Monday, December 5, 2011


’थप्पड’...
’थप्पड’ म्हणजे, लहान मूल फारच हट्ट करू लागले तर, ’कल्याणकारी’ क्रोधापोटी, आई किंवा वडिलांनी हलकेच गालावर मारलेली चापटी. शारीरिक इजेपेक्षा मानहानीकारक, मानसिक क्लेश देणारी.. ! ही जेंव्हा उलट्या तळव्याने, जरा जोरांत मारली जाते तेंव्हा ती गालावर आपली गुलाबी (किंवा ’वांगीरंगाची’) नाम(मात्र)मुद्रा उठविते.
असो... ! विनोदाचा भाग सोडू...
पण
शिवछत्रपतींच्या पवित्र चरणाखाली, वीरभू, रांगडी माती पवित्र झाली
गड-दगडांच्या त्या अवघड जाळ्यामधला, यश-तोरण बांधुन गड राजांचा हसला
उत्तुंग हिमांकित शुभ्र बुरुज राखाया, कणखर देशाची नित्य स्फुरतसे काया
मायभू चरणिच्या लेवुन आज गुलाला, मावळा मराठी जवान सरसावला
गनिमाच्या या ’सोंगा’ला जे जे भुलले, समजून असा ! खिंडीत द्वंद्व ते हरले...
ज्या बाळगुटित आवेश त्वेष मिसळला, गालांत हसत जिंकतो क्रुद्ध शत्रूला
असं सार्थ वर्णन लागू पडणार्‍या एका ऋजु व्यक्तीला कोण्या एका माथेफिरूच्या ’थप्पड’हल्ल्याला बळी पडावं लागलं या इतक दुर्दैव नाही. पण हा ’चप्पल-बूट्‌-हस्त’ ताडनाचा सिलसिला बर्‍याच वर्षांपासून अमेरिकेंत सुरू झाला, अध्यक्षांवरील हल्ल्यांपासून. त्यामधे गोळीबारांत बळी पडलेले जागतिक कीर्तीचे राष्ट्रप्रमुख जॉन्‌ केनेडी, मार्टीन ल्यूथर्‌ किंग, इंदिराजी ! श्रीलंकेत, हल्ल्यांतून बचावले राजीवरत्न गांधी, पण मानवी बॉम्ब्‌नं पेरांबदूरमधे त्यांचा प्राण घेतला. त्यानंतर चिदंबरम्‌, आणि आता शरदराव...
आदरणीय शिवसेनाप्रमुख, महाराष्ट्राचा ’ढाण्यावाघ’, मराठी माणसांच्या स्वाभिमानाचे आधारवड बाळासाहेबांचे, शरदराव, राजकारणा पलीकडचे स्नेही. बाळासाहेबांची बहुतेक विशेषण त्यांनाही लागू होतांत. म्हणूनच त्यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा शिवसेनाप्रमुखांनी निषेध केला.  
प्रेषितांचे पाय मातीचे...ठीक आहे ’म्हण’ म्हणून. पण आधी मातीचे नुसतेच पाय. त्यांतून फोफावलेली विषवल्ली स्वत:ला प्रेषित म्हणवून घेते आजकाल..अशाच एका नेत्या(?)वरही, राष्टकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्यांत अडलल्या मुळे, तिहारमधे नेतांना हल्ला झाला पण त्याचा साधा निषेधही कोणी केला नाही हो !).आणि मग त्याच माळेंत, महात्मा गांधींच्या समाधी समोर बसून केलेल्या चिंतन’ फिंतनाला विसरून, आपल्या वयायोगे प्राप्त झालेल्या अपेक्षित परिपक्वतेला विसरून, ’एकच ?’ असा अत्यंत चीड आणणारी ’आचरत कोटी करणार्‍या, ’सिद्धी’पुरुषअला आम्ही का लेखू नये ?
पण आपल्याकडे, हल्लेखोराच्या बिचार्‍या निरपराध कुटुंबियांना, नातेवाइकांवर, नंतर ज्या पद्धतीनं मानसिक, शारीरिक हल्ले होतांत तेही तितकचं गर्हणीय आणि निषेधार्ह. म्हणजे एकानं गाईची ’हिंसा’ केली म्हणून दुसर्‍यानं ’वासरा’ची करावी तसंच कांहीसं ! एकानं कांही विशिष्ट हेतून हिंसा केली म्हणून त्याची सर्व ज्ञाती वाईट ? मग त्याची घरदारं जाळणं, त्यांना रस्त्यावर आणणं ही कुणी शिकविलेली आणि आचरणांत आणलेली 'अहिंसा,...मग 'गांधी' टोपीखाली काळे धंदे करणारे वाईट, म्हणून गांधीटोपी घालणारा मुंबईचा डबेवाला वाईट ? अशी त्रैराशिक मांडणार्‍यांचे सडके मेंदू तर मग हिट्‌लर्‌पेक्षाही हिंस्र मानायला हवेत !
