Wednesday, May 9, 2012

’लळा, जिव्हाळा शब्द ? अगदी खरे..खरे..’

’लळा, जिव्हाळा शब्द ? अगदी खरे..खरे..’ तुम्ही ओळखता या छायाचित्रांतल्या महिलेला ? अवघड आहे. कारण तशी फारशी प्रसिद्ध नसलेली ही व्यक्ती आहे. इरिना शे‍न्ड्‌लर्‌. दिनांक १२ मे २००८ रोजी, वॉरशॉ, पोलंड इथं ती निवर्तली... दुसर्‍या महायुद्धाच्या ऐन धुमश्चक्रींत, इरिनाला, वॉर्‌शॉमधल्या घेट्टोमधे पाणीपुरवठाविभाग आणि मलनि:सारन विभाग यामधे काम करण्याची परवानगी मिळाली इरिनानं तिथल्या ज्यू नवजात तान्ह्यांना, स्वत:च्या कामासाठी लगणार्‍या छोट्या हत्यारांच्या पेटींत लपवून, छळछावणीच्या नरकांतून ’बाहेर काढण्याचं पुण्यकृत्य सुरू केलं. थोड्या जास्त वयाच्या बालकांना एका मोठ्या तादपत्रीच्या किंवा दांबरी कापदाच्या पिशवीची योजना करून, ती पिशवी, ती मालवाहू वाहनाच्या मागील भागांत ठेवून बाहेर काढू लागली. ज्यांना जर्मन फौजांच्या अत्याचारांची कल्पना वाचनांतून किंवा चित्रपटांतून समजली असेल त्यांना पटेल की हे किती जिकिरीचं, जोखमीचं आणि ’जीवघेण’ काम होतं. एखाद काम करायचं मनवर घेतलं की माणसाला, त्यांत येणार्‍या विघ्नांवर मात करायचे उपाय आपोआप सुचूं लागतांत. म्हणतांत ना, गरज ही शोधाची जननी आहे’..तसंच कांहीसं ह्या लहान तान्ह्यांच्या आणि बालकांच्या र्डण्या-ओरडण्याचे आवाज, नाझी सैनिकांच्या कानावर प्डू नयेतं यासाठी इरिनानं एक शक्कल लढविली. तिची कॢप्ती अशी होती: तिनं चक्क एक भला मोठा कुत्रा पाळला आणि त्याला नाझी सैनिकांवर जोरजोरांत भुंकण्याचं प्रशिक्षण दिलं. घेट्टोच्या फाटकांतून ये-जा करतांना या भु:भु:च्या ठणाणा गर्जनेमध्ये मुलांचे आवाज लोप पावू लागले आणि ’तस्करी’ सुलभ व्हायला लागली. या, अद्वितीय, माया, ममता, वात्सल्य, माणुसकीचं प्रेम या सर्व भावनांची अतुलनीय परिसीमा गाठंत या जगन्माउलीनं, तब्बल २५०० ’अंकुरां’ना, ’जगण्याच्या’ मुक्त आकाशांत झेप घेण्यासाठी अलगद सोडून दिलं. पण...अखेरीस एक दिवर ती, त्या क्रूर, नराधम नाझी सैनिकांच्या कराल दाढांत गवसली हे ’पुण्कृत्य’ करतांना ! त्या यमदूतांनी तिचे दोनीही हात, पाय मोडून, जायबंदी करून तिला यथेच्छ मारहाण केली. मात्र, इरिनानं अत्यंत दूरदृष्टीनं आणि हुशारीनं एक महत्वाचं काम केल होतं. तिनं, छळछावणीबाहेर काढलेल्या सर्व लहानग्यांच्या माहितीची सूची एका कांचेच्या बाटलींत घालून, ती बाटली, तिच्या घराच्या परसांतल्या एका झाडाखाली पुरून ठेवली होती. युद्ध संपल्यावर, तिनं या, निराधार (?) मुलांच्या बचावलेल्या आई-वडिलांचा शोध धेवून, त्यांचं त्यांच्या चिमुकल्यांशी ’हृदयंगम’ मिलाप सुद्धा धडवून आणला..बरेचसे पालक, छळछावण्यांमधल्या ’गॅस्‌चेंबर्‌’चे बळी झाले होते. त्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी कांही ’दयाबुद्धी’ कुटुंबांनी स्वीकारली, किंवा दत्तक घेतली गेली. इथं ही साठा उत्तराची कहाणी संपते... आणि मग सुरू होते, राजकारण्याची गुलाम झालेल्या प्रवृत्तींच्या, संस्थांच्या, ’कीव’ यावी अशा मानसिकतेची ’निर्लज्ज’ कहाणी... २००७म्धे इरिनाला ’नोबेल्‌ शांतता पुरस्कारासाठी नामांकित केलं गेलं. पण त्या वर्षी, अल्‌ गिर्‌ना, एका Global Warming वर आधारित ’स्थिरचित्र प्रदर्शना’साठी तो पुरस्कार मिळाला. नंतर, कांही वर्षांनी, बराक्‌ हुसैन ओबामा नावाच्या एका राजजकारणी धुरंधर गृहस्थांना, हा पुरस्कार, सामाजिक समन्वयाच्या कार्यासाठी मिळाला. ’अरे मानसा मानसा.. कधी व्हशीलं मानूस ? ’ह्या एका छोट्याशा संदेशांत सामावलय माझा खारीचा वाटा. तुम्हीसुद्धा असंच कांही कार्य कराल अशी आशा करते.’ युरोपांतलं दुसरं महायुद्ध सरून आतां जवळपास ६५ वर्ष होत आली. जुलमी नाझी राजवटीच्या, छळवाद, रक्तपात, बलात्कार, अत्याचार, निर्घृण हत्या यांना बळी पडलेल्या सहा लाख ज्यू, दोन लाख रशियन आणि दहा लाख ख्रिश्चनधर्मियांच्या वतीनं, त्यांच्या स्मरणार्थ हा मजकूर उधृत करीत आहे. कां ? तर भविष्यांत असले ’आगडोंब’ उसळले तरी कुठेतरी’ कुणीतरी, ’दयार्णवा’च्या रूपांतली ’इरिना’ उभी आहे याची खात्री बाळगा.’ ****** अरुण काकतकर

No comments:

Post a Comment