Monday, May 28, 2012

’अरे संसार संसार, वरं ’भामे’ची पांखरं (?)

’अरे संसार संसार, वरं ’भामे’ची पांखरं (?)’ अखिल जगतांतल्या तमाम महिलावर्गाची, विशेषत: विवाहित ’भामिनीं’ची (कविवर्य बोरकरांनी, पत्नीसाठी वापरलेलं संबोधन, ’कशि तुज समजाउ सांग ? कां भमिनि धरिशी राग’ या ’क्रोध-शामक’ भावगीतांत ! जे पंडित जितेंन्द्र अभिषेकींनी स्वरबद्ध करून स्वत: गायलंसुद्धा आहे.) सुरुवातीलाच सपशेल क्षमामागून, पुढील विषयाला हात घालतोय. धोका आहे...पण अखिल जगतांतील, विविध प्रदेशांतील पुरुषवर्गाची धारणा, भावना, संवेदना, एकुणांतच ’लग्न’, ’विवाह’बंधन’, ’सहजीवन’ या संस्कार, उपचारां(?)बद्दल आणि, पत्नी’, ’बायको’ या पुरुषवर्गाच्या व्यक्तिमत्वाला अस्तित्वाला, आत्माभिमानाला, अक्षरश: ’झाकोळून’ टाकणार्‍या नात्यांबद्दल काय आहे हे या, उंबरठ्यावरचं माप, लक्ष्मीच्या पावलांनी ’वलांडून, सासरच्या भिंतींवर, आळता लावलेल्या तळव्याचे ठसे उमटवत पत्निपदपावलेल्या भोळ्याभाबड्या (?) अबलांच्या कानावर घालून, मनावर ठसवीत, त्यांचा भ्रमनिरास करणं हे मी माझं कर्तव्य समजतो, आणि ’मी ते करणारच’ अशी राणा भीमदेवी थाटांतली प्रतिज्ञा मी केली आहे... या मतांत कांही विधानं, जागतिक स्तरावर गाजलेल्या कांही विख्यांत लेखकांची तर आहेतच तर कांही भारतांत आणि परदेशांत प्रचलित असलेल्या वाक्प्रचारांच्या रूपांत परंपरेन ’घरंगळत’ आलेली आहेत. आतां कांही खोडसाळ मंडळी,’ अग अग म्हशी, मला कुठं नेशी’ हा वाक्प्रचारसुद्धा या सूचींत समाविष्ट करू पाहात होते पण मीच त्यांना ’मज्जाव’ केला (बरं कां भगिनींनो, कारण लेख पूर्ण वाचून झाल्यावर माझ हेच कृत्य माझ्या संरक्षणाची ’ढाल’ ठरणार आहे...कदाचित !) कविवर्य सुधीर मोघ्यांनासुद्धा अशीच ’अतिरतीनंतर उपरती’ झाली असावी. कारण त्यांच्या सरखा ’निरंकुश’ (त्यांचं ’निरंकुशाची डायरी’ नावांच पुस्तक खूप छान आहे. अगदी शोधून, मिळवून वाचावं असं !) सुद्धा स्वतं:भोवती, रेशमाच्या किड्यानं विणावा तसा, हौसेनं विणून घेतलेला, वेढून घेतलेला ’पाश’ (’पाश’वी ह्या शब्दाची व्युत्पत्ती आत्तां कुठ मला उलगडल्यांचा दृष्टांत’ मला अचानक झाला पाहा) आणि त्यांत ’चक्रव्य़ूहां’त अडकलेल्या अभिमन्यूसारखी अवस्था झाल्यानंतर ही लौकिकार्थानं ’दुराग्रही, क्रूर, अन्यायकारी’ शब्दांनी ओतप्रोत ’बरबट’लेली’ कविता लिहितो... ’खर म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो पण एका दुर्लभ क्षणी एक चेहेरा आपल्याला भेटतो अक्कल गहाण पडते, भेजा कामामधून जातो टक्क उघड्या डोळ्यांनी आपण चक्क लग्न करतो त्या चेहेर्‍याच असली रुप मग आपल्याला कळतं बायको नावाचं वेगळच प्रकरण आपल्यापुढे येतं हा दारूण मनोभंग अगदी झालाच पाहिजे कां ? सगळ्या मुलींच लग्नानंतर असंच होतं का ? आपण कविता म्हणू लागलो की, हिला फोडणी सुचते शुभ्र टिपुर चांदण्यांत ती चक्क जांभई देते मैत्रीणी भेटल्या की बाजारात तासन्‌तास तिष्ठत ठेवते मित्रांच्या घोळक्यांतून मात्र ओढून आंघोळीला काढते काळीज नावाचा जिन्नसच तिचा ‍अ‍ॅबसेन्ट्‌ असतो कां ? सगळ्या मुलींच