Wednesday, April 10, 2013

एका परदेशी पर्यटकाला दिसलेली वस्तुस्थिती

या लेखांतला मजकूर, पचनी पाडायला जरा जडच जाणार आहे वाचकांना. पण वस्तुस्थिती, एका परदेशी पर्यटकाला...इतिहासांत नाही तर अगदी दोन-तीन वर्षांपूर्वी... दिसलेली, त्यानं अनुभवलेली आहे ही ! आणि वाचल्यावर तुम्ही कदाचित सहमतही व्हाल लेखांतल्या प्रत्येक विधानाशी. कारण सगळच वर्णन, त्या अवस्थेमागची कारणं, लाजिरवाणी आहेत, आपल्यासारख्या ’भारतीय’ म्हणवणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी ! सीन केली हे त्या पर्यटकाचं नाव आणि त्यनं नोंदविलेल्या अनुभवांची सूची, कोणताही पूर्वग्रह न बाळगता नजरेखालून नुसता न घालता, त्यावर, तुम्ही आम्ही, आपण सर्व ’भारतीयां’नी अंतर्मुख होवून विचार करेणं गरजेचं आहे, असं मला वाटतं. त्यानं नोंदविलेलं सगळच ’घृणास्पद’, ’किळसवाणं’, ’निंदनीय’ निर्विवादपणे आपल्याला ठाईठाई पाहायला मिळतय आणि आपण सगळे राजकारण्यांनी दिलेले ’अति लोकशाही’चे नशीले मूग गिळून ’गप्प’ बसलो आहोंत. पण या कदवट सत्याला आपण ’डोळे उघडून’ सामोर जायलाचं हवं..आणि परिवर्तनासाठी वचनबद्ध. कटिबद्ध व्हायलाचं हवं ! सीन्‌ केली आपल्या ’नोंदवहीं’त लिहितो.. तुम्ही जर भारतीय किंवा भारतीय वंशाचे असाल तर, मी आधीच तुम्हला सावध करतो, आणि मला जाणीव..नाही खात्री आहे की मी जे लिहीत आहे ते तुम्हाला मुळीच रुचणार नाही. पेण या लिखाणांतल्या कठोर शब्दांपेक्षा त्यामागच्या मित्रत्वाच्या नात्यानं दिलेल्या सल्ल्याची दखल तुम्ही घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तुमचा असा एक मित्र की जो अतिशय प्रामाणिकपणं आणि कळकळीनं कांही विदारक सत्य तुमच्यापुढं ठेवतो आहे. आणि अखेरीस पाश्चात्य संस्कृतीच्या दुराभिमानानं, आंधळेपणानं, मी हे सर्व नोंदवत आहे असा गैरसमज कृपया करून घेवू नका. कारण तुम्हा भारतीयांना सद्यपरिस्थितीचं भान असूनसुद्धा तसचं राहायची आणि गर्तेप्रत जायची इच्छा असली तर मी कोण बापडा, वेगळं कांही सांगू इच्छिणारा ? तेंव्हा तुम्हाला जे रुचेल पचेल ते ध्यानांत घ्या आणि बाकीचं सोडून द्या. त्यामुळं काहीही बिघडणार नाही, याहून जास्त. कारण माझ्या असंलक्षांत आलय्‌ की भारतीय विशेषत: ’उच्चभ्रू’ भारतीयांना कशाशीच काहीही घेण नाहिये ! आणि निम्न-स्तरांतल्या गरीब जनतेला खरं तर, जगाला आदर्श वाटावा असा या भारतभूचा समृद्ध वारसां , उच्च संस्कृती, परंपरा माहीतही नाहीत किंवा त्या जाणून घ्यायला, रोजची भ्रांत भागवता भागवता वेळंही नाही. असो.. तरी पण... भारत हा सर्वतोपरी एक ’गोंधळ’ आहे. इतक सोपं वर्णन होवू शकतं, इथल्या एकुणातल्यां (अ)व्यवस्थेचं...पण त्यांत सुद्धा गुंतागुंत आहे...सुरुवातीला आपण भारताचे चार मूलभूत प्रष्ण बघू. ज्या ’चांडाळचौकडी’कडे, भारताला प्रगतीप्रत यात्रेला साखळदंडानं जखडून ठेवण्याची शक्ती आहे..मग इतर कांही मुद्यांकडे वळू. प्रदूषण..