Wednesday, March 20, 2013

योग्य तेच जाणावे.. *******

ते दयार्णव, भूतमात्रांना स्वत:च्या तोंडचा घास काढून भरविणारे, एकनाथ, नामदेव, तुकोब्बादि संत कुठे आणि आटले स्रोत ओसाड जाहली गांवे, चिडिचाप वळचणी एकाकी अन्‌ दावे भुइ भेगाळलि तापले चहुकडे वारे, निष्पर्ण शाख अन्‌ सताड उघडी दारे पेटती रोज वडवानळ रानोमाळी, दुष्काळ, अवकळा, विदीर्ण अंतर जाळी अशा भीषण परिस्थितींत कुणि नालायक भक्तांना घाली न्हाऊ, अन्‌ म्हणे ’चला ! ओलेती राधा पाहू’ बांधा मुसक्या अन्‌ बसवा गर्दभ अंकी गेला हा तरिही राहिल वृत्ती बाकी तुकयाच सांगितो, ’हाणा पैजाराने, का ? जगावेच कां ? ऐशा नराधमाने ?’ सुज्ञांस याहू्नी जास्त काय सांगावे अभ्यासुन उक्ती, योग्य तेच जाणावे योग्य तेच जाणावे.. *******

No comments:

Post a Comment