Thursday, July 5, 2012

’धाडसी पण आवश्यक..’

’धाडसी पण आवश्यक..’ हिंदुस्थानावर, पूर्व-पश्चिम अशा दोनीही बाजूंनी कुरापती काढत, कायमचं दुखणं बनण्याचे पाकिस्तानचे मनसुबे, ’भले तरी देवू कांसेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू कांठी ॥’ या संतश्रेष्ठ सुकाराम महारांच्या ओवीप्रमाणे, प्रमाणाबाहेर चालविलेल्या पाकिस्तानच्या माकडचाळ्यांनी त्रस्त होवून तत्कालीन पूर्वपाकिस्तानमधल्या असंतोषाचा अत्यंत चतुरपणे फायदा उठवत, कै. इंदिराजींनी, अक्षरश: उभे चिरले. आंतरराष्टीय स्तरावर खळबळ माजविणारा हा धादसी निर्णय, त्यांच्या इतक्या समर्थपणे कोणी अन्य नेत्याने...पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेलांशिवाय...घेतला असतां कां ? ह्या विषयी शंकाच वाटते. ९/११ ला अमेरिकेवरील दहशतवाद्यांनी केलेक्ल्या हल्ल्यानंतर, आणि त्यानंतर अफगाणिस्थानवर अमेरिकेनं, अतिरेक्यांना त्यांच्या बिळांतून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या तळावर केलेल्या पूर्वादेशित ड्रोन क्षेपणास्त्र हल्यानंतर वैश्विक स्तरावर दहशतवादी आणि अतिरेकी यांची दहशत इतकी वाढली की शांतताप्रिय राष्ट्रांचे अध्यक्ष, पंतप्रधान एकत्रित आणि उघडपणे हे छळसत्र संपविण्यासाठी कटिबद्ध झाले. त्यांतून एखादी महिला राष्ट्रप्रमुख असली तर ती जरा जास्तच आक्रमक असते (कारंण मादीच फक्त आपल्या पिलांच्या संरक्षणाबाबत इतकी कठोर आणि क्रूर होवू शकते) की काय अशी धरणा पक्की करीत, एक जहाल भाषण, एका, सलग दुसर्‍यांदा नवनिर्वाचित राष्ट्रप्रमुखानं केलं. ओह ! क्या बात है ? तिनं हे पुन्हा एकदा सत्यांत उतरवून दाखवलं. ऑस्ट्रेलियानं नाही म्हटलय. दुसर्‍यांदा..हे तिनं खरं करून दाखवलय ! स्वतंच्या कठोर वागणुकीच्या पवित्र्यांतून ती कदापीही मागं हटणार नाहीये ! आणि स्वदेशवासियांच्या ह्क्काबद्दलच्या तिच्या जागरूकतेला दाद द्यायलाच हवी आपण सर्वांनी ! एखादी स्वच्छ, थंडगार वार्‍याची, वेलींवरच्या ताज्या फुलांचा सुगंध लेवून आलेली मंद झुळूक अंगावर सुखद शहारा आणत आणि मनाला आश्वासक सहारा देत प्रसन्न करीत अलवारपणे कळत नकळत, आसमंत व्यापावी तस कांहीसा निर्णय ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री महोदयांनी घेतलाय ! विश्वांतल्या यच्चयावत राष्ट्रांना सध्या अशा पुढार्‍यांची नेत्यांची गरज आहे. ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री ज्यूलिया गि्लार्ड्‌. मुस्लिम शरियतप्रमाणे जगू-वागूपाहाणार्‍या नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यांत आलं आहे. कारण कुठल्याही धर्माच्या मूलतत्ववाद्यांच्या अतिरेकी, दहशतवादी कारवाया आणि लाड या पुढं ऑस्ट्रेलिया खपवून घेणार नाही कांहीश्या संतापानंच ज्यूलिया जी, मुस्लिमांवर कडा्डून गरजल्या, ’इथल्या स्थानिक ऑस्ट्रेलियन जनतेच्या ऐवजी: इथं नव्यानं स्थाईक होवू पाहाणार्‍यांनी इथल्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक वातावरणाशी जुळवून घेतलं पाहिजे. हे पटत असेल तर गुण्यागोविंदानं राहा नाहीतर चालते व्हा, मुकाट्यानं.. कारण मला कुणा एका व्यक्तीच्या किंवा समूहाच्या सामाजिक, सांस्कृतिक धार्मिक भावना दुखावल्यातर जांत नाहीत ना ? वगैरे बाबींची काळजी करायचा खरंच कंटाळा आला आहे. बालीमधे दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हत्याकांडानंतर, देशांत राष्ट्रीय भावनेची जणू कांही ’त्सुनामी’ आली आहे.. ,आणि सगळे देशवासीय त्यानं भारावले