Wednesday, December 19, 2012

’मोकळा’ श्वास, त्या साठी युक्ती खास..

सदर छायाचित्रांत एका ’मोटर्‌-बाइक्‌’ला, मागील बाजूस, खास, बहुसासनी व्यवस्था केलेली दिसतेय्‌... ’मोकळा’ श्वास, त्या साठी युक्ती खास.. साथी हाथ बढाना, एक अकेला थक जाता है मिलकर बोझ उठाना । आणि हे ’ओझ’, बोझ’, शब्दार्थानं, शब्दश: वजन गृहित धरू नका हं !. हे ’ओझ’ आहे जबाबदारीचं.. आपल्या सगळ्यांच्याच..आपल्या सगळ्यांनाच ’मोकळा’ श्वास घ्यायला मिळावा म्हणून... हवेच्या शुद्धतेचं भान राखायच्या जबाबदारीचं... ’बोझ’ न समझना ! ऐसा है, ना ’धुऑं’ हवा मे भरना कुठल्या राज्यांतल कुठला रस्ता आहे कुणास ठाऊक ? पण इतका सुरम्य, प्रदूषण विरहित, स्वच्छ परिसर, रस्ता, गुळगुळित अगदी ’गालिचा अंथरावा तसा, चक्क खड्डे नसलेला, शहरांतल्या बजबजपुरींत राहाणार्‍यांना अगदी हेवा वाटावा असा.. कारण ? चित्रांत स्पष्ट आहे.. वेगळ सांगायलाच नको, पार्श्वभागी जलाशय किंवा जलधी.. म्हणजे तलाव किंवा समुद्र सागराची पुळणी दिसते आहे. म्हणजे हे वाहन, अर्थातच डिझेल, इंधन म्हणून वापरणार ? अं हं ! ’मोटर-बाइक’लाच मागे ’बहु-आसनी’ व्यवस्था केलेली दिसतेय्‌ !.. बराच चढ चढून येतय्‌.. पण, मागे ’धुराच्या रेषा हवेंत सोडी’ त नाहिये ! आठ-नऊ माणसांना वाहण्यासाठी चार दुचाकी किंवा दोन चारचाकी... म्हणजे चित्रांत दिसणार्‍या एका स्वयंचलित वाहनाच्या ठिकाणी, चौपट किंवा किमान दुप्पट संख्या आणि पर्यायानं त्याच पटींत इंधन जाळून होणारा धूर.. आणि परिणाम ?.. आठजण आपाआपल्या इच्छित स्थळी आपलं ’इप्सित’ सिद्ध्यार्थ पोहोचणार. कविश्रेष्ठ गजानन, दिगंबर तथा अण्णा माद्डगुळकरांच्या, विश्वकीर्त ’गीतरामायण’ या महाकाव्यातलं ते गीत आठवतय ? ’सियावर रामचंद्र की जय.. !’ म्हणत, एकेक महाकाय प्रस्तर फोडून त्याचे झालेले छोटेछोटे शीलाखंड वाहून नेणार्‍या वानरसेनेला प्रोत्साहित करणारं, जणू कांही समर गीतच.. ’सेतू बांधारे सागरी.. सेतू बांधारे सागरी’ सहकाराने रावण मर्दुन, मोद भरू अंबरी किंवा गदिमांनीच, ’उमज पडेल तर’ या चित्रपटासाठी केलेली गीतरचना, सहकाराचा मूलमंत्र देणारी, किंवा ’वयं पंचाधिकम्‌ शतम्‌’ हे महाभारतांतलं, एकजुटीची महती विदित करणारं प्रसिद्ध वचन आग्रहानं मांडणारी शब्द रचना. नसे राउळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी.. शब्द तेच पण संदर्भ वेगवेगळे. तिथं रावणवध हा हेतु होता, किंवा दुसर्‍या गीतांत ’हरी’ म्हणजे सत्य-शिव-सुंदराचं प्रतीकरूप... लौकिकार्थानं देव वगैरे... दर्शनासाठी, तर इथं चित्रसंदर्भानुसार, मंडळी प्रदूषणरूपी ’रावणा’चा अगदी त्यांच्याही नकळत संहार करतायत्‌ ! संहार नाही तरी त्या ’राक्षसा’ची नख तोडायला आणि दात पाडायला काय हरकत आहे, एकमेकांच्या साथीनं ? माझ्या शेजारी एक छोटा मुलगा राहातो. तो रोज सकाळी, त्यान आदल्या दिवशी केलेला कचरा , कागदाचे कपटे, पेन्सिलीला टोक करतांना पडलेलं ’पील्‌’, खाल्लेल्या फळांची सालं, आपल्या अंगणातल्या एका खड्ड्यांत फेकतो आणि वरती थोडी माती नी पाणी टाकतो. कांही दिवसांनी तो त्यांत गांडुळं सोडणाराय्‌ म्हणे.. कुठून आली ही जागरूकता, जाणीव, पर्यावरण रक्षणाची ? आजकाल शाळेंत सग्गळ शिकवतांत.. पण.. झोपलेल्याला जागं करतां येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही हो !! या चित्राचा आणखी एक आयाम शोधायचाच म्हटला तर, ही ’मंडळी’ तेवढाच इंधनखर्च चक्क एक अष्टमांश असा वाटून घेणाराय्‌त ! एक की जगह आठ हो, तो कमही होगा खर्चा अलग अलग ना लेना होगा अब हर एक को पर्चा चलो... ले लेते है एक दूजे का साथ, हवा मे धुआ कम और सेहतकी बढेगी बात. सेहतकी बढेगी बात.

No comments:

Post a Comment