दीडशे वर्ष, ब्रिटिशांच्या सत्तेशी, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढणार्‍या कच्च्याबच्यांची, ज्यांत आमच्या नाशिकचा बाबू गेनू होता, पुण्याचे चाफेकर बंधू होते, नाशिकचे कान्हेरे, राजगुरूनगरचे राजगुरू, पंजाबातले भगतसिंह, मदनलाल धिग्रा होते. विसरलांत इतक्यांत ? आणि ’रानी झांसीवाल’ ? ’कित्तुर चेन्नम्मा’ ? अहो अजून उणीपुरी सत्तर वर्षही नाही झाली हो त्या हुतात्म्यांना अनंतांत विलीन होवून ! स्वत:ला फाशी झाल्यानं आपण एका निष्पाप स्त्रीला वैधव्याच्या खाईंत लोटून,  किंवा संपूर्ण कुटुंबाच्या स्वास्थ्याला सुरुंग लावतो आहे असले विचार त्या क्रांतिकारकांच्या भडकलेल्या मनाला कधीच स्पर्श करू शकले नाहीत.... त्यांच्या डोक्यांय फक्त अखंड भारत, असेतुहिमाचल, पश्चिमेला अफगाणिस्तान सीमेपासून ते पूर्वेला चीनच्या सीमेपर्यंत हिंदुस्थान हे एकच स्वप्न होतं. ’स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे..’ असं न्यायालयाला ठणकावून ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?’ असा सवाल करणार्‍या पुरुषसिंव्हाचा सक्रीय पाठिबा आणि वरदहस्त या ’क्रांतिकारकांच्या’ माथ्यावर होता.
'सारख' वारकरी' वारकरी' म्हणून आरडाओरडा करणार्‍या आय्‌बीएन्‌लोकमतवाल्यानं हे लक्षांत ठेवायला हवं की, वारीला जातांना, पांडुरंगाच्या नावाच्या गजरापेक्षा वारकरी, त्याच्या महान भक्तांचा, ज्ञान्नोब्बामाऊली-तुकाराम असा घोष करीत चाललेले असतांत. तुकोब्बाराय तर ' भले तरी देवू कांसेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी' ... अशा, योग्य तिथे आक्रमक व्हा असा संदेश देणारे, शिवछत्रपतींचे गुरू समर्थ रामदासांच्या समविचारी होते. महात्मा गांधींना नथुराम गोडश्यांनी, आधी हात जोडून, आपल्या अमानुषत्वाची लाज वाटून, माणुसकीला नमस्कार करून घातलेली गोळी ही पिस्तुलातून सुटल्यानंतर, पस्तीस कोटी जाज्वल्य देशप्रेमी भारतीयांची हृदयं विदीर्ण करीत त्याच्या ठिकर्‍या उडवीत, चिंध्या करीत, सरदार वल्ल्भभाई पटेलांसारखे ’सच्चे’, स्वकीयांच्या हिताला आणि आत्माभिमानाला सर्वोच्च प्राथमिकता देणारे,  फाळणीविरोधी, धुरंधर राजकारणी नेते,  त्यांच्या 'अखंड भारत'प्राप्तीच्या, आसुसल्या भावनांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडवीत, बावन्नकोटी रुपयांच्या नोटांच्या चिधड्या उडवीत पुढच्या प्रवासाला निघाली होती. हे कुणी ध्यानांत घेतल तेंव्हा ? अहो निरुपद्रवी घाबरट मांजरीला जरी कोनाड्यांत गाठायचा प्रयत्न केला तर ती, 'आपण वाघाची मावशी आहोत' या विचारानं, शत्रूच्या नरड्याचा वेध घेते. मग ही तर माणसं...गांजलेली पिचलेली माणसं होती. फाळणी नंतरच्या सिंध, पंजाबमध्ल्या विस्थापित जनतेच्या, सर्व संसारासकत गांवं सोडून जातांनाची ससे-होलपत ज्यांनी पाहिली आहे त्यांच्याही अंगावर शहारे येतांत नुसत्या आठवणीनं. मग तो’ काळा अनुभव’ प्रत्यक्ष घेतलेल्यांच्या हृदयांतली भडस कशी कोण जाणू शहणार ? 'क्रांतिकारकांच्या आईबापांना काय हौस होती आपली मुलं होरपळींत ढकलायची ?  मग लचके तोडू पाहाणार्‍या पाकिस्तान चीनच्या सैनिकांना संरक्षण देवून, त्यांना गीतेचे पाठ ऐकवून, अहिंसेची ही ज्योत (?) अशीच तेवत ठेवा की ? आणि माझ्या सैनिक टाकळीच्या, प्रत्येक कुटुंबातल्या, सैन्यांत पाठविलेल्या एकेका तरुण मुलाला, 'चिन्यांना कंठस्नान का घातल ? पाकिस्तान्याला गोळी का घातली ?' म्हणून न्यायालयांत खटले चालवून फाशी ठोठवा...!  कसं ?
