Friday, April 19, 2013

कृष्णाचा कालखंड

कृष्णाचा कालखंड पारंपरिक संशोधकांच्या मते, कलियुग सुरू झालं, ख्रिस्तपूर्व ३०१२ मधे. महाभारतीय युद्ध किंवा कृष्णाचं परलोकगमन यांच्याशी या कालगणनेंचा काय संबंध आहे हे स्पष्ट होत नाही आणि ते इथं महत्वाचही नाही. त्यामधे साघारणतः ३५ वर्षांचा फरक आहे आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या आणि त्या दरम्यान घडलेल्या घटनांच्या तुलनेंत तो नगण्य आहे. अनेक महान खगोलशास्त्रज्ञ आणि कुंडलीकार भविष्यवेत्त्यांनी ग्रहगोलांच्या स्थानांच्य तौलनिक अभ्यासानंतर, दिननिश्चिती करण्याचा प्रयत्न केला आहे या आधी. प्राचार्य श्रीनिवासराघवन हे त्यापैकी एक महनीय नांव. त्यांनी, महाभारत युद्धाचा दिनांक ख्रिस्तपूर्व २२ नोव्हेंबर ३०६७ हा, निश्चितही केला आहे. पण यामधे, प्राचीन ग्रहस्थितींची नोंद अचूक असल्याच गृहित मानलं गेलय, जे सहजासहजी स्वीकारार्ह होणं जरा दुरापास्त वाटतं. म्हणजे याचा अर्थ त्यांचा होरा चुकीचा होता असं नाही. पण थोडा साकल्याल विचार होणं आवश्यक आहे. कांही संशोधकांच्या मते, ख्रिस्तपूर्व ३१०० इतकं मागं जाणं बरोबर नाही कारण, आर्यांचा भारत प्रवेशच मुळी ख्रिस्तपूर्व १५०० मधला मन्यताप्राप्त असा आहे. आणि म्हणून महाभारतयुद्ध आणि कृष्ण हे साहाजीकच त्यानंतरचेच. परंतू भरतवर्षावरच्या आर्यांच्या आक्रमणाची शक्यता आणि मुळातच तो सिद्धांत विज्ञानानं नाकारला आहे. मोहंजोदरो आणि हरप्पातल्य उत्खनना दरम्यान मिळालेल्या लेखांची उकल करतांना, वेदांचा उगम हा ख्रिस्तपूर्व ३५०० वर्षांच्या बराच आधीचा आहे हे ही स्पष्ट झालय. त्यामुळं हे होरे सहजी निकालांत निघतांत. एकमेव मुद्दा, ज्यावर चर्चा होवू शकते तो म्हणजे, विख्यात पुरातत्ववैज्ञानिक एस् आर् राव यांच्या संशोधनांतूल प्रकाशांत आलेलं. सौराष्ट्र किना-यालगत जलधिस्थ झालेलं द्वीरका बेट, जी, त्यांच्या मते कृष्णाचीच ख्रिस्तपूर्व १५०० वर्ष अस्तित्वांत असलेली द्वारका होय.. पण पुराभिलेखांच्या निरक्षरतेमुळे हे निष्कर्ष कितपत ग्राह्य मानता येतील या विषयी मतभेद असू शकतांत. त्यामुळं आणि हरप्पा इथ सापडलेले पुराभिलेख, जे ख्रिस्तपूर्व १५०० पेक्षा जळपास १००० वर्ष मगच्या काळांतले आहेत त्या ऐतिहासिक पुराव्यावरून वरून, राव महोदयांनी शोधलेली द्वारका ही कृष्णाची नक्कीच नव्हे हे स्पष्ट होतं. आतां कांही वेगळ्य दिशेनं कृष्णकाळाचा शोध घेऊन पाहू. अश्वलानं, महाभारताच्या ग्रंथकर्त्यांना, म्हणजे जैमिनी आणि वैशंपायन यांना प्राचीन असं संबोधलं आहे, त्या अर्थी महाभारतीय युद्ध आणि तो यांच्यांत किमान एक शतक इतका कालखंड गेला असणार असं गृहित धरायला हरकत नाही. त्यानं केलेल्या नोंदी प्रमाणं, पाऊस पडायला सुरुवात झाल्यावर, हिंदू पंचागातल्या भाद्रपदमासांत, जमिनीखालची बीजं अंकुरित होतांत. आज ही प्रक्रिया जेष्ठ किंवा आषाढांत होतांना दिसते. म्हणजे त्याच्या काळांत वर्षाऋतु आरंभ जेष्ठमासा ऐवजी