा व्हायला लागतील. अडचणींच्या विचारांभवती रुंजी घालण्यांत, त्यांना कुरवाळण्यांत अमुल्य वेळ दवडण्यापेक्षा, लाभाचे हिशेब करीत वृद्धीची गणितं मांडण्यांत व्यस्त रहा.. या छोट्याछोट्या बाबी तुमच्यांतल्या नकारात्मकतेला बाहेरचा रस्ता दाखवितांना, सकारात्मकता रुजवतील आणि तुम्ही, नाइलाजानं, नकळत जोपासत असलेली स्थितिप्रियता लोप पावून, ती गतिशीलतेंत, उपक्रमशीलतोंत परीवर्तित होईल. तुमची विचारशक्ती हे एक कसब असल्याप्रमाणे तुम्ही जोपासत रहा, कुशाग्रता वाढवा, आणि त्यांवर स्वर व्ह एखाद्या कुशल योद्ध्या सारखे. तुमचा सकारात्मक प्रवेग वाढल्यावर तुमची ऊर्जा आपोआपच पुनरुजेजीवित होइल आणि तुम्ही तुमच्या मनाचा, वागणुकींतला तोल सहजगत्या पुनर्प्राप्त कराल.. ..इति

Monday, May 13, 2013

दशसूत्री.. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत

दशसूत्री उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत कधीकधी आपल्याला खूप थकल्यासारखं, गळून गेल्यासारखं, किंवा उदास, एकलकोंड वगैरे वाटायला लागतं. पण तस वाटल तरी काळजी करण्यासारख कांही नसत त्यांत. हे सगळ जगण्याचा, जिवंतपणाचा भाग असतो.. एवढच नव्हे तर ते सगळ म्हणजे जिवंतपणाचा पुरावासुद्धा असतो. कारण, मी मागं एकदा नमूद केलय तसं.. सुखं वाटावी घरोघरी दुःख आपल्या गांठीच बरी.. त्यामुळ आपण ते ओझ वागवत हिंडत असतो आणि स्वतःला उदासवाण, केविलवाण करून घेत असतो वारंवार..आयुष्य लाटांसारखं असतं. त्यामुळं त्याला चढ-उतार अर्थातच असतांत.. कधी पुळणीवर लोळण तर कधी नभाकडे झेप.. नाही कां.. कुठे आणि कुणाचं जिणं चढ-उताराविणा आहे.. अगदी रावा पासून रंका पर्यंत.. सगळ्यांचीच एक गत.. सुटका नाहीच.. कितीही किंमत मोजा.. कधीकधी असं वाटत असेल तुम्हाला, की आतां मनाची उभारी, उदासी झटकून कामाला लागणं वगैरे अशक्यप्राय गोष्टी आहेत. पण असं वाटलं तरी खचून जावू नका, कारण असे तुम्ही एकटेच नाही आहांत..आपण सगळेच समवेदनांकित आहोत. जोएल् सिम्स् म्हणतांत की, माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवांतून आणि अभ्यासांतून, मी अश्या निराशाजनक क्षणांमधून बाहेर कसं पडायचं याचं एक तंत्र विकसित केलं आहे. मी परत उभारी धेवून, ऊर्ध्वगतिशील आणि क्रियारत व्हायला शिकलो आहे. तर.. उत्तिष्ठ, जागृत, प्राप्यवरन्निबोधित हे ते दहा उपाय.. लक्षांत ठेवा ही एक तात्पुरती अवस्ता असते. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असकांत. तुम्ही सद्धा या नाण्याच्या खालच्या बाजूला पाहता आहांत असं समजा. पण याचा अर्थ असा थोडाच आहे की त्याला वरची बाजूच नाही तुमची चलनगती आणि प्रेरणाबल जेंव्हा मंद वाटेल तुम्हाला, तेंव्हा तुमच्या राखीव ऊर्जेची गुंतवणूक करा आणि परिस्थिती बदलत असल्याची जाणीव अल्पकाळांतच तुम्हाला व्हायला लागेल. जिवावर आलेलं असतांना सुद्धा उठा आणि मस्त फेरफटका मारून या. थकलांत तर कुणा मित्राला दूरध्वनी करा. पहा तुमचा उत्साह आणि उमेद परतते की नाही तें.. आपली एक भ्रामक समजूत असते की, आपल्या जिवाला तेंव्हाच बरं वाटत, जेंव्हा कांहीतरी भरघोस वैयक्तिक लाभ होतो. पण खरं तर तसं नसतं. पहिलं एक पाऊल पुढे टाकून बघा तर खरं..