Friday, June 8, 2012

महर्षी वाल्मिकींची, ’रामायणां’तील तपशीलांची अचूक मांडणी...

महर्षी वाल्मिकींची, ’रामायणां’तील तपशीलांची अचूक मांडणी... श्रीरामाला, आयोध्येचा राजा म्हणून राज्याभिषेक झाल्यानंतर, वाल्मिकीमुनिविरचित ’रामायण’ अस्तित्वांत आलं. महर्षी वाल्मिकी हे अवकाशस्थ ग्रह-तारे, नक्षत्र, आकाशगंगेंतील प्रमुख तारे सूर्यमाला, धूमकेतू, अशनी, राशिचक्र, कुंडली आणि ग्रहगोलांची त्यामधली भ्रमणं, हालचालींबद्दल सखोल अभ्यास असलेले तज्ञ होते, हे त्यांनी, रामायणांतील अनेक प्रमुख घटनांच्यावेळची, ग्रहस्थिती ज्या अचूकपणे नोंदवून ठेवली आहे त्यावरून सिद्ध होतं. अवकाशस्थ, चक्रनेमिक्रमे भ्रमणव्यस्त अस्तित्वांची, एकमेकांच्या संदर्भांतली स्थानांची, हजारो वर्षांमधे क्वचितच पुनरावृत्ती होते.. ’प्लॅनेटेरिअम्‌’ नावाच्या एका संगणक प्रणालीद्वारा, रामायणांतल्या उल्लेखनीय घटनाच्यावेळी महर्षी वाल्मिकींनी नोंदलेली ग्रहस्थिती जर ताडून पाहिली तर त्या घटनांचे, इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे असलेले दिनांक, वार आदि अगदी स्पष्टपणे दृग्गोचर होतांत. भारतीय, नागरी सेवेंतल्या, पुष्कर भटनागर नावाच्या अधिकारी व्यक्तीनं, ही संगनक प्रणाली, अमेरिकेंतून प्राप्त केली. तिथं या प्रणालीचा उपयोग सूर्य-चंद्रांची ग्रहण, सूर्यमालेंतल्या इतर ग्रहांच पृथ्वीपासून अंतर आणि स्थानांची निश्चिती या गोष्टी जाणून घेण्यासाठी सामान्यत: करतांत. आधी वर्णन केल्याप्रमाणे भटनागर महोदयांनी, प्रणालींत रामायणांतल्या घटनांची ग्रहस्थिती, समाविष्ट केल्याबरोबर त्यांच्यापुढ दिनांक, वार उभे ठाकायला लागले.. अगदी घटना आणि त्यांचा अचूक क्रम ताडून पाहाण्या इतपत..रामजन्मापासून ते १४ वर्ष वनवासोत्तर रावणाशी झालेल्या युद्ध आणि विजयानंतर, आयोध्येंत पुनरागमन राज्याभिषेक वगैरे सर्व घटना अचूक ताडल्या गेल्या. महर्षी वल्मिकींनी बालकांडांतल्या १९व्या सर्गांत, आठव्या आणि नवव्या श्लोकांत नमूद केल्या प्रमाणे, चैत्र शुद्ध नवमीला, अवकाशस्थ ग्र्ह-नक्षत्रांची स्थिती निम्ननिर्देशाप्रमाणे होती: सूर्य मेष राशींत, शनी तूळेंत, गुरु कर्केंत, शुक्र मीनेंत, मंगळ मकरेंत, चांद्रमास चैत्रांतलीतली अमावस्योत्तर नवमी, कर्क लग्न (कर्क राशी, पूर्वेला उदितावस्थेंत), चंद्र मिथुन राशींत, पुनर्वसू नक्षत्रांत, दिवसा माध्यान्हीच्या सुमारास... ’प्लॅनेटेरिअम्‌’ मधे ही सर्व माहिती अंतर्भूत केल्यावर, असं स्पष्टपणे दिसंलं की ही ग्रहस्थिती असलेला दिवस म्हणजे रामजन्माचा दिवस, ख्रिस्तपूर्व १० जानेवारी ५११४ हा होता. म्हणजे आजपासून जवळजवळ ७१२६ वर्षांपूर्वीचा..भारतीय दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रांतल्या शुक्लपक्षांतली नवमी...ज्या दिवशी राष्ट्रांत सर्वदूर ’रामजन्मोत्सव’ साजरा होतो..’रामनवमी’ म्हणून... युरोप किंवा भारतीय उपखंडांतल्या अनेक..