लग्नानंतर असंच होतं का ? पण बायको फार चांगली जेव्हा ती मैत्रीण असते आणि मैत्रीण तर फारच चागली, कारण ती बायको नसते पत्येक पुरुशाला या सत्याचा साक्षात्कार होतो फक्त हा बोध त्याला फार उशिरा होतो अपवाद म्हणुन सुद्धा याला अपवाद नसतो कां ? सगळ्या मुलींच लग्नानंतर असंच होतं का ? काय हे कविवर्य ? कुठे फेडाल हे पाप ? असाच एक, लग्न ’करून ’बसलेला’ (फसलेला ?) एक अनामिक, घाबर्‍याघुबर्‍या म्हणतो, ’प्रत्येक पुरुषानं लग्न हे करायलाच पाहिजे...कारण फक्त ’आनंद’ हे कांही जगण्याचं एकमेव प्रयोजन नाही.’ हे गृहस्थ ’अनामिक कां ? तर बायकोला जर हे विधान त्यांच्या तोंडून ’बरळलेल’ आढळंलं तर काय गत होईल याची त्यांना कल्पना असावी !! ’ब्रह्मचारी..अविवाहितांकडून भरपूर करवसुली केली पाहिजे..कारण ’आनंद-प्राप्ती’ ही काहींचीच फक्त मक्तेदारी नसावी.. नाही कां ” -ऑस्कर्‌ वाईल्ड्‌नं म्हटलय हे बरं ! ’कुणाला काय हो त्याचे ?’ आनखी एक स्कॉटिश्‌ वचन.. अं हं...आश्वासन आहे. काय तं म्हणे: ’लग्न.. ? आणि तेही पैशांसाठी ? छे, छे.. अहो ते (पैसे हो !) तर खूप स्वस्त व्याजदरानं मिळतांत की !!’ तसंच विख्यात लेखक, सॅम्‌ किन्सन्‌ म्हणतो: ’दहशतवादाची आणि अतिरेक्यांची वगैरे मला मुळीच भीतीबीती वाटत नाही. अहो माझं लग्न होवून तब्बल दोन वर्ष झालीयेत, महाराजा...आहात कुठं !’ एक विलक्षण विश्लेषणात्मक वगैरे आत्मचिंतन.. (असं भारदस्त नांव दिलं की विधानाचं अर्ध समर्थन होवून जात असावं बहुधा !) ’पुरुषमंडळी स्त्रियांपेक्शा दोन बाबतींत नशिबवान असतांत.. पहिलं म्हणजे ते आयुष्यांत वाढल्या वयांत, उशिरा लग्न करतांत, आणि अर्थातच (त्या मुळं..कदाचित?)..ते ’वैकुंठवासी’ही लवकरचं होतांत..’ कुणी ऐरागैरा नाही तर खुद्द, एच्‌.एल्‌.मेंकेन्‌ म्हणतोय्‌..लक्षांत घ्या !.. आणखी कांही ’घाबर्‍याघुबर्‍या’ अनामिकांची, इकडंतिकडं पाहात, सावधपणे केलेली विधानं पाहूया: ’नवपरिणित वधुवर जेंव्हा मंदस्मित करतांत, हसतांखिदळतांत तेंव्हा कळतं आपल्याला कारण अगदी सहज....पण लग्नाला तब्बल, दहा वर्ष पूर्ण झालेलं जोडपं एकत्रित हसतं तेंव्हा जरा नाही... खूपच आश्चर्य वाटतं बुवा !’ ’प्रेम आंधळं असतं म्हणतांत..त्याच न्यायानं ’लग्न’ झालं की लोकं विचारतांत, ’काय ? उघडले की नाही आता डोळे ?’ ’एखाद्या महभागानं, आपल्या गाडीचा दरवाजा पत्नीसाठी उघडला तर दोन पैकी एका गोष्टीची खात्री बाळगा.. एक तर गाडी नवी आहे.. किंवा, हमखास.. बायको !!’ ’माझ्या प्रिय पत्नीला मी सगळीकडे हिंडायला घेवून गेलो. पण काय करणार ? प्रत्येकवेळी तिला घराकडे परतायचा रस्ता अगदी सहज सापडतो हो !’ माझ्या माया ममतेच्या आया-बहिणींनो हा पुरुषी मानसिकतेचा (Man 'sick'.. eh ?) हा धांडोळा इथंच संपत नाहीबरं ! उर्वरित पुधील सपताहांत ... ***** अरुण काकतकर. 24ak47@gmail.com www.target point blank.blogger.arun kakatkar ॥श्री॥ ’अक्षरे’...’उत्सव’ पुरवणीसाठी मजकूर.... (संजयजी डहाळे कृपया) ’अरे उर्वरितं संसार, ***** आतां आषाढ सरला की श्रावण येईल.. सणावारांचे वारे वाहूं लागतील..