Monday, May 13, 2013

दशसूत्री.. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत

दशसूत्री उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत कधीकधी आपल्याला खूप थकल्यासारखं, गळून गेल्यासारखं, किंवा उदास, एकलकोंड वगैरे वाटायला लागतं. पण तस वाटल तरी काळजी करण्यासारख कांही नसत त्यांत. हे सगळ जगण्याचा, जिवंतपणाचा भाग असतो.. एवढच नव्हे तर ते सगळ म्हणजे जिवंतपणाचा पुरावासुद्धा असतो. कारण, मी मागं एकदा नमूद केलय तसं.. सुखं वाटावी घरोघरी दुःख आपल्या गांठीच बरी.. त्यामुळ आपण ते ओझ वागवत हिंडत असतो आणि स्वतःला उदासवाण, केविलवाण करून घेत असतो वारंवार..आयुष्य लाटांसारखं असतं. त्यामुळं त्याला चढ-उतार अर्थातच असतांत.. कधी पुळणीवर लोळण तर कधी नभाकडे झेप.. नाही कां.. कुठे आणि कुणाचं जिणं चढ-उताराविणा आहे.. अगदी रावा पासून रंका पर्यंत.. सगळ्यांचीच एक गत.. सुटका नाहीच.. कितीही किंमत मोजा.. कधीकधी असं वाटत असेल तुम्हाला, की आतां मनाची उभारी, उदासी झटकून कामाला लागणं वगैरे अशक्यप्राय गोष्टी आहेत. पण असं वाटलं तरी खचून जावू नका, कारण असे तुम्ही एकटेच नाही आहांत..आपण सगळेच समवेदनांकित आहोत. जोएल् सिम्स् म्हणतांत की, माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवांतून आणि अभ्यासांतून, मी अश्या निराशाजनक क्षणांमधून बाहेर कसं पडायचं याचं एक तंत्र विकसित केलं आहे. मी परत उभारी धेवून, ऊर्ध्वगतिशील आणि क्रियारत व्हायला शिकलो आहे. तर.. उत्तिष्ठ, जागृत, प्राप्यवरन्निबोधित हे ते दहा उपाय.. लक्षांत ठेवा ही एक तात्पुरती अवस्ता असते. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असकांत. तुम्ही सद्धा या नाण्याच्या खालच्या बाजूला पाहता आहांत असं समजा. पण याचा अर्थ असा थोडाच आहे की त्याला वरची बाजूच नाही तुमची चलनगती आणि प्रेरणाबल जेंव्हा मंद वाटेल तुम्हाला, तेंव्हा तुमच्या राखीव ऊर्जेची गुंतवणूक करा आणि परिस्थिती बदलत असल्याची जाणीव अल्पकाळांतच तुम्हाला व्हायला लागेल. जिवावर आलेलं असतांना सुद्धा उठा आणि मस्त फेरफटका मारून या. थकलांत तर कुणा मित्राला दूरध्वनी करा. पहा तुमचा उत्साह आणि उमेद परतते की नाही तें.. आपली एक भ्रामक समजूत असते की, आपल्या जिवाला तेंव्हाच बरं वाटत, जेंव्हा कांहीतरी भरघोस वैयक्तिक लाभ होतो. पण खरं तर तसं नसतं. पहिलं एक पाऊल पुढे टाकून बघा तर खरं..मग पुढच. आणि मग हळूहळू अंतर कापत वाटचाल सुरू करायची.. सुरू ठेवायची.. ज्या दिवशी चित्तवृत्ती उल्हसित नसतील, त्या ताळ्यावर आणायच्या असतील त्या दिवशी. सुरुवात करा थोड्याश्या व्यायामानं किंवा, रोजच्या आन्हिकांच्या निमित्तानं शारीर हालचालीनं मग आपोआपच तुम्ही स्वतःला बजाऊ धजाल.. त्या काशीनाथ घाणेकरांनी गायलेल्या चित्रपटगीतांतल्या सारखं.. झटकून टाक जीवा दुबळेपणा मनाचा आणि चमत्कार झाल्यासारखं, हळूहळू तुमची व्यायामची गोढी वाढायला लागेल अन् वृत्ती तजेलदार, प्रफुल्लित होतील..मनोगतींला एक प्रकारची प्रेरणा मिळेल.. आणि हे करीत असतांना एका वेळी एकच उद्दिष्ट किंवा ध्येय ठेवा, आणि त्यावरच लक्ष केंन्द्रित करा. कारण कधी कधी, कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित असं म्हणत, आपण एकाच वेळी अनेकविध कामांचा विचार, प्रक्रिया, कृती यामधे गुंतल्यावर, एक ना धड, भाराभर चिंध्या या (अ)न्यायानं बोजवारा उडतो आणि मग मनाचिये गुंथी गंफियेला शेला तितरभितर होतो, बिघडतो, आणि थकवा जाणवायला लागतो..आपणच ओढवून घेतलेला, शिंगरू मेलं हेलपाट्यानं.. तसं.. कांही विशेष नसतं बरं कां हे.. अगदी सग्गळ्यांच्या बाबतींत, हे कधीना कधीतरी घडतचं... या सगळ्यावरचा एक जालीम उपाय म्हणजे, एकावेळी एकाच प्रकल्पावर काम करा. शांतपणे आणि उत्तम रीतीनं तो पार पाडा. त्या यशामुळं आपोआपच, तुमचा उत्साह द्विगुणित होईल आणि तो ऊर्जास्रोत तुम्हाला पुढच्या प्रकल्पाला पुरेसा उत्साह, उमेद, बल.. पुरवेल. नाउमेदीच्या अशा काळांत, जिथं कांही सकारात्मक काम, समारंभ सुरू आहे अशा एखाद्या मित्राकडे, आप्तस्वकीयाकडे गेलांत तर तुमच्या मनाची जड अवस्था नकळत गळून पडेल आणि हलकं वाटायला लागेल. काळजी एकच घ्या की ज्या स्नेह्या किंवा आपताकडे जाल, तो स्वतः उमद्या स्वभावाचा आणि अगदी आगंतुकम्हणून गेलांत तरी स्वागतोत्सुक असायला हवा. नाहीतर त्याचा आंबट चेहेरा बघून तुमचं तोंड आणखी कडू व्हायचं.. आणि मदत मागा.. संकोच कसला करता.. अशा क्षणी निकटवर्तियांनीच एकमेकांचे ऊर्जास्रोत व्हायचं असतं..महाजालांतल्या एखाद्या संकेतस्थळांतूनसुद्धा मित्रत्वचे, सुखदायी सल्ले मिळून जातांत कधीकधी..अवलंब करून बघायला काय हरकत आहे.. नाउमेदी अवस्थेंत, नकळत मन सुद्धा नकारात्मक विचार करायला लागतं. आणि हेच कधीकधी तुमच्या निरुत्साहाच मूळ कारण होतं. विचारांची गाडी रुळावर आणा आणि विचारप्रवाहाला अशा ठिकाणी वळवा की जिथं उतार.. आणि उतारा सुद्धा.. मिळेल आणि आपोआपच गतिमानता प्राप्त होईल.. सव्तःचा स्वतःशी संवाद वाढवा अगदी अंतर्मनांत वादावादी, संघर्ष झाला तरी चालेल.. घर्षण देत ऊर्जेला जन्म..आणि फेकून देतं गारठा.. आखडलेपण.. मी हे नाही करूँ शकत पेक्षा, पहाच तुम्ही मी कसं पैलतिराला लावतो तारू, असं म्हणत रहा.. (क्रमशः)

No comments:

Post a Comment