ख्रिस्तपूर्व किंवा ख्रीस्तोत्तर... इतिहास संशोधक, पर्यटकांनी नमूद करून ठेवलेल्या नोंदींप्रमाणे रामजन्म आयोध्येंत झालां हे निर्विवाद सत्य अधोरेखित होत. या लेखक-संशोधकांच्या ग्रंथांत, वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, कालिदासांचं’रघुवंशम्‌’, बुद्ध आणि जैन साहित्याकृतींचा समावेश होतो. आयोध्येच्या तत्कालीन सुबत्ता, गृहसंकुलं, महाल, प्रार्थना आणि कला मंदिरं, पथ आणि महामार्ग, नगर-रचना यांतली, अधिपत्यांतल्या प्रदेशांत सर्वदूर प्रकर्षानं जाणवणारी सुबकता, प्रसन्न वातावरण आणि समशीतोष्ण हवामान, यांच वर्णन या सर्व ग्रंथ-साहित्यांत ठाइठाई वाचायला मिळतं. शरयू तीरावरच्या आयोध्येच्या अलिकडच्या-पलीकडच्या तीरावर, गंगा आणि पांचाल प्रदेश आणि मिथिलानगरी स्थित होते. सात सहस्रकं हा सामान्यत:, मानवी जीवनाचा आणि कदाचित राष्ट्रांच्या, भूप्रदेशांच्या आणि उपखंडांच्या आयुष्यांतसुद्धा खूपच प्रदीर्घ कालावधी असतो. या कालावधींत भूपृष्ठाखाली घडणार्‍या घडामोडींमुळे, भूकंप, अतिवृष्टीमुळं पूर, नद्यांचे बदलणारे प्रवाह, परकीय आक्रमणांतून युद्ध, त्यांतून नरसंहार, नागरी आणि ग्रामीण वस्त्या उध्वस्त होणं, कडेकपारी, दरडी कोसळूनं त्याखाली गादली जाणं, हे वारंवार घडतचं असतं. त्यामुळं, इतिहासाचं अध्ययन, अभ्यास संशोधन आणखीच अवघड होवून बसतं. आयोध्येच्या आसपासच्या नद्यांनी आपले प्रवाह, जवळजवळ तीस-चाळीस किलोमीटर्‌ उत्तर/दक्षिणे कडे सरकल्यामुळं बदलले आहेत, त्यामुळं मूळं नगरीच्या क्षेत्रफळांत बरीच घट झाली आहे. रामाला तर त्याच्या शैशवांतच, म्हनजे वाल्मिकी रामायणातल्या नोंदॆऎप्रमाणे वयाच्या तेराव्या वर्षी आयोध्येपासून दूर जावं लागलं..महर्षी विश्वामित्रांच्या तपोवनस्थित सिद्धाश्रमांत, उपनयनोत्तर ब्रह्मचर्याचरण करीत सर्वंकष शिक्षणासाठी. त्यानंतर श्रीराम, जनकराजाच्या मिथिला नगरींत दाखल झाले, सीतास्वयंवरांत एक राजपुत्र म्हणून. तिथं त्यांनी शिवधनुष्यभंग करीत सीतेचं पाणिग्रहण केलं आणि आयोध्येला प्रयाण केलं वाल्मिकी रामायणांतल्या वर्णनाप्रमाणे, इतिहासतज्ञांनी शोधकार्य सुरू थेवून, श्रीरामाच्या या ’प्रवासां’तल्या घटनाक्रमांनुसार जवळपास तेवीस ठिकाणांची खातरजमा करून निश्चिती केली. त्यांतली कांही ठिकाणं अशी: सृंगी आश्रम, रामघाट,त्राटिकावन, सिद्धाश्रम, गौतमाश्रम, सध्या नेपाळांत असलेलं जनकपुर, सीताकुंड वगैरे.. स्मृतिमंदिरं आणि वंदनस्थळं ही, अद्भुतकार्य करणार्‍या ’संभवामि युगे युगे’ अशा ’माणसांसाठीच उभारली जातांत...