मग पुढच. आणि मग हळूहळू अंतर कापत वाटचाल सुरू करायची.. सुरू ठेवायची.. ज्या दिवशी चित्तवृत्ती उल्हसित नसतील, त्या ताळ्यावर आणायच्या असतील त्या दिवशी. सुरुवात करा थोड्याश्या व्यायामानं किंवा, रोजच्या आन्हिकांच्या निमित्तानं शारीर हालचालीनं मग आपोआपच तुम्ही स्वतःला बजाऊ धजाल.. त्या काशीनाथ घाणेकरांनी गायलेल्या चित्रपटगीतांतल्या सारखं.. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा आणि चमत्कार झाल्यासारखं, हळूहळू तुमची व्यायामची गोढी वाढायला लागेल अन् वृत्ती तजेलदार, प्रफुल्लित होतील..मनोगतींला एक प्रकारची प्रेरणा मिळेल.. आणि हे करीत असतांना एका वेळी एकच उद्दिष्ट किंवा ध्येय ठेवा, आणि त्यावरच लक्ष केंन्द्रित करा. कारण कधी कधी, कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित असं म्हणत, आपण एकाच वेळी अनेकविध कामांचा विचार, प्रक्रिया, कृती यामधे गुंतल्यावर, एक ना धड, भाराभर चिंध्या या (अ)न्यायानं बोजवारा उडतो आणि मग मनाचिये गुंथी गंफियेला शेला तितरभितर होतो, बिघडतो, आणि थकवा जाणवायला लागतो..आपणच ओढवून घेतलेला, शिंगरू मेलं हेलपाट्यानं.. तसं.. कांही विशेष नसतं बरं कां हे.. अगदी सग्गळ्यांच्या बाबतींत, हे कधीना कधीतरी घडतचं... या सगळ्यावरचा एक जालीम उपाय म्हणजे, एकावेळी एकाच प्रकल्पावर काम करा. शांतपणे आणि उत्तम रीतीनं तो पार पाडा. त्या यशामुळं आपोआपच, तुमचा उत्साह द्विगुणित होईल आणि तो ऊर्जास्रोत तुम्हाला पुढच्या प्रकल्पाला पुरेसा उत्साह, उमेद, बल.. पुरवेल. नाउमेदीच्या अशा काळांत, जिथं कांही सकारात्मक काम, समारंभ सुरू आहे अशा एखाद्या मित्राकडे, आप्तस्वकीयाकडे गेलांत तर तुमच्या मनाची जड अवस्था नकळत गळून पडेल आणि हलकं वाटायला लागेल. काळजी एकच घ्या की ज्या स्नेह्या किंवा आपताकडे जाल, तो स्वतः उमद्या स्वभावाचा आणि अगदी आगंतुकम्हणून गेलांत तरी स्वागतोत्सुक असायला हवा. नाहीतर त्याचा आंबट चेहेरा बघून तुमचं तोंड आणखी कडू व्हायचं.. आणि मदत मागा.. संकोच कसला करता.. अशा क्षणी निकटवर्तियांनीच एकमेकांचे ऊर्जास्रोत व्हायचं असतं..महाजालांतल्या एखाद्या संकेतस्थळांतूनसुद्धा मित्रत्वचे, सुखदायी सल्ले मिळून जातांत कधीकधी..अवलंब करून बघायला काय हरकत आहे.. नाउमेदी अवस्थेंत, नकळत मन सुद्धा नकारात्मक विचार करायला लागतं. आणि हेच कधीकधी तुमच्या निरुत्साहाच मूळ कारण होतं. विचारांची गाडी रुळावर आणा आणि विचारप्रवाहाला अशा ठिकाणी वळवा की जिथं उतार.. आणि उतारा सुद्धा.. मिळेल आणि आपोआपच गतिमानता प्राप्त होईल.. सव्तःचा स्वतःशी संवाद वाढवा अगदी अंतर्मनांत वादावादी, संघर्ष झाला तरी चालेल.. घर्षण देत ऊर्जेला जन्म..आणि फेकून देतं गारठा.. आखडलेपण.. मी हे नाही करूँ शकत पेक्षा, पहाच तुम्ही मी कसं पैलतिराला लावतो तारू, असं म्हणत रहा.. (क्रमशः)

