Friday, April 19, 2013

कृष्ण.. ’इतिहास की पुराण ?

कृष्ण.. ’इतिहास की पुराण ?’ "वेदकाळाच्या अखेरच्या कांही वर्षांत, श्रीकृष्ण हा एक ऐतिहासिक पुरुष अस्तित्वांत होता. पारंपरिक भारतीय पुरावे हे या विधानाला पुष्टी देणारे आहेत. पण पाश्चिमात्य वसाहतवादी आणि धर्मप्रसारकांनी मात्र या ’इतिहासा’ला वेगळं रंगवत त्याचा विपर्यास करण्याचाच सातत्यानं प्रयत्न केला. ’इतिहास की पुराण ?’ आपण सगळे भारतीय, आणखी एक कृष्णजन्मोत्सव साजरा करायच्या उंबरठ्यावर असतांनाच, एक प्रष्ण, जो सगळ्यांच्याच मनांत खदखदत असतो: कृष्णकथा ऐतिहासिक की पौराणिक ? भारतीय हिंदूंच्या तृषार्त आत्म्यांची पोकळीं व्यापण्यासाठी कृष्ण ही निर्माण केली गेलेली केवळ एक प्रतिमा ? या प्रष्णांचा शोध घेण्याचा हा प्रयत्न... एक आदरयुक्त प्रेम, ओढ, असोशी यांनी व्यापलेलं व्यक्तिमत्व म्हणून कृष्ण हे भारतीय परंपरा आणि इतिहास या मधे आजवर, अबाधित राहिलं आहे. वसुदेव-देवकीनंदन आणि यादवकुळाचा राजपुत्र असलेला कृष्ण, बहुतेक हिंदूंनी, विष्णुअवतार म्हणून ग्राह्य धरलेला असतो. पण आजच्या वैज्ञानिक आणि तंत्र्ज्ञानाच्या प्रगती नंतर, अगदी हिंदूंना सुद्धा, कृष्णाच्या खर्‍या अस्तिवा किंवा नास्तित्वाबद्दल जाणून घेण आवडेल. कृष्णाच ऐतिहासिकत्व जाणून घेण्याची इच्छा, प्रक्रिया हे कांही नवल वाटण्याजोग आहे असं मुळीच नाही. संशोधक-विद्वान गेली जवळपास दोन शतक या माहितीचा वेध घेताहेत. विशेषत:, जेंव्हापासून कांही युरोपीय संशोधक, लाखो-करोडो भारतीयांचा हृदयस्थ असलेल्या या प्रतिमा-परमेश्वराच्या श्रद्धेचा मागावर आहेत. त्या संशोधकांनी निष्कर्ष काढला आणि त्यांना मानणार्‍या कांही भारतीयांनी सुद्धा तो स्वीकारला.. की कृष्ण हा प्रत्यक्षांत कधीच नव्हता आणि तो केवळ एक काल्पनिक भाकड आहे. एक अत्यंय उथळपणे काढलेला आणि बेगडी विद्वत्तेची झालर लावलेला निष्कर्ष होता तो. पण आतां या लेखमालेंतून श्रीकृष्णाच्या ऐतिहासिकतेबद्दलचे आणि हा इतिहास लवळपास पांच हजार वर्षांपूर्वीचा कसा आहे, याचे पुरावेच वाचायला तुमच्यासमोर आम्ही ठेवणार आहोत. महाभारत या महाकाव्यातल्या पात्रांबरोबरची त्या काळांतल्या दीडदोन शतकं असलेली श्रीकृष्णाची नाती, संबंध, संवाद जर आपन लक्षांत घेतले तर कृष्णाची ऐतिहासिकता आपोआपच प्रस्थापित होते, आणि कालख्डाच्या अचूकतेबद्दल म्हनायचं तर महाभारतांतल्या घ्टनाक्रमांचे उदाहरणार्थ युद्ध वगैरे.. नेमके दिनांक...