Thursday, August 25, 2011

’व्यथा’, ’आषाढ,, ’शिवस्तुती’


’व्यथा...’
मला बी वाइच होउद्या म्होरं, जायचय्‌ बघाया शिंगापुरं
मोडा टाक, नी सांडा शाई, अशी संधी पुन्यांदा यायची नाई
चार बुक नाई, लिवली तरी चालल, निवडून या मंग बगा चक्रच फिरल
’उंडण फिंडण मला नग नग, सिंगापुरच्या ’रातींचं’ पाह्यचय जग
थोडाफार पैका खर्चिन खरं ! पर पाहनारचं बा म्या शिंगापुरं
माग येक भामटा ’चला’ म्हनला ’भाऊ’, शिगणापुरला एकदा जावनच येऊ
पोचलो तिथं, तर शनिदेव ’राऊ’, वाटलं भामट्याला गिळू कि खाऊ
’मर्‍हाठी’च्या कौतिकाचा वाजतोय ढोल, उंडणच्या आवताणाचा सांगावा फोल..
यांच्यापेक्षा थेट, ते ’राजकारणी’ बरं, आनत्यांत म्हनं हितं शांघाय,.शिंगापुरं
****
आषाढातला महाराष्ट्र...
मेघांचे मृदुंग, पक्षांचे वादंग, तळ्यांत तरंगरानोमाळी
ज्ञान्याचे, तुक्याचे, संतांच्या कुळींचे, अभंग ओवी साधीभोळी
दु:खांना वारीती, सुखाना सांगाती घेवून चालले वारकरी
थंडी, वारा, ऊन देहाला ताडीती ओठांत एकच नाम ’हरी’
प्रत्येक हृदयी ठाकला, वालला, भक्तीच्या भारानं पांडूरंग
काहून तिष्ठती देऊळाच्या पुढं ? अपंग मनांची उगा रांग !!
****
’शिवस्तुती’
शिवछत्रपतींच्या पवित्र चरणाखाली, देशाची कणखर माती पवित्र झाली
गड-दगडांच्यात्या अवघड जाळ्यामधला, यश-तोरण बांधुन गड राजांचा हसला
त्या हिमालयाचे शुभ्र बुरुज राखाया, यशवंत कीर्तिची नित्यच स्फुरते काया
मायभू चरणीच्या लेवुन आज गुलाला, मावळा मराठी योद्धा सरसावला
या गनिमाच्या ’सोंगा’ला जे जे भुलले, समजून असा ! खिंडीत द्वंद्व ते हरले
ज्या बाळगुटित आवेश त्वेष मिसळला, ठेचाया अतिरेक्यास सिद्ध प्रज्ज्वला  

No comments:

Post a Comment