पूजा-अर्चा, व्रतवैकल्य..उपासतापास.. ’कुंकवाच्या धन्याच्या’..पतिराजांच्या यशासाठी..भल्यासाठी नवस सायास बोलतील भोळ्याभाबड्या महिला...तर कुमारिका, ’मला चागल Husband Material वाला नवरा मिळूं दे’ म्हणून, आपलं आधुनिक युगांतल्या स्थानाचं भान राखत, जीन्स्‌वर ’Ready-made नऊवारी परिधान करीत, परंपरेच्या ’मांदियाळींत’ सामील होतील... आणि इकडं..दुष्ट दुराग्रही पुरुषवर्ग...त्यांच्या ’सद्भावनांची, सद्‌हेतूंची टिंगल टवाळी करण्यांत, संध्याकाळच्या, मित्रांच्या टोळक्यांमधल्या ’धुंदावलेल्या’ गप्पांत त्या बुडवून टाकण्यांत मग्न असेल. अगदी , तरुणपणी बाहूंसकट सगळंच स्फुरण पावत असतांना , कानांत वारं भरलेल्या खोंडाच्या उत्साहानं, आवेगानं, पालकांनी आणलेल्या किंवा स्वत: हेरलेल्या, युवतीमध्ये, तिच्या स्त्रीसुलभ विभ्रमांनी हुरळून जात, तिच्यांत 'House wife Mmateral आहे की नाही याची खातरजमा करून न घेतां, उतावळेपणानं ’गुडघ्याला बाशिंग बांधत’ लग्न करून बसलेली पुरुष मंडळीसुद्धा, वसंत कानेटकरांच्या ’लेकुरे उदंडझाली’ मधल्या नायकाच्या मनांतले प्रष्ण विचारत बसतांत, ’ही शहाणीसुरती माणसं मुळी लग्नच कां करतांत, ? अन्‌ जाणूनबुजून खड्ड्यांत अशी जाउन कां पडतांत ? करूनसावरून घोरपड गळ्यांत, ही बांधून कां घेतांत ? आणि मग ’मेलो, मेलो ! बुडालो !!’ म्हणून ओरडत कां बसतांत ?’ अशाच एका खास, सुपीक ( कुठल्याही ’पत्नी’च्या नजरेंतून ’सडक्या’) मेंदूतून सुचलेली अफलांतून कल्पना.. हे सद्‍गृहस्थ आपल्या प्रिय पत्नीला विचारते झाले, ’प्रिये ! लग्नाच्या वाढदिवशी तुला कुठे घेवून जावू मी ?’ पत्नी हरखत, लाजून चूर (?) वगैरे होत, गृहस्थच्या नजरेंत आपली व्याकूळ, भिरभिरती नजर मिसळत म्हणाली, ’सख्या..तू नेतोय्‌स्‌...मग अशा ठिकाणी घेवून जा मला की जिथे मी आजवर कधीही गेले नाही..नेशील ना ?’ गृहस्थ अत्यंत (कुजकटपणे) प्रष्णकर्ताझाला, ’लादके मला तुझी इच्छापूती करायला फार लांब जायला लागणार नाही आपल्याला .. !’, पत्नी, ’खरं ? मग चला ना ! उशीर कशाला ?’, पतिराज ’बरळले’, ’चल..लवकर पावलं उचल.. आपल्याला त्वरेनं आपल्या घराचा ’मुदपाकखाना’ गाठायचाय, जिथंतू गेल्याचं तुला आणि मलाही आठवत नसावं..नाही कां ?’ आणखी कांही ’इरसाल नमुने: .मी माझ्या प्रिय पत्नीचा हांत, माझ्या हातांत, नेहमी घट्ट धरून ठेवतो...पखड अजिबात सैल करीत नाही ! कारणहातं सुटला तर ती लगेच ’खरेदी’साठी पळत सुटते हो !’ ’भामा..माझी प्रिया...’सौंदर्यवर्धन-गृहांत जवळजवळ दोन तास होती...हा एक आपला अंदाज हं ! तिनं ’पंक-लेपनोपचार’, म्हणजे ज्याला मराठींत, ललना ’Mud-pack' का काय ते म्हणतांत...घेतला होता आणि छानचं दिसत होती ती दोन दिवस...पण हाय रे माझ्या कर्मा...अहो, दोन दिवसांनी तो ’पंक-लेप’ गळून पडका की हो... !!’ आणि हा जरासा अतिरेकीच.. वाग्बाण ! क्रूर, कठोर, दुष्ट वगैरे विशेषणांना योग्य: ’परतीच्यावाटेवर, वेग वाढवत जाणार्‍या कचर्‍याच्या गाडीकडे बघून, ती त्या गाडीमागे धावात ओरडायला लागली, ’अहो थांबा ! थांबा ना...मला उशीर झाला कां थोडा ?’ मी तिची धडपड पाहून तिच्यामागे धावत कळवळून ओरडलो, ’नाई नाई...पटकन उडी मार ! मी वेग कमी करायला सांगतो त्यांना...नाईतर, आयती चालून आलेली संधी गमावू, तू आणि मी...आपण दोघेही...’ एका अनामिकाला, बडी टेड्डी सांगत होता, ’मी नाही करणार लग्न ! कारण लग्नाआधी वाङ्‌निश्चयतर करावाचं लागेल...म्हनजे ते साखरपुडा, भेटीगांठी वगैरे लांबलचक प्रकरण. आणि मग ते एकमेकांनी ’अंगठ्या’ बोटांवर चढविणं वगैरे... नेमक्या याच ’अंगठ्या’ मला नेहमीच, म्हणजे इतरांच्या वाङ्‌निश्चयाच्यावेळी बघितलेल्या, अक्षरश: सू्क्ष्मरूपधारिणी ’बेड्या’च भासतांत, पुढचं चित्र स्पष्ट करीत ’सावधान’ म्हणणार्‍या... त्याला मी काय करूं ?’ आनखी एका दुष्ट प्रवृत्तानं काय सल्ला दिलाय पाहा. हा खलनायक म्हणतो, ’मागल्यादारी तुमचा पाळलेला ’भु:भू’ जोरजोरांत भुंकतोय आणि मुख्य प्रवेशद्वारांत तुमची पत्नी ओरडतीये...तर तुम्ही कुणाला आधी आंत घ्याल ? अर्थातच ’भु:भू’ला ! कारण तुम्हाला खात्री असते की आंत आल्यावर तो भुंकायचं थांबणार आहे.’ आतां शेवटचे, ’शुभास्तेपंथान:सन्तु’ म्हणत हाणलेले दोन षट्कार: एका स्मशानभूमींत एक गृहस्थ आपल्या आईच्या थडग्याशी येवून, हातांतली फुलं वाहून अत्यंत मनोभावे, तिच्या आत्म्यासस सद्गती मिळावी म्हणून प्राथना करीत होता. प्रार्थना संपल्यावर थडग्यावर माथा टेकून परत उठून तो आपल्या गाडीकडे परतत होता. तेवढ्यांत, तिथंच कांही अंतरावर आणखी एक गृहस्थ अत्यंत शोकाकूल अवस्थेंत, अगदी हमसाहमशी रडत, ’कां इतक्या लवकर ? काय कारण होतं असं मधेच सोडून जायचं ? आता मी काय करायचं ?’ असे दु:खभरले प्रष्ण करीत होता, आणि त्या थडग्याकडून जणूकांही उत्तर मिळणार आहे अशा पद्धतीनं, गुडघे टेकून अश्रू ढाळत होता. पहिल्या गृहस्थाला ते दृश्य बघवेना. त्यानं जवळ जात, त्या गृहस्थाच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, ’ किती व्यथित आहात तुम्ही ! तुमच्या खाजगी भावाक्रंदनामधे मी व्यत्यय आणू इच्छित नाही पण... मी आजवर इतक्या भग्न मानसिक अवस्थेंत कुणालाच पाहिलं नाही हो ! कोण गेलं ? तुमच्या आई-वडिलांपैकी कोणी की मुला-बाळांपैकी कोणी ?’, शोकभग्नावस्थेंतल्या गृहस्थानं वर पाहिलं, स्वत:ला सावरत तो उत्तरला, ’अहो गेला तो आणि जो या थडग्याखाली चिरनिद्रा घेतोय तो माझ्या बायकोचा पहिला नवरा होता हो ! कसं सागू ? सहन होत नाहीये आणि सांगताही येत नाहीये कुणाला... !!’ आतां ही तर सर्वांवर कडी आहे: एक जोडपं एकदा एका इच्छापूर्ती विहिरीजवळ गेलं. पतीनं विहिरींत वाकून एक नाणं आंत फेकलं. पत्नीनही विहिरींत वाकून बघायचा प्रयत्न केला पण अचानक तोल गेल्यानं ती विहिरींत पडली.. आणि पोहोता येत नसल्यामुळे गटांगळ्या खात तळाशी गेली...ती गेलीचं. पतीनं विहिरींत बघितलं. धक्क्यांतून बाहेर येतांयेतां तो स्वत:शीच पुटपुटला, ’क्या बात है ! चक्क इच्छापूर्ती होतीय्‌ कि हो !!’ आतां थांबतओ..कारण अखिल स्त्रीवर्गाच्या निढेधाच्या आरोळ्या आणि त्यांच्या हातांतल्या ’लाटण्यां’चेयुद्धनाद, समीप तेत असल्याचं मला जाणवतय्‌.... *****

No comments:

Post a Comment