काल्पनिक, ’कुठलाही आधार नसतांना ’कथित’ रचनांद्वारा उभ्या केलेल्या व्यक्तिरेखांसाठी नाही. महर्षी वाल्मिकींनी, आयोध्याकांडांतल्या दुसर्‍या सर्गांतल्या चार ते अठरा श्लोकांम्धे वर्णन केल्या प्रमाणे, राजा दशरथाच्या कुंडलींतल्या नक्षत्रांना रवि, मंगळ आणि राहू यांनी ग्रासल्यामुळं निर्माण झाल्ल्या परिस्थितीमुळं, जी बहुतेक ’सम्राटा’च्या मृत्यूप्रत प्रवासाची नांदी ठरते किंवा त्याच्या विरुद्ध कटाला चिथावणी देणारी ठरते.. त्यानं श्रीरामाला सिंव्हासनावर बसवून राज्याभिषेकासाठी पाचारण केलं. राजा दशरथाची रास होती मीन आणि जन्मनक्षत्र, रेवती. वर वर्णन केलेली ग्रहस्थितीच दिवस होता ५ जानेवारी ५०८९, ख्रिस्तपूर्व. याचं दिवशी, मंथरेनं कान भरल्यामुळं आधीच मत्सरग्रस्त असलेल्या कैकयीच्या हट्टापोटी, दिलेल्या वचनपूर्तीसाठी दशरथानं श्रीरामांना १४ वर्षांच्या वनवासासाठी अयोध्येबाहेर धाडलं. म्हणजे श्रीराम तेंव्हा पंचवीस वर्ष वयाचे होते.(५११४-५०८९ ख्रिस्तपूर्व). रामायणांतल्या अनेक श्लोकांत, या उपर्युक्त विधानांच्या पुष्ट्यर्थ पुरावे मिळतांत. वनवासाच्या तेराव्या वर्षाच्या उत्तरार्धांत श्रीरामानं खरदूषणाशी केलेल्या युद्धाचा उल्लेख वाल्मिकी रामायणांत मिळतो. त्या दिवशी अमावस्या होती आणि मंगळ अवकाशमध्यावर होता. ’प्लॅनेटेरिअम्‌’नं ग्रहस्थितीचे हे संदर्भ मिळतांच, त्या दिवशी, ७ ऑक्टोबर ५०७७ ही तारीख होती’ सूर्यग्रहण होतं आणि ते ’पंचवटी’ (दंडकारण्यांत, नाशिक जवळ) मधून दृश्यमान होत होतं, हे खात्रीपूर्वक ’सांगितलं’ भटनागरजींचे एक सहकारी, डॉ. राम अवतार, यांनी, वाल्मिकीरामायणांतल्या वर्णनाप्रमाणे, श्रीराम वनवासाला निघाल्यापासून म्हणजे आयोध्येपासून, ते रामेश्वरम्‌, धनुष्कोडीपर्यंतचया, मार्गक्रमणेंतल्या सगळ्या स्थळांबाबतींत संशोधन करण्यासाठी तिथं प्रत्यक्ष जावून माहिती जमा केली. अशा १९५ स्थळांबाबत, जिथं वनवासादरम्यानच्या, श्रीराम आणि सीता यांच्या आयुष्यांतल्या ठळक घटना निगडींत आहेत. उदाहरणार्थ: तमसा तल(मंदाह), श्रिगवेपुर(शिगरूर), भारद्वाज आश्रम(अलाहाबाद जवळ), अत्री आश्रम, मार्कंडेय आश्रम, (मारकुंड),चित्रकूट, रामकुटी(गोदावरी तीरी), पंचवटी,सीतासरोवर, रामकुंड(नाशिक जवळील त्र्यंबकेश्वरमधे), शबरी आश्रम, किष्किंधा(अन्नागोराई नावाचं ग्राम) आणि अर्थांत धनुष्कोडी आणि रामेश्वर मंदिर. वाल्मिकीसांगतांत की श्रीरामसेनेनं रामेश्वरम्‌ ते लंका सागरसेतू बांधला आणि त्या सेतूवरून, उसळणार्‍या जलधीला वेंघत(पाल्कची सामुद्रधुनी) श्रीरामसेनेनं, युद्धांत, कुंभकर्णादि बलाढ्य सेनापतींसह प्रत्यक्ष रावणाचा पराजय करून सीतेला अशोकवनांतून मुक्त करून आयोध्येला परत आणलं. आता, सागराच्या पृष्ठभागाखाली अजून अस्तित्व राखून असलेल्या या सेतूची उपग्रहावरून घेतलेली छायाचित्र, संगणकाच्या महाजालावर उपलब्ध करून दिली आहेत...कांही शंकेखोरांचे दात घशांत घालण्यासाठी... सीतेला दैत्यांच्या पाहार्‍यांत, ख्रिस्तपूर्व ५०७६ मधे, जिथं ठेवलं होतं ती सीता वाटिका,अशोकवन’ देशांतल एक प्रमुख पर्य्टनस्थळ म्हणून विकसित करायचं नुकतचं, श्रीलंकेच्या शासनानं, निश्चित केलं आहे. श्रीराम हे सूर्यवंशांत जन्मले होते. ते या वंशाचे चौसस्ठावे नृपति होते. त्या आधीच्या त्रेसस्ठ नृपतींच्या नावांसह उल्लेख, ’आयोध्या का इतिहास’, या जवळपास नव्वद वर्षांपूर्वी राय बहादुर सीताराम