Friday, December 26, 2014

।।भासबोध।। १९३ ते २००

मेंदू बुध्दीचा जन्मदाता । बुध्दि देते तर्कशुध्दता । हृदयिच्या भावाचा संगम होता । शब्द, भाषा समृध्द ।। १९३ जैसी असेल कर्मरीती । तैसीच येते प्रचिती । अध्यात्म, भक्ती, मोक्ष, गती । केवळ कल्पनाविश्व ।। १९४ कांहीच न देतो हरी । बैसल्या जीवा खाटल्यावरी । अर्जुनासहि तो वदे 'कर्म करी' । तेंव्हाचि कथा सुफल ।। १९५ पाहुनी अभेद्य श्रध्दा । पांपणींत ओथंबल्या जलदा । आतुर निवारण्या आपदा । भाबड्या भक्तांच्या ।। १९६ कोणी जोडिती हस्तक । कोणी घासतो चरणी मस्तक । 'त्याचे' आडते, मध्यस्थ, हस्तक । सावज घेरण्या टपलेले ।। १९७ ।। दास-वाणी ।। गरळ आणि अमृत जाले । परी आपपण नाही गेलें । साक्षत्वे आत्म्यास पाहिलें । पाहिजे तैसें ।। ।। जय जय रघुवीर समर्थ ।। दासबोध : १४/०८/१९ साप किंवा नागाचे जहाल विष म्हणजे गरळ. कोणत्याही आजारातून निश्चित बाहेर काढणारे संजीवन द्रव्य अमृत. दोन्हींमधे जलतत्व आहे ते एकच आहे. त्याच प्रमाणे दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्तीच्या माणसांमधे सुद्धा आत्मतत्व एकच असते. हे समजले की आपली वर्तणुक सर्वांशीच चांगली आपुलकीची राहते. पैठणाधीश 'धर्मकर्मठांची । गरळफेक पचवुनी चूळ अमृताची । गीता उकलत, ओवी ज्ञानोब्बांची । सालंकृत झाली ।। १९८ हलाहलाच्या हालाग्नींत । जनसामान्य होते पोळत । भावार्थदीपे त्यांना शमवित । कर्मधर्म सांगे ज्ञाना ।। १९९ ऐसा कोणी अवतरेल ?। तमारि दीपस्तंभ होईल ?। लांडग्यांना सहजी वारील ?। शंका सद्यकाली ।। २००

No comments:

Post a Comment