तिथ्या म्हणूया हवंतर... निश्चित झाले की आपोआपच कृष्णाच्या आयुष्य़ाच्या तिथी आपल्याला स्थूलमानाने प्राप्त होतील. आअणि अशारितीनं मालखंदाची निश्चिती म्हणजेच त्याच्या ऐतिहासिकतेचा आणि पर्यायानं अस्तित्वाचा, पुरावा. लवळपास शतकभरापूर्वी, प्रसिद्ध बंगाली साहित्यकार बंकिमचंद्र चटर्जींच्या कृष्ण संदर्भांतल्या लिखाणांतून प्रकाशांत आलेल्या आणि पुतातत्ववेत्त्यांच्या संशोधनानं पुष्टी दिलेल्या बाबी मला मार्गप्रदीप ठरल्या आहेत. कृष्णाचा मागोवा घेत असतांनाचे कांही पुरावे: कृष्णद्वैपायन किंवा वेदव्यास म्हणजे आपल्याला आज ज्या स्वरूपांत माहीत आहेत त्या चार वेदांच्या निर्मितीला प्रेरणाभूत असलेल्या व्यक्तिमत्वाची धाकटी पाती म्हणजे कृष्ण, एक वेदकाळांतली विभूती होती, असं भारतीयांकडे उपलब्ध असलेली माहिती सांगते. व्यास अर्थातच अगदी प्रारंभीच्या आणि मूळ महाभारतकथेचे कर्ते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या व्यासकृत महाभारतांतल्या कालखंडातल्या कांही पात्रांची नांव, उपलब्ध असलेल्या, पांच हजार वर्षांपूर्वीच्या, तत्कालीन लेखांमधून किंवा हरप्पनकालीन शिक्के यामधून उजेडांत आली आहेत.उदाहरणार्थ, व्यास-शिष्य पैला, कृष्णाचा स्नेहसखा अक्रूर, वृष्णी, कृ्ष्णाचे पूर्वज यादव, श्रीतीर्थ, म्हणजे द्वारकेची तत्कालीन संज्ञा, वगैरे. या सगळ्या अभ्यासाला छेद देणार्‍या कांही बाबी म्हणजे, अठराव्या शतकांतल्या, कांही ’विद्वानां’नी प्रसृत केलेल्या कल्प कथा.. म्हणजे आर्यांच भारतीय भूखंडावरचं आक्रमण. सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी जेंव्हा मोहंजओदरो-हरप्पाचं उत्खननं होवून प्राचीन अवशेष उजेडांत यायला लागले, तेंव्हा या ’कल्पकथे’ला आणखी एक पुरवणी जोडण्यांत यायला लागली, ती म्हणजे आर्य आणि द्रविड यांचं युद्ध. पुरातत्व संशोधनोत्तर, विज्ञानानं आता या दोनीही बाबी नाकारल्या आहेत. आपल्याला आतां माहीत आहे की हरपा संस्कृती वेदकालानंतर उदयाला आली. विख्यात व्याकरणकार पाणिनीच्या ग्रंथांत, महाभारतांतल्या अनेक पात्रांचा उल्लेख आहे. उदाह्रणार्थ: वासुदेव म्हनजे कृष्न, अर्जुन, नकुल, कुंती वगैरे. वेदकालीन साहित्यकृतींमधे, महाभारतांतली पात्र जागोजागी आढलतांत.. कथकमधे विचित्रवीर्य, शिखंडी, कौशितकीमधे यज्ञसेन, ब्राह्मण, ऐतरेय ब्रह्मणमधे अभिमन्यूचा नातू जनमेजय आणि शतपथ ब्राह्मणमधे परिक्षित... आणि ही यादी न संपणारी आहे. बौद्धिक साहित्यांतल्या कुणाल जातकामधे, भीमसेन, अर्जुन, नकुल सहदेव आणि युधित्तिल.. युधिष्ठिर चं पाली रूप.. यांच्या बरोबर, कृष्णा, म्हणजे द्रौपदीचाही निर्देश आढळतो. कुरु जमातीतला धनंजय आणि द्रौपदी यांच्या स्वयंवराचा उल्लेख धुमकरी जातकांत पाहायला मिळतो. याच कृतींत, इंद्रप्रस्थाचा युधिष्ठिर, कौरवांचा