मझ्या मते सर्वप्रथन या बद्दल बोलायला हवं. केरकचरा, पाऊस नसतांनासुद्धा ओल्या खरकट्याच्या कुजलेपणानं चिलटं,, डास, माश्या, झुरळं आणि पर्यायानं उंदिर, घुशी, पाली आदिंच्या प्रादुर्भावाला उत्थापन देणारा दमटपणा धूर ओकणारी वाहनं, काय ’वाट्टेल ते’....अगदी नर-जनावरंचे मृतदेहसुद्धा...टाकलेल्याआणि ’तरंग’रूपानं आपल्या दृष्टीस पाडणार्‍या नद्या, नाले, ’उतून,उचंबळत’ आपली वाट सोडून रस्त्यावरून वाहणारे सांडपाण्याचे. मल-मुत्राचे किळसवाणे, दुर्गंधीयुक्त ’ओघाळ’, विनाकारण केवळ विकृत आनंदासाठी वाजवले जाणारे कर्ण करकश ’भोंपू’..मला कळत नाही की हा कुठल्या संस्कृतीचा भाग असूं शकतो का पण या आधी मी तो कधीही आणि कुठेही अवुभवलेला नाही. पंचतारांकित विश्वकीर्त ’ताज’ हॉटेल्‌च्या दरवाज्याला लागून, ’असह्य’ दुर्गंधी, क्षणोक्षणी हवेंत उधळणारा टाकाऊ वस्तूंचा ढिगारा असावा ? हाय रे दुर्दैवा..बाहेर आल्यावर आंत घेतलेल्या, आदरातिथ्याचा ’ताज्‌’या अनुभवाला छेद देणारा हा ’अतिप्रसंग, पर्यटकांनी कां म्हणून सहन करावा ? कांही कमी प्रमाणांत पण दिल्ले, बंगलोर, चेन्नईंतही ह्या ’वातावरणा’मुळं मला शारीरिक त्रास...सायनस्‌, कर्णपटलावर दुष्प्रिणाम,, अपचन, पोटांत ढवळणे यासारखे..सहन करावे लागले. शेण.. मग त्या बकरीच्या लेंड्या असो की गाई-म्हशींच उत्सर्जन किंवा मानवी विष्ठा..हा एक ’सर्वदूर मार्गप्रदीप भारतीय’ अनुभव. त्यांतून प्रेक्षणीय(?) स्थळां सभोवताली तर केवळ ’अवर्णनीय’ अगदी शब्दश:..परिसर ! रस्त्यांच्या मधोमध मुत्र्या, संडास, ते सोडून इतरत्र ’उत्सर्जन’ करू पाहाणारे बापडे, बाया... काय काय म्हणून सांगू ? शहराच्या जरा बाहेर पडाव आणि ग्रामीण भाग लागावा तोंच आढळतांत प्लस्टिक्‌च्या पिशव्यांनी जवळजवळ ’तुंबलेले’ रस्ते. रस्ते कसले हव्यातशा बांधलेल्या घरांच्यामधून दिसणार्‍या पायवाटा. अन्‌ हवेची शुद्धता ? शुद्धता कशाशी खातांत हे इथल्या हवेला अभावानच माहिती असावं बहुधा ! वाहनं जो धूर ओकतांत त्यांतल कर्बाचं आणि शिशाचं प्रमाण हे इतकं घातक असतं की, ते किती हितकारी आहे या पेक्षा ते किती घातक आहे याचंच मोजमाप घ्यायला हवं. ग्रामवासीच काय पण शहरी ..’नागरी’ जनतासुद्धा रस्त्यांवर हवा तो, तसा आणि तेंव्हा विविध प्रकारचा कचरा फेकत असतांत. . त्यांतल्या त्यांत दोन शहरं.. एक म्हणजे केरळ राज्याची राजधानी त्रिवेन्द्रम्‌ आणि दुसरं कालिकत... ही त्यांतल्यात्यांत स्वच्छ आणि ’सुसह्य’ वाटली. मला माहीत नाही, पण भारताच्या उत्पादक आणि उद्योजक शक्ती ताकद आणि क्षमता या सर्वांवर या सगळ्याचे दूरगामी परिणाम, जर परिस्थिती अशीच राहिली तर, निश्चित होतील. जुनाट, अनावश्यक, अडगळ सदृश परंपरांच्या आणि अंधश्रद्धेच्या विळख्यांत अडकलेल्या या देशाला. सर्वप्रकारचं प्रदूषणांतून मुक्ती कशी मिळणार हा एक मोठा प्रष्ण आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा.. आवश्यक आणि अनिवार्य सुविधांची उपलब्धता. रस्ते, रेल्वे, बंदरं आणि विद्युतीकरण. विजेचा अखंद लपंदाव हा एक अत्यंत विनोदी आणि उद्विग्न करणारा प्रकार इथं अनुभवायला येतो. बहुतेक सर्व जनसामान्य त्यांनी किंमत मोजलेल्या विजेपासून