श्रावणांत होत असावा, जसा तो आज होतो म्हणजे जवळपास सत्तर दिवस अलिकडे. पृथ्वीच्या ध्रूवीय बिंदूंमधून जाणा-या, आंसाच्या. सूर्य आणि इतर ग्रहगोलांच्या गुरुत्वाकर्षण परिणामी, अतिमंदगति पार्श्वगमनाच्या अवकाशी चमत्कारामुळं ऋतुंचंसुद्धा, स्थिर ता-यांच्या अवकाश-स्थानांच्या तुलनेंत, दर ७२ वर्षांनी एक दिवस या प्रमाणांत पार्श्वगमन होतं. आणि हिंदू पंचांग हे स्थिर ता-यांच्या अवकाश-स्थानांवरूनच मांडलं गेलय हे सर्वश्रुत आहे. याचाच अर्थ, अश्वलानं नोंदलेला वर्षाऋतु आरंभ हा ७० गुणिले ७२ म्हणजे जवळपास ५०४० वर्षांपूर्वीचा किंवा ख्रिस्तपूर्व ३००० वर्षांपू्र्वींचाच आहे. अश्वल हे कहोल कौषीतकी, या कौषीतकी ब्राह्मण वेदकालांतल्या तापसांपैकी ऋषींचे अनुयायी होते. ते महाभारतांतल्या अनेक व्यक्तिरेखांचा उल्लेख करतांत. शिशिरऋतुचा प्रारंभ म्हणजे आज आपण महाशिवरात्र साजरी करतो तो असाही उल्लेख दिसतो. परंतू शिशिरऋत्वारंभ २१ डिसेंबरला तर महाशिवरात्र १ मार्चच्य आसपास असते. हा परत एकदा पृथ्वीच्या ध्रूवीय बिंदूंमधून जाणा-या, आंसाच्या. सूर्य आणि इतर ग्रहगोलांच्या गुरुत्वाकर्षण परिणामी, अतिमंदगति पार्श्वगमनाचा परिणाम. म्हणजेच कौषीतकिच्या काळापासून, ऋतुचक्र ७० दिवस मागे गेले आहे, ५००० वर्षांपूर्वी. महाभारत युद्धाचं वर्ष हे ख्रिस्तपूर्व ३१०० याचा हा आणखी एक पुरावा. अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर आलेल्या कांही तत्कालीन ग्रीक प्रवाशांनी नमूद करून ठेवलेल्या बाबींप्रमाणे, आणि तत्कालीन उपलब्घ ऐतिहासिक दस्तऐवजानुसार, कृष्णाविषयी आणखी कांही रोचक माहिती मिळते. प्लिनी, हरि-कृष्णापासून नामोद्भवलेले हेरॅकल्स् असा उल्लेख करतो. ग्रीस मधल्या मॅथोरा नामक एका महत्वाच्य़ा नगराच्या, सौरसेनी जमातीमधे हेरॅकल्स्.. कृष्णानुयायी.. हे बहुमानप्राप्त मानले जात. आपण त्यांना शूरसेनी आणि मथुरा असं संबोधू, कारण शूर हा वसुदेवाचा जन्मदाता म्हणजेच कृष्णाचा पितामह होता. भारतीय हेरॅकल्स्.. कृष्ण.. ग्रीक उल्लेखाप्रमाणे, अलेक्झांडर आणि सॅंन्ड्राकोटोस् यांच्या आधी म्हणजे अंदाजे इसवीसन ३३० पूर्वी, १३८ पिढ्या अस्तित्वांत होते. एक पिढी म्हणजे सामान्यतः वीस वर्षे असा, भारतीय साम्राज्यांच्या संदर्भांत अदाज केला, तर १३८ गुणिले २० म्हणजे २७६० अधिक ३३० म्हणजेच ख्रिस्तपूर्व ३०९०. कलियुगाचा आरंभ ख्रिस्तपूर्व ३१०० असा परंपरेने नोंदलेला, या आकड्यांच्या सर्वसामान्य गणितीय परिभाषेने किती तंतोतंत जुळतो ते पहा. थोडक्यांत, तांत्रिक आणि अनेकविध स्रोतांमधून उपलब्ध प्रत्यक्षदर्शी पुराव्यांवरून आपण, परंपरेनं गृहित आणि मान्यताप्राप्त कलियुगारंभ हा सहाभारत युद्धाच्या अगदी समीपकाल अश्या निष्कर्षाप्रत अगदी सहज पोहोचू शकतो. आणि या भरपूर पुराव्यानं कृष्णाचं ऐतिहासिकत्व निर्विवादपणे सिद्घ होतं. इति.. Prof. N.S. Rajaram www.swordoftruth.com September 4th, 1999 :

No comments:

Post a Comment