यांनी लिहिलेल्या ग्रंथांत आढळतो. लुइसिआना विद्यापीठांतल्या प्राध्यापक सुभाष काक यांनी लिहिलेल्या, The Astronomical Code of the Rig Veda, या ग्रंथांतसुद्धा श्रीरामांच्या त्रेसस्ठ पूर्वजांचा, ज्यांनी आयोध्येवर राज्य केलं.. नामनिर्देशासह उल्लेख सापडतो. त्यांतली कांही ठळक नावं: राजा दशरथ, त्या आधी अज, रघु, दिलिप वगैरे.. असेतु-हिमाचल, भारतवर्षांतली अबाल-वृद्ध जनता, विशेषत: हिमाचल, राजस्थान आणि मध्यप्रदेशांतली आदिवासी,जनजाती.. श्रीरामांच्या ’असण्या’बद्दल आणि ती केवळ ’पुराणांतली वांगी’ नाहीत याबद्दल पूर्णपणे नि:शंक आहेत. या आदिवासींमधले बहुतेक उत्सव, सण समारंभ श्रीराम-सीता आणि श्रीकृष्ण यांच्या आयुष्यांतल्या घटनांशी निगडीत असतांत. हे सगळे प्रसंग आणि घटनास्थळ म्हणजे भारताच्या सांस्कृतिक ठेव्यांतला एक महत्वाचा घटक अ होता, आहे आणि भविष्यांत असेल. रामायण काल हा प्रेषित मोहंमद किंवा जीझस्‌ ख्र्रिस्ट्‌ यांच्या जन्माच्या किंवा इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटी, हे धर्म या जगांत अस्तित्वांत येण्याच्या बराच आधीचा होता. हिंदू, म्हणजे हिंदु-स्थान चे रहिवासी आणि इंडियनस्‌ म्हनजे इंडियाचे रहिवासी हे दोन समान अर्थी शब्द आहेत . इंडियाची ओळख भारत...ज्ञानियांचा प्रदेश,,, आणि आर्यावर्त...जिथं आर्यांची वस्ती आहे, आणि हिंदुस्थान (’इंडस्‌’ या शब्दावरून व्युत्पत्ती) अशीही जगांत आहे. रामराज्यांत जन्मावरून जातपात ठरविण्याची पद्धतच नव्हती. महर्शी वाल्मिकी जन्मान जरी वाटमारी करणारे आदिवासी होते तरी सीतेनं, लंकादहनानंतर अग्निपरीक्षा दिल्यावरही, केवळ एका परिटानं तिच्या पावित्र्याबद्दल शंका व्यक्त केलेली ऐकून, श्रीरामांनी दिलेल्या आज्ञेवरून आयोध्येचा त्याग केल्यानंतर आश्रय घेतला तो महर्षी वाल्मिकींच्या आश्रमांतच, आणि लव-कुशही तिथंच सैशवांतून बाल्यांत आणि तारुण्यांत आले. महर्षी वाल्मिकींच...पहिल्या भारतीय अवकाशवेत्त्यांचं...अवकाशविज्ञानाचं आणि ग्र्ह-नक्षत्र-तार्‍यांच्या भ्रमण आणि आवर्तनांच्या गणिती नियमिततेचं ज्ञान आणि भान हे इतक अचूक आणि स्पृहणीय होतं की प्रत्येक भारतीयाला त्यांच्या कर्तृत्वाबद्दल अभिमान वाटावा. हे ज्ञान आजच्या अधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्व कसोट्यांमधे यशस्वी ठरत आहे. नवीन संगणक प्रणालीनं सुद्धा याला दुजोरा देत वाखाणणीच केली आहे. ज्या प्रमाणे शबरी ही एक आदिवासी स्त्री होती त्याच प्रमाणे, रावणाचा पराजय करणारं श्रीरामाचं सैन्यदळ हे मध्य आणि दक्षिण भारताच्या विविध प्रदेशांतल्या आदिवासी जमातींच्या प्रतिनिधींनी परिपूर्ण होतं. रामायणांतील प्रमुख घटना आणि बारीकबारीक संदर्भ हे प्रत्येक भारतीयाचा म्हणजे जनजाती-जमाती, मुस्लिम, ख्रिश्चनधर्मीय यांचा अमूल्य सांस्कृतिक ठेवा आहे. इस्लाम धर्मसंस्थापक, प्रेषित मोहमदाचा जन्म १४०० वर्षांपूर्वीचा तर ख्रिश्चन धर्मप्रमुख संस्थापक, जीझस्‌ ख्राइस्ट्‌चा जन्म २००० पेक्षा कांही अधिक वर्ष पूर्वीचा, गौतमबुद्धाचा जन्म २६०० वर्षांपूर्वीचा...आणि श्रीरामाचा तब्बल ७००० वर्षांपूर्वीचा. त्यामुळं पृथ्वितलावरच्या, भूकंप, पूर, नद्यांचे बदललेले प्रवाह, दिशा आणि इतकच नाही तर परकीय आक्रमणांमुळं भौतिक, भौगोलिक हानी आदि विविध कारणांनी झालेल्या घडामोडीमधून, श्रीरामाच्या जीवनांतल्या घटनांच, रामायणकालाचं संशोधन करण हे अर्थातच सर्वांत जिकिरीचं’ पण त्यामुळ खचून न जाता आपण आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा शोध घेण, तरीही अव्याहतपणे सुरूच ठेवणार आहोत ना ? त्यामुळं भारतीय म्हणून आपल्याला आपल्या पुरातन जवळपास दहा हजार वर्षांचा इतिहस असलेल्या, नागरी संस्कृती, समाजरचना, प्रागतिक आणि नवनव्या संकल्पनांच स्वागत करणारी मानसिकता यांचा रास्त अभिमान बाळगायला हवा, आणि ख्रिस्तपूर्व १५०० वर्ष, आर्यांनी भारतीय उपखंडावर आक्रमण केलं होतं ही दिशाभूल करणार्‍या सिद्धांताचं खंडन करायला हवं. ज्या मॅक्स्मुल्लर्‌नं हा सिद्धांत प्रथम मांडला, त्यानच नंतर तो नाकारलाही, हे सर्वश्रुत आहे. पारतंत्र्यांत असतांना आपण सगळे मेकॉलेप्रेरित आणि मान्यताप्राप्त शिक्षणप्रणालीनुसार ’विद्याभ्यास’ (आभास ?) केला.. ’प्रत्येक भारतीय हा निम्नदर्जाचा मानव असून त्याच ’साहित्य’ म्हणजे इंग्लंड्‌मधलं एक फडताळ भरून पुस्तकं...ग्रंथ तर सोडाच..सुद्धा नसतील’ अशी हेटालणीवजा समजूत मनांत रुजविणं हा त्या शिक्षण प्रणालीचा मुख्य उद्देश होता. त्यांतून एखाद्या भारतीय माणसांत विशेष चमक दिसल्याबरोबर, ’हा, इंग्लंड्‌मधून आक्रमण करून, इथं स्थाईक झालेल्या आर्य वंशाच्या कुटुंबातलाच असला पाहिजे..’ अशी बतावणी करायलाही तत्कालीन ’गोरे’ मागेपुढे पाहात नसत. कुणीही या, मानहानीकारक सिद्धांताच्या पाठचं असत्य खॊडून, सत्यशोधनार्थ कृतिप्रवण झालं नाही त्या काळी...म्हणून आतां वेळ आली आहे की सर्व भारतीयसंस्कृतिसंवर्धक, संशोधक, विचारवंत, ज्ञानी, बुद्धिवादी आ सगळ्यांनी आतापर्यंत डोळ्यावर ओढून घेतलेली झापड दूर करून सत्याला सामोरं जावून ते विश्वाला ठणकावून सांगण्याची, आणि, ’ही तर भाकड पुराण कथा...’ म्हणून अवहेलना करणार्‍यांचे डोळे आणि कान उघडण्याची ! एकत्र येवूया, उपल्ब्ध पुरावे कागदपत्र, माहिती यांचा सूक्ष्म अभ्यास, विश्लेषण करूया, ज्या योगे आपण पुरातन समृद्ध भारतीय जीवनशैली, आणि समाजव्यवस्था यांच्यावर आनखी प्रकाश टाकू शकूं...मुद्रित आणि आधुनिक संवेदनेशील माध्यमांनी या सगळ्याची दखल घ्यायला हवी आणि वातावरणनिर्मिती करायला, आणि सुशिक्षित अबालवृद्ध जनमानसाला ही माहिती समजावून घेवून पचनी पाडायला साहाय्यभूत व्हायला हवं...त्यांतून उद्या कदाचित आणखी पुरातत्व संशोधक हे काम पुढं न्यायला तयार होतील, आणखी निर्भयपणे सारे निष्कर्ष अभिमानानं विश्वभरांत पोचवतील... ****** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment