Tuesday, December 2, 2014
।।भासबोध।। नवा अध्याय ८६ ते १०६
।। दास-वाणी ।।
ज्येष्ठ बंधू बाप माये ।
त्यांची वचने न साहे ।
सीघ्रकोपी निघोन जाये ।
तो तमोगुण ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०२/०६/२६
ज्यांच्या छत्राखाली आपण वाढलो, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण फुललो, किंबहुना आपले अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे अशा वडिलबंधू, आई बाप यांच्याशी सुसंवाद तर दूरच साधे धड बोलणे सुद्धा आवडत नाही.
ते बोलायला लागताच त्यांचा मान न ठेवता रागारागाने निघून जातो तो तमोगुणी मनुष्य.
माय, तांत, बंधू, सखा ।
जाणा जीवाच्या तुकड्या सारखा ।
त्यांना जो होईल पारखा ।
गर्दींत सुध्दा एकाकी ।। ८६
विस्मरण, कृतघ्नपणाची नांदी ।
पांठ फिरवणे, लक्षण घरभेदी ।
निंदनीय वर्तन तयांप्रती ।
अक्षम्यचि होय ।। ८७
डोईवरी आभाळमाया ।
काळी आई, मखमल पाया ।
तैसेचि वागवावे आप्तस्वकीया ।
तेचि होय 'माणूस'पण ।। ८८
छकुल्यास ठेवोनि अर्धपोटी ।
कष्टकरी कवळ धारितों ओष्ठी ।
हा अविचार ? नाही ! जगराहाटी ।
कर्मासाठी शक्ती न मिळे अन्यथा ?।। ८९
म्हणोनि राखणे भाकरतुकडा ।
भोजनोत्तरी दिवसाअखेरी, पायंडा ।
सुसंस्कृत गृहिणी देती धडा ।
परंपरा 'अतिथी' साठी ।। ९०
सातजणांत एक तीळ ।
वाटता, मिळे सुख सकळ ।
कोणताही कठिण काळ ।
सहज होई सुकर ।। ९१
मारितो कां भूल थापा ?
अतिशहाणा हा कोणं बाप्पा ?
आवरा, अटकाव करा या पापा ?
आरडती आढ्य, संभावितं ।। ९२
'धर्मास लावितो चूड ।
उतरवा याचे वेड ।
करण्यास परतफेड ।
हाणा, चोपा !' गोंगाटं !।। ९३
अध्यात्म मोक्ष, गती ।
हा स्वयंसिध्द मंदमती ।
कैसा जाणेल ? उपरती।
यांस होईल ?।। ९४
गरम, नरम, विविध पराठे ।
थंडीमधे खावे, वाटे ।
'नाम' 'देव' सगळे खोटे ।
घुमान घुमण्या लेखकूंना ।। ९५
उभे आयुष्य म्हणे संशोधनी ।
अध्यासनाधिष्ठित साहित्यिकांनी ।
परंतू सहिष्णुता आचरणी ।
बाणविण्यांत अपयशी ।। ९६
बालयोगी ज्ञानदेव ।
सांसारिक तुकोब्बा, नामदेव ।
न मिरविता संतभाव ।
झालेचि ना जनमान्य ?।। ९७
मग कां बरे सायास ।
मिरविण्या वृथा आभास ।
भाटांना ठेउन आसपास ।
'उमेद' 'वार' करिति ढोंगी ।। ९८
धरा धरा काकतकर ।
मोजुनी मारा पैजार ।
शमविण्या सूडाची धार ।
वार करा नेमके ।। ९९
गति, मोक्षावरती करीत बसला वार । लागेल ऊर्ध्व, मग येइल भानावर ?।
तेंव्हा तरि यांवे उचलायाला चार ? ।
सुखरूप दावण्या 'माहेरा'चे द्वार ।। १००
।। दास-वाणी ।।
लोकी भले म्हणायाकारणे ।
भल्यास लागते सोसणें ।
न सोसता भंडवाणे ।
सहजचि होये ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १२/०२/१३
लोकांनी जर आपल्याविषयी चांगले बोलावे असे वाटत असेल तर कार्यकर्त्याला समाजाचे भले बुरे बोल सोसावेच लागतात. तरच कार्य पुढे जाते. आपण प्रत्युत्तरे, वादविवाद करत बसलो तर
'काय भांडकुदळ आहे हा माणूस'
अस सहज ऐकून घ्यावे लागते.
काळोख असतो ठाय ।
प्रकाश पावतो विलय ।
तेज शोधीत जाय ।
क्षितिजी भेटतो अंधार ।। १०१
मुकाट न राहता बोलावे ।
शब्दचि पाहिजे ऐसे नव्हे ।
कोठल्याहि ज्ञांनेंद्रियाद्वारे व्हावे ।
संभाषण ।। १०२
बरे, वाईट पाहावे तैसे ।
व्यक्तिसापेक्षच सहसा असे ।
भावांचे आयाम विविधसे ।
असावे संग्रही ।। १०३
अंधारच असतो सत्य नि स्थाई ।
प्रकाशा मावळतीची घाई ।
जन्म सांगाती घेउन येई ।
मृत्यू ! विश्वहि जाणा तैसेची ।। १०४
कोण जाणे. अंधाराचा ध्यास ।
कां न बरवा वाटें प्रकाश ?।
हीच बहुधा ओलांडण्या वेस ।
घालमेल जीवाची ?।। १०५
पुत्र कमावितो पुण्याई ।
आज मजला कामा येई ।
व्यक्तण्यास साहाय्यभूत होई ।
नकळत पण निश्चित ।। १०६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment