Wednesday, January 7, 2015

।।भासबोध।। २२२ ते २३३

निसर्गें सृजनाचा वर । मगजग्रंथींत रुजविला पुरेपूर । अखंड अभिषेक कलेवर । करण्या दिला मनुष्यां ।। २२२ अलंकाराचा करण्या वापर । सुकृतार्थ विचार सारासार । करावा ! अन्यथा 'कलेवर' । होइल त्याचे निश्चित ।। २२३ ।। दास-वाणी ।। मीपणे प्रपंच न घडे । मीपणे परमार्थ बुडे । मीपणे सकळहि उडे । येशकीर्तिप्रताप ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०७/०७/४७ ' मी ' पणाची सतत असलेली जाणीव म्हणजे अहंकार. प्रपंचामधे तर तो त्रास देतोच कारण मोठेपणाची कर्तृत्वाची जाणीव इतरांचा अधिकार मन मान्य करत नाही. परमार्थातही मी साधना करतो हा अहंकार परमेश्वरापर्यंत पोचू देत नाही. संपूर्ण शरणागतीशिवाय तो भेटत नाही. याच अहंकारापोटी भौतिक जगतातील यश, कीर्ती, प्रताप, मानमरातब यांनाही किंमत उरत नाही. विनम्रपण स्वीकारले तरच समाजमान्यता मिळते. 'मी' च नाही तर भवताल । काष्ठ-पाषाण-तेज-सलील । जैसी कवडश्याची 'सल' । नेत्रहीनासि ।। २२४ 'मी' च नाही तर भवताल । काष्ठ-पाषाण-तेज-सलील । जैसी कवडश्याची 'सल' । नेत्रहीनासि ।। २२४ 'अस्तित्व'चि जाणिते पंचतत्वे । ना जडती कसलीच ममत्वे । विचार, कल्पना, यश, कर्तृत्वे । नसलेपणासि फोल सर्वथा ।। २२५ 'मा'पण ज्याचे सरले । जगणे कशास मग उरले । मरण सुध्दा परवडले । तुलनेंत ।। २२६ संत ना मी, ना तत्ववेत्त । माझी तर शुध्द अनुभव-कथा । सुख-दु:ख, वेदना, कष्टांची गाथा । लिहिलेली स्वेदबिंदूंनी ।। २२७ ।। दास-वाणी ।। बहुतां जन्मांचे अंतीं । होये नरदेहाची प्राप्ती । येथें न होता ज्ञानें सद् गती । गर्भवास चुकेना ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : ०८/०७/१८ अनेक प्रकारचे जन्म घेतल्यावर क्वचित माणसाचा जन्म मिळतो. मानवी देहातच साधना करणे आणि ब्रह्मज्ञान प्राप्त करून उत्तम गती लाभणे शक्य आहे. अन्यथा शिल्लक राहिलेल्या वासनांच्या पूर्तीसाठी जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून पडावे लागते. मोक्षलक्षण समासात मनुष्यजन्मातील कर्तव्याची जाणीव समर्थ आपल्याला करून देतात. कोण जाणे, कैसा पुनर्जन्म । हा तर केवळ अंधश्रध्द भ्रम । निसर्गे नेमुनि दिलेले विहित कर्म । करावे जोवरि हृदय सजग ।। २२८ जन्मला तो नाशवंत । मरणातुनी न होय उत्क्रांत । हे तर परंपरासिध्द निश्चित। विज्ञानसत्य जगन्मान्य ।।२२९ 'हे तर थोतांड !' म्हणे चार्वाक । एकदाच प्राक्तनी इहलोक । अभ्यासुनि उक्ती विस्मरती विवेक । पुनःपुन्हा 'संत' बरळती ।। २३० जे 'गेले'ते परतुनी आले ?। बाष्फ घनरूपे अवतरले ?। 'रक्षेंतुन' मूळरूपी प्रकटले ?। दावा ना मज कोणी ।। २३१ वास्तव कालातीत भीषण । आदर्शवादाची त्याला वेसण । युगानुयुगे, साधक, संत सज्जन । पाहती घालू ।। २३२ परि बदलेल सद्यावस्था ? । शर्यत लुटण्या सत्ता, संपदा । राजकारणे बरबटल्या कथा । ऐकता मन विषण्ण ।। २३३

No comments:

Post a Comment