Thursday, May 9, 2013

वैनतेय

वैनतेय बिन लादेनच्या अल् कायदा या अतिरेकी संघटनेनं.. बलाढ्या अमेरिकेच्या सर्वसामान्य नागरिकांवर, १२ वर्षांपूर्वी, एका सकाळी ऐन गर्दीच्यावेळी लादलेला निर्घृण अतिरेकी हल्ला.. आठवतो..? हा प्रष्ण विचारणंच मुळी, त्या घटनेन हळव्या झालेल्या, उद्विग्न, उध्वस्त काळजांवर मानसिक अत्याचार आहे.. विश्वातल्या, उत्क्रांतावस्थेंतल्या माणसाच्या इतिहासांतला, ९ सप्टेंबर २००१, हा एक काळाकुट्ट दिवस.. अखेर उत्क्रांती काय, भोगलोलूपतेपोटी, किंवा ऐहिक सुखांमागे धावण्यापुरतीच असते ? त्यापेक्षा जंगली, हिंस्र श्वापद बरी.. त्यांच्यांत सुद्धा एक केवळ क्षुधासंतोषी शिस्त असते..सूड वगैरे अभावानच दिसतो.. त्यांच आक्रमण केवळ भीतीपोटी आणि स्वसंरक्षणापोटीच असतं..पण, धर्मगुरूंनी दाखविलेली शांततामय सहजीवनाची दिशा, माणुसकीची शिकवण, सर्वसामान्य माणसांसारखा जन्मलेल्या, वाढलेल्या अमानुषांचा समूह, सूडग्रस्त मानसिकता आणि अधर्मांधता या दोन अवगुणांनी पूर्णपणे झाकोळत, जेंव्हा अशी कृत्य करायला सरसावतो, धजावतो, तेंव्हा माणसांतलं पशुत्व शोधण्यापेक्षा, त्या मागची कारणं शोधणं आवश्यक वाटायला लागतं. World Trade Center नावाच्या, अमेरिकेच्या अनेक मानबिंदूंपैकी एक, अशा या इमारतींवर, ९ सप्टेंबर २००१, अमेरिकेंत, सुरक्षाव्यवस्थेला पाचारण करण्यासाठी वापरतांत तो क्रमांक, ९/११, या एका सर्वसामान्य सकाळी कांही क्षणांच्या अंतरानं दोन प्रवासी वायुयानं धडकली.. चालक होते.. स्वप्राणाहुती अर्पणोत्सुक, बिन लादेनच्या आत्मघातकी पथकांतले अतिरेकी.. कडक सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढीत, Men in black च्या तीक्ष्ण नजरांच जाळ भेदीत.. प्रवाशांमधे बेमालूम मिसळत, घुसलेले.. रोजी रोटी कमावण्यासाठी, रोजच्या सारखं, कुटुंबातल्या अबालवृद्धांचा निरोप घेवून वाहेर पडलेल्या कर्त्या-धर्त्या हजारो नरनारींची स्वप्न अक्षरशः धुळीला मिळाली त्या सकाळी.. कांही निमिषार्धांत.. पण.. खरखरं अद्भुत तर पुढेच आहे.. हे वाचा आणु उरांत, मनांत खोलवर रुजवा, जोपासा.. ते आपलेया आयुष्यांतल्या भयाण, भीषण निराशाजनक अवस्थेंतून नुसतं बाहेरच काढणार नाही तर भयमुक्त करीत नवसंजीवनी देईल.. आपल्या सर्वांना, दुस-या महायुद्धांत, संसुक्त फौजांनी, हिरोशिमा-नागासाकीवर केलेल्या अणुबॉंब हल्ल्यानंतर, बेचिराख झाल्यावर सुद्धा, कांही वर्षांतच, अथक् परिश्रमानं, परत पंख उभारून, झेप घेत, जगाच्या नकाशावर एक प्रगत देश म्हणून नांव कोरणारा जपान सुपरिचित आहे.. हे या छायाचित्रांत तसंच कांहीस असणारं, अपकृत्याची चीड, संताप, उद्वेग मनांत खदखदत असतांनासुद्दा, या हल्ल्यांत नाहक बळी गेलेल्या सहस्रावधी नागरिकांविषयी हळहल, करुणा, कृतज्ञता. संवेदना, सहानुभूती या सर्व भावनांच एकत्रित दर्शन घडविणारं स्मारक आहे..अतिर्क्यांनी उध्वस्त केलेल्या, वर्ल्ड् ट्रेड् सेंटर् च्या अवशेषांतून साकारलेलं.. त्या स्मारकाचं नांव आहे,, यू एस् एस् न्यूयॉर्क् अविस्मरणीय, अप्रतिम, अविश्वसनीय... २४००० सहस्र किलो भग्नावशेषांतून हे, नव्या धर्तीच्या युद्धनौकाप्रकारांतलं पांचवं अवाढव्य जहाज बांधण्यांत आलं. आणि त्याचं कामही त्याच्या कणाकणांतून वाहाणा-या कर्तव्यपूर्तीच्या स्रोताचं प्रतिनिधित्व करणारं.. अतिरेकी विरोधी सुरक्षा.. या जहाजावर ३६० नाविक आणि ७०० शस्त्र-सज्ज, प्रतिकार आणि परिमार्जन कुशल लौसैनिक जवान, त्यांच्या जलयानं आणि आक्रमक, वेगवान जलवाहनांसह, कायम स्वरूपी तैनांत असतील लॉसेंजिलिस् राज्यांतल्या अँमाइट् मधल्या एका, भव्य बद्ध पोलाद-ओतशाळेंत, या भगनावशेषांमधले सगळे लोखंडी अवशेष वितळविण्यात आले. आणि य्तातून साकारला गेला या नौकेच्या मुख्य आधाराचा कणा, ज्याला KEEL, म्हणतांत जहाज-बांधणी तंत्रज्ञानांत. ९ सप्टेंबर २००९ या दिवशी जेंव्हा, साच्यामधे, वितळलेलं पोलाद ओतलं जात होतं, तेंव्हा, तितँ उपस्थित असलेल्या, अमेरिकन नौदलाच्या कॅप्टन् केविन् वेन्सिंग् नं वर्णन केल्यानुसार, त्या ओतशाळेंतले उंचेपुरे बलाढ्य शरीराचे कामगार, कर्मचारी, पांपणीकांठावरचे अश्रु कसेबसे आवरत ती प्रक्रिया, अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणानं न्याहाळत होते. त्या सर्वांसाठी ती एक आंतरात्मिक जाणिवेची, कांहीतरी महत्वाची खूणगांठ बांधण्याची घटिका होती.. मी जेंव्हा, ओतशाळेंतून आलेल्या त्या पोलादाला स्पर्श केलां, तेंव्ह माझं सर्वांग शहारून गलं एका वर्णन करण्या पलीकडच्या, विलक्षण जाणिवेनं..ओतशाळेचे प्रक्रिया प्रमुख व्यवस्थापक ज्युनिअर् शेवर्स सांगत होते. त्याच्या, नौदलाची, सुसज्ज अशी एक युद्धनौका या अस्तित्वा पलीकडे असा एक वेगळा आयाम आणि किती महदार्थ निगडित होता याची आम्हां सर्वांना पुरेपूर जाण होतं होती क्षणोक्षणी.. त्यांनी आम्हाला तात्पुरतं बेसावध गाठलं असेल कदाचित, पण आम्हाला ते चितपट, किंवा पूर्णपणे नेस्तनाबूत कधीच करूं शकणार नाहीत..आम्ही परतलो आहोंत.. पूर्ण क्षमतेनिशी.. या जल-पदार्पण केलेल्या विलक्षण स्मरकाचं बोधवाक्य आहे.. 'Never Forget'

Wednesday, May 1, 2013

प्रेम-व्यक्ततेसाठी देहबोली