दिवसेंदिवस वंचित असतांत. ताचा उत्पादकतेवर थेट परिणाम होऊन ती घटणारच ना ? (क्रमश:) *** भाग २ बंदरांमधली जुनात, बाबा आदमच्या काळांतली कालबाह्य यंत्रणा, आधुनिक तंत्रिक सुधारणा झालेल्या जगांतल्या, ’कंटेनर्‌’ हा्ताळ्ण्याची क्षमता असलेल्या बंदरांशी कशी स्पर्धा करणार ? रस्त्यांची अवस्थासुद्धा याहून कांही वेगळी नाही. माझ्या प्रवासा दरम्यान मी थायलंडमधे, जो देश युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेंत खूप मागसलेला सनजला जातो, तिथं फक्त, स्तरवृद्धी करून तयार केलेले, सर्वसामान्य रहदारीला बाधा न आणणारे. जवळजवळ दोनतृतियांश भूमीला सेवा देणारे असे द्रुतगती किंवा महामार्ग बघितले. आणि इथं ? एकेरी वाहतूक असलेले महामर्ग अभावानेच, वाहतूक नियमांची, जनतेनं केलेली ’ऐसी की तैसी’, रहदारीच्या नियमांची अंमलबजावणी करण्याबाबतची प्रशासनाची उदासीनता. भ्रष्ट पोलिस-यंत्रणा, अंतर कापायला लागणारा तिप्पट वेळ, तीसतीस वर्ष जुन्या, देखभाल नसलेल्या, कार्बन्‌ मोनॉक्साइड्‌च्या विषारी फुफुसांना अत्यंत घातक धुराचे लोट आणि ऊष्ण बाष्फ ओकणार्‍या बसेस्‌.. यादी कमी आहे ? जो जो भारतीय, रेल्वेनं प्रवास करतो तो अत्यंत त्रासलेला असतो.. संतापजनक प्रकार असतो सगळा ! गेल्या पांच वर्षांत तर स्थिती आणखी बिकट झाली आहे, इतकी की पर्यायानं तिचा परिणाम मनुष्यबळाच्या क्षमतेवर आणि परिनामत: उत्पादकतेवर दिसणं अनिवार्य आहे. नुसती चुकशी करायला, खिडकीपर्यंत पोचायला अर्धा अर्धा तास घालवावा लागावा ? चारचार, पांचपांच दिवस आधी आरक्षण ’तुडुंब’.. मग काय करणार ? बिचारे प्रवासी, त्या भयानक अवस्थेंतल्या ’बस्‌’ नांवाच्या वाहनांत ’बस’तांत. दररोज जवळपास पांच कोटी भारतीय आणि अन्य प्रवासी दाखल होतांत रेल्वेंत प्रवासहेतु ! पांचशे प्रवासी तर रोज प्रतीक्षा यादींत असतांत. रेल्वे ही सर्वसामान्य जनांना परवडणारी आणि उपल्ब्ध सुविधा आहे इथं हे मान्य करायलाच हवं.अन गर्दी ? अबब ! स्वस्तातल्या विमान प्रवासाच्या आजकाल, कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे फोफावलेल्या संधींमुळे ज्यांना परवडतो ते विमानप्रवास करतांत आणि मग उरलेली परचूटन ’जनता’ ?... ओथंबलेल्या रेवेच्या डब्यांतून अक्षरश: ढोरांसारखा प्रवास करते. पन ’कुणाला काय हो त्याचे ?’ रशिया, इज्रायल्‌ आणि अमेरिकेकडून शस्त्रखरेदीच्या, फायदेमंद ’उपद्व्यापा’पुढे, या देशाचं, इतर बाबींबाबत ’मंद’गती होणार सरकार, इथल्या नागरिकांच्या कल्यानकारी योजनांबद्दल आणि त्यांच्या अंमलबजावणी बद्दल किती गंभीर, कटिबद्ध आणि इच्छुक आहे याबद्दल मी खरंच साशंक आहे. शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, जो दोन भागांत विभागला जावू शकतो, ज्याला, एखाद्या नाण्याच्या दोन बाजूं सारख्या आहेत, तो म्हणजे नोकरशाही किंवा ’कचेरी’शाही आणि भ्रष्टाचार. निवास व्यवस्थेसाठी तिप्पट रक्कम, भमणध्वनिसुविधेचं SIM मिळवण म्हणजे, लालफितीचा अतिरेक, कारण छायाप्रती, हे प्रमानपत्र तो परवाना... अरे रे.. या सगळ्या जंजाळांतून कुणी डोक शाबूत राहून बाहेर येन मुषकिल. अशी ही ग्राहक सेवेची कथा आणि व्यथा. रेल्वेची तिकिटे मिळणे ? आणखी एक दुरापास्त अनुभव. गाडीचा क्रमांक शोधा ...