आणि वेड्यासारखं वागायला लागलेत आहेत. स्वातंत्र्यप्रापतीसाठी, झगडतांना इथल्या स्थानिक अबालवृद्ध युवक-युवतींनी जवळपास दोन शतक पिळवणूक, अत्याचार, दंडेली, स्वातंत्र्यसैनिकांवरचे न्यायासनासमोर उभे राहिलेले खटले आदि संकटांशी सामना करीत पारतंत्र्याच्या बेड्या तोडत महामुश्किलीन मुक्ती मिळवली आहे आणि सांस्कृतिक जडण घडण जपली आहे. आमचा सर्व बोली-लेखी व्यवहार इंग्रजींत चालतो. स्पॅनिश्‌, लेबेनीज्‌, अरेबिक, चायनीज्‌, जपानी, रशियन्‌, किंवा इतर कोणत्याही भाषेंत नाही. बहुतेक ऑस्ट्रेलियन नागरिक देवाच्या अस्तित्वाला मानतांत. ही कांही ख्रिश्चन धर्माची, किंवा राजकीय अथवा परंपरावादी ध्येयांनी प्रेरित चलवळ नाही तर हे एक सत्य आहे. कारण धर्मानं ख्रिश्चनं असणार्य़ा अबालवृद्धांनी उभारलेली आणि ख्रिश्चन धर्माच्या तत्वाधारित अशी ही भूमी, हे राष्ट्र आहे, आणि हे संदर्भाधीन कागदपत्रांमध्ये अधोरेखित केलेलं आहे. आणि अर्थातच माझ्या या राष्ट्रातल्या प्रत्येक शैक्षणिक संस्थांच्या दर्शनी भागांवर त्याबाबतचा मजकूर असण हे अगदी स्वाभाविक आहे. कारण ’देव’ हा आमच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ’देवा’च्या अस्तित्वावरच्या श्रद्धेबद्दल तुमच्या मनांत आकस असेल तर तुम्ही, ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त या विश्वांतला इतर कुठलाही भाग तुमच्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी निवडू शकता. तुमच्या श्र्द्धा, श्र्द्धास्थानं, धर्मगुरूंबद्दल आमचा काखहीही आक्षेप नाही. तसाच तो तुम्हाला आमच्या श्रद्धांबद्दल नसावा आणि आमच्याबरोबर तुम्ही गुण्यागोविंदानं, शांततापूर्वक आपलं आयुष्य इथं व्यतीत करावं ही माफक अपेक्षा आहे. ही आमची भूमी, आमचं राष्ट्रं आणि आमची जीवनशैली आहे, आणि आम्ही या सगळ्याचा पुरेपूर उपभोग धेण्याच्या सर्व वाटा तुम्हाला खुल्या करून देवू. पण तुम्ही जर तक्रार, कुरबूर, नापसंती, असंतोष या पोटी धुमसणार्‍या क्रोधाच्या भरांत, आमचा राष्ट्रध्वज, आम्ही राष्ट्राच्या नावांन घेतलेली आण आणि आमच्या ख्रिश्चन श्रद्धा, श्रद्धेय यांचा अधिक्षेप करण्याचा यत्किंचितही प्रयत्न केलांत, तर तुम्हाला ऑस्ट्रेलियन पद्धतीच्या स्वातंत्र्याचा आहेर मिळेल...हा देश सोडून जाण्याचं स्वातंत्र्य !! तुम्ही जर इथं सुखी नसाल तर कृपया चालते व्हा. कारण आम्ही तुम्हाला इथं येण्याचं आमंत्रण कधीच दिल नव्हत. तुम्ही तुमच्यास्वत:च्या सुखाच्या शोधांत इथं येण्याचं निश्चित करून आला आहांत हे कायम ध्यानांत ठेवा, तेंव्हा जे राष्ट्र तुम्ही पूर्ण विचारांती निवडलय त्याचा स्वीकार करा. धन्यवाद ! ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्र्यांच्या या भाषणांतला सूर जरी कांही विशिष्ट दहशतवादी संघटनांविरोधांत असला तरी पिळवणूक आणि पारतंत्र्यातून सुटका करून घेण्यासाठीचा लढा, त्या भावनॆंतून जन्मलेली अतिरेकी प्रवृत्ती आणि सत्तालोलूपता आणि जगावर राज्य करण्याच्या अहंकारी महत्वाकांक्षेपोटी अतिरेकी अत्याचार या मधे फरक करायलाच हवा. आणि हकनाक दहशत माजविणे ही विशेषत: मानव ’जमाती’ची... मग ती कुठल्याही देश-प्रांत-जात-पंथ-धर्माची असो... प्रवृत्ती आहे. महान तत्ववेत्ते, सर बर्ट्रांड्‌ रसेल यांनी बघितलेलं वैश्विक प्रजासत्ताकाचं स्वप्न हे स्वप्नच जोपर्यंत राहील तो पर्यंत असे क्रोधोद्गारांचे उद्रेक होतच राहाणार... ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar

No comments:

Post a Comment