पूर्वज म्हणून, आणि विदुरपंडित यांचा उल्लेख आहे. शिवाय महाभारतांतली, कृष्णासह वर उल्लेखिलेल्या पात्रांचा उल्लेख, सूत्रपितक, ललितविस्तार आदि बौद्ध साहित्यकृतींमधे आढळतो. हा उल्लेख कृष्णा आणि त्याच्या उपदेशाबद्दल फारसा आदरपूर्वक किंवा निर्मळ नसला तरी, तो तिथं अनिवार्य म्हणून आलेला आहे हेंच मुळी, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या ऐतिहासिकतेच्या स्वीकाराचं द्योतक आहे. त्या साहित्यकारांनी त्याचं महाभारतांतलं अस्तित्व नाकारलेलं नाही. वेदांकडे परत एक दृष्टिक्षेप टाकतांना, छंदोग्य उपनिषिदामधे, कृष्णासंदर्भांत एक अत्यंत रोचक उल्लेख आढळतो. ’देवकिनंदन कृष्णाला घोर अंगिरस म्हणतो..मला तुझ्या आश्वासनांनी तृषामुक्त केलय’ आणि प्राण असेपर्यंत त्यानं फक्त, ’तू अ क्षत.. अविनाशी, अच्युत..कालातीत, आणि प्राण संहित,.. जीवनप्रवाह.. आहेस’ या त्रिसूत्रीचीच आराधना केली. देवकीनंदन कृष्ण म्हणजे अर्थातच महाभारतांतील कृष्ण. भगवद्गीतेमधे नंतर कृष्णानं केलेला उपदेशाचं मूळ त्यानं घोर अंगिरसाकडून देदांविषयीचं ज्ञान मिळवितांना, केलेल्या विश्लेषण, विचार, चर्चा, त्यातून विकसन पावलेल्या संकल्पना याम्त असावं. गीता म्हणजे आपण सर्व उपनिषदांचा अर्क किंवा गाभ्याचासांख्य तत्वज्ञानाच्या प्रकाशांत घेतलेला वेध म्हणू हकतो. आणि उल्लेखनीय बाब म्हणजे गीतेचं हे मूळ घोर अंगिरसाच्या शिकवणींत आहे हे एका हरप्पन लेखांत नमूद केलेलं आपल्याला आढ्ळतं.. तो संदेश असा, ’घोर: दाता: द्वयु: अर्क:, म्हणजे घोरानं दिलेले दोन घनपाठ..पहिला उपनिषदं आणि दुसरा सांख्य तत्वज्ञान. म्हणून, भगवद्गीतेंत श्रीकृष्णानं सांगितलेल्या, वेदांत आणि सांख्य तत्वज्ञानाच्या संमीलनाचा शिल्पकार, ख्रिस्तपूर्व तीन सहस्रकाच्या कालखंडांत असलेला घोर अंगिरसच होता. महत्वाची नोंद घेण्याची बाब म्हेणजे हरिवंश किंवा भागवताप्रमाणे, उपनिषिदं, जातकं, सूत्र, किंवा ब्राह्मण ऐतिहासिक परंपरेचे भाग नव्हते. त्यामुळं नामोल्लेखांच कारण केवल केवळ, ती परिचित असणं एवढाच असूं शकतो. इतक्या विविध कालखंडांत लिहिल्या गेलेल्या अनेक बहुआयामी ग्रंथांमधे जेंव्हा कृष्ण आणि महाभारतांतली इतर पात्र यांचा उल्लेख सर्वसंचारी असा उपलब्ध होतो तेंव्हा, त्यांच्या ऐतिहासिकतेबद्दल किंचितशीही शंका कुणी उपस्थित करूं नये. आतां कृष्णाच्या अस्तित्वाच्या कालखंडाच्या अभ्यासाकडे आणि संशोधनाकडे पाहूं..

1 comment:

  1. Saushodhan zalech pahije pan navin itihas lihilagela nahi pahije karan halli itihas badalala ki motha sanman milato !

    ReplyDelete