*** मागील भागांत सुरुवातीलाच प्रेम-व्यक्ततेसाठी देहबोलीचा उल्लेख पाहिला. या देहबोलीचाच भाग म्हणजे, नर-नारी(सामान्यत:) प्रेमांत पडायच्या आधीची अवस्था..नजरबंदी. आधी नजरबंदी आणि मग स्वामित्वाच्या हव्यासापोटी ’नजर-कैद’ ’ति’ची किंवा ’त्या’ची आधी ’डोळ्यांत वाच माझ्या, तू गीत भावनांचे’ आणि मग लगेच, Wishful thinking, तू नजरेने 'हो' म्हटले पण वाचेने वदणार कधी ? कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी ? वगैरे ओघानं आलंच.. असच असतं प्रेम.. अधीर, निलाजरं तरी लाजरं, बावरं, आसुललेलं.. आतां आसुसलेलं शब्दाचा आसु हा अविभाज्य आहे की नाही.. मग त्याची पण तयारी ठेवावी लागते प्रेमींना बरं ! मग शेर बोलायला लागतांत’ बोझ होता जो गमों का तो उठा ही लेते जिंदगी बोझ बनी हो तो उठायें कैसे ।। बोझ, गम.. प्रेमभम्गाचा.. म्हणजे आसूं आलेच की हो ! नैना बरसे रिमझिम रिमझिम पिया तोरे आवन की आस.. वगैरे.. या नजरबोलीचा उपयोग कांही प्राणीसुद्धा, वेगबेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी करतांत, पण आपण सध्यातरी ओहक्त प्रेमभावनेचाच विचार करूंया ! ज्ञानदेवांच्या एका अभंगांत.. देहा लाजिलिये, शब्दा रुसलिये । कासवीचे दूध देवोनिया बुझविले माय ॥ काय सांगो तिचा नवलावो, । महालोभेविण कैसा येतो पान्हाओ ॥ कासवी आपल्या पिलांना, नजरेंतून वात्सल्य, अभय, आश्वासनरूपी दूध देवून त्यांचं संगोपन करते अशी एक समजूत आहे. कूट अभंगांतला हा अभंग मला, प्राचार्य राम शेवाळकरांनी निवडून दिलाव्‌ता, एका अल्बम्‌साठी. त्याच अभंगांतल्या अखेरच्या ओवींत ’आवसेचे चांदिणे’ असा उल्लेख आहे आणि तेच त्या अल्यम्‌चं शीर्षक आहे. त्यांतला हा अभंग मी स्वरबद्ध केलाय आणि देवकी,, देवकी पंडितनं तो गायलाय्‌ ! ते कशाला ? गाईच्या डोळ्यांत नेहमीच एक वात्सल्य मिश्रित करुणा दिसतेच की ! प्रेमाचाच प्रकार.. वात्सल्य.. वत्साप्रत.. छकुल्याप्रत..पुत्राप्रत.. उसळणारा, ओसंडणारा प्रेम-स्रोत..करुणोद्भव पान्हा.. कविवर्य माणिक गोडघाटे तथा ’ग्रेस’ची ओळ आठवा, ’गाइचे डोळे, करुण उभे की सांज निळाईतले’ हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेल्या, ’वार्‍याने हलते रान, तुझे सुनसान, हृदय गहिवरले’ या गीतांतली ही पुढची ओळ. १५ ऑगस्ट्‌ १९८६.. लक्ष्मी क्रीडा मंदिरामधे, आमच्या ’आनण्दघन’ या कार्यक्रमांत, बाळासाहेबांनी ते गीत गायलं. माझ्याकडे आहे त्याची चित्रफीत. चिमुकल्याच्या चिंतेंत, काळजींत अतीव प्रेमापोटी, तन-मनानं एकरूप झालेल्या ’माय’च्या पाठीलासुद्धा डोळे असतांत. मग ते अंगणांत जावू लागलं की तिचा जीव घाबराघुबरा होतो, कुठं पडेल झडेल म्हणून. कवयित्री इंदिरा संतांनी बाळाची वांछा आणि आईच्या जिवाची घालमेल, त्यांच्या बाळ उतरे अंगणी.. या कवितेंत व्यक्त केली आहे... अशा या, तळहातावरच्या फोडासारखं जपून लहानाची मोठी केलेली मुलं जेंव्हां, पिलांस फुटुनी पंख, तयांची घरटी झाली कुठेकुठे, आतां आपुली कांचन संध्या, मेघडंबरी सोनपुटे अशी मोकळ्या आवकाशांत झेपावतांत.. आणि उरतांत मग वृद्धावस्थेंतली दोघं... वर्षानुवएष आनंदाचे, संघर्षाचे, संकटांचे प्रसंग एकमेकांच्या साथीन निभावतांना, मुरलेल्या लोणच्यासारखं प्रेम मिठीमधे कवटाळून. त्यांतून कांही कारणानं तातौरतं दुरावायला लागलंच तर मग कांसाविशी आणखीच वाढते. अण्णा.. अण्णा माडगु्ळकरांनी ती हृदयीची साद किती छान आणलिये, ’ऊन पाऊस’ या चित्रपटांत ! वृद्ध नायिका म्हणते.. ’या कातरवेळी.. पाहिजेस तूं जवळी..’ या जवळिकींतली कोणा एकाची साथ सरते आणि मग आयुष्य रिकामं भासायला लागतं, नजर तासनतास शून्यांत लागत असते. काय असतं तिकडं ? पैलतीर ? त्या तीरावर परत सहजीवनाची आंस घरणारा जीव, ऐहिकांतला सहचर किंवा सहचरी, येरे येरे पावसा.किंवा येगयेग सरी गात उभे असतांत ? पण तिकडं जायचं म्हणजे इथले पाश सोडून, बंधमुक्त होवून, बाकीबाबांच्या शब्दांत त्या मृत्यू-प्रेमामुळं म्हणांवसं वाटतं आंता माझ्या व्यथा कथा कुणा न येती सांगता वृथा त्यांना कां दूषणं, ना ये मला सांगता आणि अखेरीस, विझवून दीप सारे मी चाललो निजाया आतां अशाश्वताची उरली मुळी न माया... काय गंमत आहे पाहा. ते सगळं शाश्वत, आयुष्यभर उपभोगून झाल्यावर, मग आपण, ’विश्वामित्री पवित्रा घेवून, ’इदं न मम’ म्हणायला तयार असतो ! कृतघ्न.. मनुष्यसुलभ.. हो की नाही ? या शिवाय इतरही नातेसंबंधातलं ’प्रेम’ म्हणजे उदाहरणार्थ भ्रातृप्रेम.. भरत, श्रीराम यांच्यांतलं...परत गदिमांची आठवण अनिवार्य आहेच, कर्तव्यप्रेमापोटी सिंव्हासन अव्हेरणारा राम, भरताला सांगतोय ’पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा’ हे कर्तव्यप्रेम की दैववादामुळं निर्माण झालेली हताशा ? कारण रावणमर्दनानंतर, आयोध्येंत, स्वत:च्या नीरक्षीरविवेकी राजा, या प्रतिमा-प्रेमापोटी सीतेला विजनवासांत धाडणार्‍या रामाचं प्रेम कुठल्या चौकटींत बसवायचं ? मधुराभक्ती..राधेची, माई माई.. तुम बिन कैसे कैसे जिऊम री म्हणणार्‍या मीरेची... हे प्रेमचं.. अतिथीप्रेम.. चिलियाबाळाची आहुती अतिथीचा जठराग्नी विझवण्यासाठी.. प्रेमच ! सत्ताप्राप्तीसाठी कैकयीचं, भरताचं अगदी स्वाभाविक पण फारसं कल्याणकारी जरी नसलं..पुत्रप्रेम...तरी प्रेमचं.. सौंदर्याचं प्रेम(?) स्वत:च्या भोगलोलूपते-लालसेपोटी... रावणाचं.. भिक्षुकाच्या वेषांत आलेल्या देवाधिदेव इंद्राला, शिधा द्यायला आलेली न्हाउनी, उभे लाउनी येशि सुस्नात हाल करतेस, झटकुनी केस, वीज मगजांत नितळ कृश पोट, पन्हाळी पाठ, ओलसर ओठ निरि धरी छातिशी, वरी, कटीशी गाठ झाकता उभारी, वस्त्रे अपुरी अंगा, ही नार करी बेजार, थांबवा दंगा कांति सावळी, गालि अवखळी,खट्याळी खेळे चंचला नजर, करि ठार भाबडे भोळे विखारी रात्र, अनावर गात्र, तांब नजरेंत विरहाचि आग, काळजी, राग, हुर्दात.. अशा अवस्थेंतया माझ्या स्वरचित लावणींतल्या लावण्यवती सारखे निसर्गालंकार लेवून आलेली यजमानीण पाहून, भरती आलेलं शारीर जरी असलं तरी शेवटी प्रेमचं ना ? *****