तीस मिनिटे..मग अत्यंत ’अवधड’ परीक्षेच्या प्रष्णपत्रिकेसारखा अर्ज भरा.. मग ती मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत राहाणारी रांग... खिडकी पर्यंत पोचायला कमीतकमी आणखी अर्धा तास..आणि एक क्षुल्लक चूक.. तिथल्या कारकुनानं दाखविली की परत, ’येरे माझ्या मागल्या’.. रांग-शेपटा शेवटी ! सरकारला धनिकांच्या लांगूलचालनापुढे, किंवा स्वत: श्रीमंत होण्याच्या गडबडींत, सर्वसामान्यांचे प्रष्ण जणू कांही जाणवत नाहीत किंवा ते त्यांच्याकडे काणाडोळा करतय्‌. उदाहरणार्थ, नगरपालिका धनिकवस्तींत स्वच्छतेच्या इतक्या सुविधा पुरविते की सामान्य वस्त्यांमध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळ, मनुष्यबळ पैसा आणि सर्वांत शेवटी.. इच्छाशक्ती अभावानंच असते. सरकारी पगारावर पोसणारे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालयांत बहुश: हजर नसतांत कारण ते खाजगी व्यवसाय करण्यांत व्यग्र असतांत आणि रुग्णालयांत, सेवेकर्‍यांची संख्यासुद्धा पुरेशी नसते. मी आणखी कांही काळ बदलाची वाट पाहाण्याच्या मताचा होतो पण इथल्या नागरिकांनाच कशाची खंत वाटत नाहीत आणि बदल करण्याची त्यांची मानसिकताही मला जाणवली नाही.. भारताची आर्थिक राजधानी मुंबई,म्हनजे घाणीचं साम्राज्य, जिथं गलिच्छ झोपडपट्ट्या,, गरिबी हे माणुसकीचे शत्रू सर्वदूर माजलेत. कल्पनेपलिकडच्या अशा व्हिएतनाम किंवा इंडोनेशियामधल्या शहरां(?) इतक्या किंवा किंबहुना जास्त. अतिप्रदूषित मेदान हे सुमात्रामधल ठिकाण पण सगळ्यांय मोठे उंदिर आणि घुशी मी फक्त मंबईतच पाहिले बुवा ! मागासलेपणा ? मी समजू शकतो की जिथं नोबेल्‌पुरस्कार विजेते, अणुवैज्ञानिक, विख्यात अर्थशास्त्रज्ञ, समृद्ध उद्योगांचे जनक हे जन्म घेणं दुरापास्त आहे अशा ठिकाणी मला नवल वाटलं नसत. पण भारतांत हे सगळ आहे आणि भारतियांनी हे सगळ मिळवलय. पन अंतिम चित्र ? नुसतं धूसर नाही तर अंध:कारमय ! श्रीमंतांची काम करायला गरीब आहेतच आणि ते गरीबच राहाताय्‌त त्यामुलं ही दरी अशीच वाढत जाणार, रुंदावत जाणार. भातराकडे आणि भारतीयांकडे जगाला देण्यासारख पुष्कळ आहे... पण माझ्या आयुष्यांत हे ’देण’ बघण्याची, भोगण्याची मनिषा कितपत राहील याबद्दल मी साशंक आहे. मला तुम्ही हवंतर पाश्चिमात्य सांस्कृतिक सरंजामशहा म्हणा, किंवा वाया गेलेलं पोट्ट म्हणा, पण त्याच वेळी हेही लक्षांत घ्या की इथियोपिया सह, जगांतले जवळपास प्न्नास देश मी पालथे घातले आहेत एक पर्यटक म्हणून..आणि कुठेही, इथल्याइतक्या तक्रारयोग्य बाबींची भलीमोठी यादी मी वाचल्याचं मला स्मरत नाही. आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे निष्क्रीय आणि अनिच्छासक्त आणि स्थितिप्रिय भारत !! ***** अरुण काकतकर 24ak47@gmail.com www.target point.blank.blogger.arun kakatkar .

No comments:

Post a Comment