Sunday, July 29, 2012
ए मित्रा !
ए मित्रा
तू कांही लोकांसाठी किती, अनमोल, ’खास व्यक्ती आहेस, माहीत
आहे तुला ? तुझा नुसता आवाज त्यांच्या आयुष्य़ांतले कांही क्षण आनंदाने
उजळून टाकतो..आणि मग तुझं दर्शन..किंवा सहवास जर मिळाला त्यांना तर काय
होईल त्यांचं ? जरा विचार कर !
तू नेहमीच तुझ्या सहकार्यांना, सहाध्यायांना, सहप्रवाशांना खूपच उत्थापन देवून त्यांच तुझ्या जगण्यांतलं स्थानं किती महत्वाचं आहे हे जाणवून देतोस.
त्या पैकी प्रत्येकजण तुझ्या या वागण्यामुळं मनोमन सुखावलेला असतो
...आणि ते सुखावण त्यांच्या चेहेर्यावर नेहमीच मंद स्मिताच्या रूपानं दिसतं.
अनेकवेळा ते कांही कारणांनं व्यथित असतांना, तुझा साधा, ’कस काय पावनं, बरं हाय ना ?’ असा सर्वसामान्य चौकशी करणारा निरोप जरी त्यांना मिळाला तरी ते पतर उत्साहित होतांत आणि कांहींच्या चेहेर्यावर चक्का हसू दृग्गोचर होतं.. मित्रा ! ठावूक आहे..
तुझ्याजवळच्याअ सगळ्याचा त्यांच्याबरोबर उपभोग घेतांना तुझे आभार वगैरे मानण्याचा प्रपंच उगाच ते करीत नाहीत..कारण त्यांना माहीत आहे की तुझं-त्यांचं नातं हे कधीच औपचारिक नव्हत, नाही आणि नसणार आहे
तू त्यांना किती आवडतोस हे कधी तुला त्यांनी तोंड उघडून शबदांकित केलय ? नाही ना ? तेच कारण आहे...
आणि तेच मी तुला सांगतोय या क्षणी ..
स्नेहा शिवाय आणि स्नेह्याशिवाय जगणं शय्क्य आहेकां ? सांग बरं तूच..
म्हणून...आपलीमैती आहे..आपण दोस्त आहोंत एकमेकांचे यापरतं सुख-आनंद-समाधानदायी काय असूं शकत.. सांग मित्रा ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment