Tuesday, April 10, 2012

’चित्राक्षरे’

’चित्राक्षरे’ ’अपलम चपलम, चपलाइ तेरे दुनियाको छोड चली आइ रे आइ रे आइ रे. या दिदींबरोबर गाइलेल्या ’आझाद’ या हिदी चित्रपटांतल्या गाण्यानं खरंतर, आपली हिदी आणि एकूणच, १९५३मधे, पार्श्वगायनाची सुरुवात करणार्‍या आदरणीय उषाताई मंगेशकरांना यंदाच्या ’राम कदम पुरस्कारानं गौरविण्यांत आलं. उषाताई आपल्या स्वरेल गीतांनी, लावण्यांनी, भावगीतांनी, भक्तिगीतांनी मराठी प्रेक्षक श्रोत्यांना रिझवीत असतांनाच, त्यांचं स्व्त:च असं एक, रंगरेषांच भावविश्व त्यांनी निर्माण केलं होतं. स्वराविष्कारानं समाधान होईना म्हणून की काय त्यांना हा चित्र प्रपंच मांडावासा वाटला. दिदींच्या अनेक अल्बम्‌ची कव्हर्स्‌ उषाताईंनी चितारली आहेत. ’लता सिग्ज्‌ गालिब’ किंवा ’चाला वाही देस’ मधल्या रचना...हृदयनाथांनी संगीतबद्ध केलेल्या आणि दिदींनी गाइलेल्या अप्रतिम अवर्णनीय आहेतच. पण त्या ऐकण्या आधी त्या लॉंग्‌ प्लेइंग्‌ तबकड्या...पूर्वीच्या काळच्या...हातांत पडल्या की प्रथम दर्शन व्हायचं ते त्यावरच्या सुंदर चित्रांचं..उषाताईंनी चितारलेल्या... आपण काय ऐकणार आहोत याची यथार्थ पूर्वकल्पना देणारी चित्र...त्या मानसिक अवस्थेप्रत पोचायला साहाय्यभूत ठरणारी. त्या चित्रांची संकल्पनासुद्धा कलाकाराच्या सर्जनशीलतेची साक्ष पटविणारी. ’गालिब..’च्या मुखपृठावर एका जुन्या मुघल कालीन महालाच्या सज्ज्यांतून, हातांत ’श्मा’ घेवून जानारा एक अकेला ’गालिब दिसतो अपल्याला.. आणि मनांत फुलतांत त्याच्या गझलचे लब्ज्‌, त्या मधल्या नि:शब्द सुरेल लम्ह्यांसह.. ’बाजे चै अत्‌फल, ये जमाना मेरे आगे, होता है शबेरोज तमाशा मेरे आगे...’. मीरा चालली आहे आपल्या लाडक्या हरीमधे..जो प्रियकर, त्राता, ’माई’ सर्व कांही आहे... विरघळून जायला...अगदी सर्वसंग परित्याग करून.. परित्याग पण किती टोकाचा ? आधी राज्ञीपद, नंतर मेवाडचा राणीराजविलासी राजवाडा, आणि अखेरीस परिसीमा म्हणजे, जन्मभर हरिभक्ती साठी आळवणी करतांना, विरहव्यथा मांडतांना, ज्यानं साथ दिली, त्या एकतार्‍याचा भारसुद्धा तिला असह्य झाल्यामुळं ती तो एकतारा सुद्धा त्यजून, त्याला तसाच तापल्या वाळूंत सोडून गेली आहे. चित्रांत आपल्याला दिसतो तो फक्त एकतारा आणि दूर दूर जाणार्‍या पावलांचे ठसे. खरंतर उषाताईंचं पहिलं प्रेम म्हणजे पेंन्टिंग आंणि ’पुढाकार’ घेवून करायची ’घरगृहस्थी;... घर टापटिपीचं आणि व्यवस्थित, स्वच्छ आणि शिस्तीचं ठेवणं.. खरं तर रंग आणि रेषांच्या आविष्काराचं आभाळ त्यांना अपुरं पडलं असावं, स्वाभाविक सर्जनशीलतेला आणखी अवकाश हवहवसं झालं म्हणून त्यांनी स्वरसरितेच्या कांठावरची गांव पादाक्रांत करायला सुरुवात केली आणि तिथही त्या किती यशस्वी झाल्या हे कांही मी सांगायला नको. त्यांच्या चित्रांच्या संकल्पना, जन्मत:च लाभलेल्या, अगदी घरांतल्याच ’स्वयंभू गंधारा’च्या सहवासांतूनच तर मिळत नसाव्यांत ? पण असं म्हणून मी उषाताईंच्या स्वत:च्या थक्क करणार्‍या निर्मितीसर्जनक्षमतेला. इथं उषाताईंच्या आनखी एका कलाकृतीचा उल्लेख जर मी केला नाही तर या लिखाणाला पूर्णत्व येवूचं शकत नाही. हे कुठल्या गीतसमूहाचं...Album..मुखपय्ष्ठ आहे मला स्मरत ना ही पण ते फारसं महत्वाचं नाही.. ऐहिक विश्वाच्या अगदी कडेला जिथं क्षितिजावर आभाळाचं परतत्व सुरू होतंतिथ. एक अगदी छोटी मनुष्य़ाकृती, पाठमोरी आकाशाकडे बघत उभी आहे...ते आकाश आहे कां ? अं हं... कपाळावर अष्टगंधाचा टिळा पूर्णचंद्राच्यारूपानं मिरवत, तो ’कान्हा निळा’ अत्यंत शांत नजरेनं आवाहन करतोय त्या मनुष्याकृतीला...अर्थांत मीरेला ! चित्रांत, अंधारलेल्या पृथ्वीचा काळपट तपकिरी रंग त्यांतून हलकेच उगवणारा गडद निळा आणि वरवर जातांना ’कृष्ण’काळा होत जाणारा अनंत अवकाशाचा रंग.. त्यांतच अत्यंत अल्‌वारपणे अस्फुटश्या प्रकटणार्‍या अर्धोन्मिलित पांपण्या, माया, ममतेनं ओतप्रोत. तसेच अत्यंत रेखीव नांक आणि ओठं. छे: ! हे मी करीत असलेलं वर्णन अत्यंत अपुरं आहे... One must see it to believe and adore and appreciate it !! उषाताईंची अनेक चित्र लोकांना, त्यांच्या चाहत्यांना माहीतच नाहीत. त्यांच्या संगीत कारकीर्दीत ती झाकोळून गेली आहेत. केस मोकळे सोडून बसलेल्याअ दिदींच पेंटिंग्‌, बाळकृष्णाची मूर्ती धरलेले फक्त दोन ( अर्थात मीराबाईचेचं) उंचावलेले हात... बहोत खूब बहोत खूब उषाताई... अशीचं, जागतिक स्तरावर म्हणण्यापेक्षा सर्व मनुष्यमात्रांच्या मनांत, हृदयांत भावनांच्या उचंबळरूपानं संपन्न असूनही, रसिकांना हुरहुर लावणारी स्वरप्रतिभा लेवून सुद्धा, त्याचं मंगेशकरांच्या घरांतला एक कलाकार आपल्या आवीष्कार-तृप्तीचं अवकाश शोधत छायाचित्र काढायच्या छंदाकडे वळला... कोण ? अर्थांत, हे वर्णन कागू पडणार्‍या, एकमेवाद्वितीय..दिदी..’लता’...मंगेशकर. त्यांच्याही या दृश्य माध्यमाच्या प्रेमाबद्दल पुढं कधीतरी... ******

No comments:

Post a Comment