दरसाल, हरमोसमाप्रमाणे, कृषिभूषण, शेतीनिष्ठ वगैरे पुरस्कारांची घोषणा, वृत्त-वाहिन्यांवरून व्हायला लागली ! नाई म्हणताम्हणता बरा पाऊस झालाय्...बळिराजाच्या मनासारखा...हां, आता कुठं ’उन्नीस-बीस’ व्हायचच, पण कारभारणीच्या मनांत ’बत्ताशे’, ’लाडू’ वगैरे नक्कीच फुटत असणार...मग तिनं, का नाइ म्हणावं...
पाउस लागलाय ओसरायला. उन्ह ताजी तवान,
वारं भ्ररल्या आभाळांत आता निळाईची शान
दाण्यावर आलित कणसं, टिपायला पांखरं अधीर,
गोफण घेउन, वारायला त्यांना, धनी आहे खंबीर
सणासुदीची बाजारहाट, घोळाय्ला लगलिया मनी,
पैंजणांना देइन म्हणते औंदा सोन्याचं पाणी
कधीपासुन टोपपदरी घ्याव म्हणतेय् मी,
बैलजोडी आणत्याल नवी तवा बरूबर जाइन मी बी,
लेक लई हुश्शार माझि, तिला कराय्चि आहे डॉक्टर, खंबीर वाश्यांच्या घर, पोरं चढविल झळाळ त्यावर
No comments:
Post a Comment