सध्या देशाची लोकसंख्या आहे फक्त पस्तीस कोटी  नेते आणि कार्यकर्ते मिळून. बाकी सगळे, किडामुंगी सारख एक नगण्य आयुष्य, निसर्गानं जन्माला घातलं म्हणून आंणि आत्महत्येचं धाडस नाही म्हणून बापडे जगत आहेत...रोज विविध दिशांतून ’थपडा’खात, त्या दूषित पाण्याच्या घोटाबरोबर गिळत...’थपडा’ कधी नेत्यांकडून तर कधी कार्यकर्त्यांकडून. कधी ’दगड’ देवाच्या ढॊंगी’ भक्त बाबा-बुवे-(संधी)साधू, जरीमरी काळी जादूवाल्यांकडून तर क्धी, रक्तानं स्वाक्षर्‍या करायला लावणार्‍या, तथाकथित ’अंधश्रद्धा निर्मूलन(?) वाल्यांकडून, तर कधी, ’पाळीव प्राणी भूतदये’ (तो पिसाळला तरी ?... गंमतच आहे !) च्या ’भुतानं पछाडलेल्यांकडून, कधी जमीन माफिया तर कधी तेल माफिया, वाळू माफिया तर कधी होळी ते ख्रिसमस, वर्षभर विविध (अ)धर्म महोत्सवाच्या नावाखाली ’चंदा; गोळा करीत हिडणारे, आणि त्यांतून ’आर्थिक उन्नती’ साधत मिळालेल घबाड ’वाटून खाणार्‍या उद्याचे तरुण-तडफदार युवकांकडून...’थपडा..थपडा..आणि थपडा’ फक्त..
अहिंसा-तत्वाचे अध्वर्यू महात्मा गांधींच नाव धेत अनावरण, उद्घाटनाच्या निमित्तानं, स्वत:ची (निर्‌)लज्जा तलवारी उपसत क्षणोक्षणी अनावर होवून अनावृत्त करणारे गल्लीकर ते दिल्लीकर रोज झळकताय्‌त वृत्तपत्रांत, विविध वाहिन्यांवर आणि माध्यमं कमावताय TRP वाढवून त्यांतून रग्गड पैसा...मला इथं बादल सरकारच्या ’जुलूस’ या नाटकाची तीव्रतेनं आठवण होते...संसदेत मिली भगत जरून, ’हंगामा’ करीत, कोट्य्वधी रुपये रोज पाण्यांत घालत दोनीहीकडच्या बाकांवरचे, मतपेटींतून (?) की ’खोक्यांतून ? निवडून(?) आलेले, आणि एक ’टर्म्‌’ पूर्ण व्हायच्या आतच, ’कौन बनेगा करोडपती’ पेक्षाही अधिक वेगानं, गब्बरसिंव्ह कोट्याधीश होणारे ५८४...’सब अलबेल है ! चलो ! हटो !, सब अलबेल है’ अशा बरळत आरोळ्या ठोकत हातांतली लाठी किंवा ak47 चालवत हिडताय‍त, ’सारे जहाँसे अच्छा’ असलेल्या या ’हिंदोस्तां’त ! कुठं जायच पंच्याऐंशीकोटी किडामुंग्यांनी ?
मग उजाडते एक दिवस ’फ्रेंच्‌ क्रांती’, हिट्‌लर्‌, गोअरिंग, हेस्‌, स(उ)द्दाम हुसैन, गडाफीच्या जातकुळींतल्यांना बिळांतून, गटाराच्या पाईपमधून बाहेर खेचून, कद्रावलेली, पिसाळलेली जनता, उंदरा-कुत्र्याच्या मौतेनं मारते...नाईलाजानं...मनांत बेगडी ’अहिंसा जपत...
अरुण काकतकर.
24ak47@gmail.com

No comments:

Post a Comment